शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

चिरेखाणीबाबत महसूलचे पुन्हा बोटचेपे धोरण?

By admin | Updated: March 3, 2016 00:02 IST

हजारो ब्रास उत्खनन : राजापुरात अनधिकृत उत्खननाला ऊत; तरीही दुर्लक्ष

राजापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर एक दिवस चिरेखाणींवर कारवाई करण्याचे नाटक करणाऱ्या राजापूर महसूल प्रशासनाने पुन्हा हाताची घडी अन् तोंंडावर बोट ठेवल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजापूरच्या तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यात अधिकृत ५७ चिरेखाणी असल्या तरी प्रत्यक्षात शंभरपेक्षा अधिक चिरेखाणी राजरोसपणे सुरु आहेत. या सर्व खाणींंच्या माध्यमातून दररोज सुमारे साडेतीन हजार ब्रास उत्खनन होत असून, प्रशासनाच्या या बोटचेपे धोरणामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी राजापूर भेटीच्यावेळी तालुक्यातील विखारेगोठणे येथील चिरेखाणींची अचानक पहाणी करत धडक कारवाई केली होती. शासनाच्या बंदीकाळापासून गेल्या दोन - चार वर्षात राजरोसपणे सुरु असणाऱ्या अनधिकृत चिरेखाणींवर कारवाई करण्याचे धाडस यापूर्वी महसूल प्रशासनाने दाखवले नव्हते. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या या भूमिकेबाबत सर्वसामान्यांमधून शंका व्यक्त करण्यात येत होत्या. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर आता तरी राजापूरचा महसूल विभाग अशा विनापरवाना व नियमांचे उल्लंघन करुन सुरु असणाऱ्या चिरेखाणींवर कारवाई करेल, अशी आशा नागरिकांतून व्यक्त करण्यात येत होती.यावर्षी राजापूर महसूल विभागाने परवानगी दिलेल्या ५७ चिरेखाणींच्या माध्यमातून सुमारे ५८ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, तालुक्यात अनधिकृत व नियमांचे उल्लंघन करून सुरु असणाऱ्या चिरेखाणींची तपासणी करून महसूल विभागाने कारवाई केल्यास याच्या दुप्प्ट ते तिप्पट महसूल गोळा होऊ शकतो. मात्र, सध्याचे राजापूर महसूल विभागाचे पाठीशी घालण्याचे धोरण पाहता अशी कारवाई करण्यापेक्षा येथील महसूल अधिकारी अर्थपूर्ण व्यवहार सांभाळण्यात तरबेज असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांमधून होत असून, त्यांच्यावरच कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व त्यानंतर राजापूर महसूल विभागाने केलेल्या एकूण सहा प्रकरणातील आठ चिरेखाण मालकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा धाडून त्याची सुनावणीही घेण्यात आली. मात्र, तहसीलदार सुनावणीनंतर दोन ते तीन दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी आपला निर्णय राखून ठेवल्याने प्रारंभी दोन कोटीपेक्षा अधिक झालेली दंडात्मक कारवाई आता किती रुपयांवर खाली येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.राजापूर तालुक्यात विखारेगोठणे येथे सर्वाधिक चिरेखाणी सुरु असल्या तरी राजापूर धोपेश्वर, आडिवरे, धारतळे, निवेली, कोंड्ये आदी भागातही चिरेखाण व्यवसाय कमी नाही. या भागातून उत्खनन होणाऱ्या चिऱ्यांची वाहतूक घाटमाथ्यासह जवळच्या अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असते.राज्याच्या अन्य भागात चढ्या दराने चिरा विकला जात असल्यामुळे स्थानिकांनाही तो चिरा येथील खाणमालकांकडून चढ्या भावाने विकत घ्यावा लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)