शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी पुनर्जीवित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : गेली १० वर्ष बंद असलेली रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा पुनर्जीवित करावी, अशी मागणी ...

रत्नागिरी : गेली १० वर्ष बंद असलेली रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा पुनर्जीवित करावी, अशी मागणी ग्रामस्थ, कामगार, ठेकेदार यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. न्यायालयाने कोणत्या तरी चांगल्या कंपनीला कंपनी सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. त्यासाठी काेणाची मदत घ्यावी लागली तरी आम्ही ती घेऊ, पण कंपनी सुरू हाेऊ दे, अशी मागणी ठेकेदार दीपक किर यांनी केली. आम्ही सर्व एकत्र येऊन लढणार असून, यामध्ये काेणताही श्रेयवाद नसल्याचे त्यांनी सांगितले.

भारती डिफेन्स आणि इन्फ्रा लिमिटेड पूर्वी भारती शिपयार्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क़ंपनीने १९७३ सालापासून देशभरातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कंपनीचे एकूण ६ यार्ड आहेत. त्यापैकी ३ यार्ड हे महाराष्ट्र राज्यात आहेत. सन २००७ ते २०१३ हा कालावधीत कंपनीकडे खूप काम होते. २०१३ सालानंतर जहाज बांधणी उद्याेगातील जागतिक मंदीमुळे जगातील सर्व जहाजबांधणी प्रकल्प कोसळण्यास सुरुवात झाली. शासकीय कंपनीकडून कंपनीला २४ जहाजांची ऑर्डर मिळाली होती. काही जहाजांचे बांधकाम सुरू असून, बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत, तसेच रो-रो प्रकारच्या वेसल, एलएनजी चालवणाऱ्या जहाजांची कामेही टप्प्यात आहेत. कंपनीमध्ये उत्कृष्ट दर्जाजी जहाजे उपलब्ध आहेत, जर कंपनी शिपबिल्डिंग नसलेल्या गुंतवणूकदारांना विकली तर जहाजांची नासाडी होईल, असे कीर यांनी सांगितले.

२०१४ सालापासून ही कंपनी एडेलविस मालमत्ता पुनर्रचनाच्या नियंत्रणाखाली आहे. कंपनीच्या मालमत्तेच्या पुनर्गठनासाठी १२०० करोड देण्याचे ठरले होते, पण प्रत्यक्ष मात्र ३० कोटी रुपये दिले आहेत. रत्नागिरीतून १० जहाजांची निर्मिती केली होती. या कंपनीला वॉरशिप बांधायची परवानगी आहे व ही कंपनी देशासाठी उत्कृष्ट जहाजही बनवू शकेल. सध्याच्या घडीला कंपनी सुरू करण्यासाठी ५० कोटींचे आर्थिक बळ मिळाले तर कंपनी नक्की सुरू होऊ शकेल, असा विश्वास सांगितला.

नितीन गडकरींचीसुद्धा भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीही भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी लक्ष्मीकांत सावंत, तन्वीर खान, भाई सावंत, दीपक किर, राजेश तिवारी व परेय सावंत व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कंपनीसमोर आंदोलन

सोमवारी सकाळी १० वाजण्याचा दरम्यान जयहिंद चौक येथील व मिऱ्या बंदर येथील ग्रामस्थ, कामगार व ठेकेदार यांनी कंपनीच्या समोर उभे राहून आंदोलन केले. यावेळी त्यांनी एडलवाईस तुम्ही आमची बहुमूल्य नोकरी हिरावून का घेतली, एडलवाईस सर्वांत मोठा चोर आहे, एडलवाईस कंपनी भंगारात विकायची आणि मोठा फायदा करायचा आहे. अशाप्रकारचे विविध फलक घेऊन ग्रामस्थांनी कंपनीसमोर तब्बल दीड तास आंदोलन केले.