शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे रिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणारे अनेक तरुण आणि कुटुंब चालक आर्थिक ...

रत्नागिरी : कोरोनामुळे रिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणारे अनेक तरुण आणि कुटुंब चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊननंतरही रिक्षा व्यवसायाची अवस्था फार वाईट झाली आहे.

पश्चिम रेल्वेच्या ४ साप्ताहिक गाड्या

रत्नागिरी : राज्यात अनलॉकची मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर साप्ताहिक विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पूर्णत: आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

रुग्णांना मदतीचा हात

गुहागर : भाजप ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या संतोष जैतापकर यांनी उभ्या केलेल्या वैद्यकीय टीमने कोरोना काळात पुढे राहून दुसऱ्या लाटेत रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिला आहे.

वृध्द शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी : जाकादेवी - खालगाव येथील ग्रामस्थ नामदेव देसाई यांचे संपूर्ण घर दीड महिन्यापूर्वी आलेल्या तौक्ते वादळात जमीनदोस्त झाले होते. महसूलकडून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तरीही देसाई यांना अद्याप मदतीचा लाभ मिळालेला नाही.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

चिपळूण : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी होत असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. या कार्यालयाच्या शेडमध्ये अधिकाऱ्यांनी आपली दुचाकी वाहने उभी केली असल्याने सदनिका नोंदणी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना शेडबाहेर तिष्ठत राहावे लागते.

सेंद्रिय अन्न पदार्थ चाचणी

रत्नागिरी : जिल्ह्यात अन्न आयुक्त यांच्याकडून आलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये विविध मिठाईची दुकाने, अन्न पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने यांच्यावर लक्ष ठेवताना सेंद्रिय अन्न पदार्थ चाचणीची मोहीम अन्न आयुक्त संजय नारागडे यांनी सुरू केली आहे.

वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष

देवरुख : संगमेश्वर - साखरपा राज्य मार्गावर सह्याद्रीनगरजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर नियमित संध्याकाळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पंपासमोर बहुसंख्य खासगी आराम बस उभ्या केल्या जात असल्याने ही वाहतूक कोंडी होत आहे.

चारसूत्री भातलागवड प्रात्यक्षिक

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील मौजे अंत्रवली येथे संजीवनी मोहिमेअंतर्गत चारसूत्री पध्दतीने भात लावणी प्रात्यक्षिक व शेती-शाळा वर्ग शेतकरी आत्माराम माईन यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आला. यावेळी मंडल कृषी अधिकारी वाय. एस. सुरडकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

निवासस्थानापासून वंचित

रत्नागिरी : जिल्ह्यातील अनेक शासकीय अधिकाऱ्यांना निवासाची व्यवस्था नसल्याने भाड्याच्या घरातच राहावे लागत आहे. शासनाने त्यांच्यासाठी चांगल्या जागेमध्ये निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

खेड - वडगाव बसफेरीची मागणी

खेड : खेड - वडगाव एस. टी. बससेवा पुन्हा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन दळवी यांनी परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांना दिले आहे. खेड - वडगाव ही बसफेरी बंद असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.