शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चिरेखाणीबाबत महसूलचे पुन्हा बोटचेपे धोरण?

By admin | Updated: March 3, 2016 00:02 IST

हजारो ब्रास उत्खनन : राजापुरात अनधिकृत उत्खननाला ऊत; तरीही दुर्लक्ष

राजापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर एक दिवस चिरेखाणींवर कारवाई करण्याचे नाटक करणाऱ्या राजापूर महसूल प्रशासनाने पुन्हा हाताची घडी अन् तोंंडावर बोट ठेवल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजापूरच्या तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यात अधिकृत ५७ चिरेखाणी असल्या तरी प्रत्यक्षात शंभरपेक्षा अधिक चिरेखाणी राजरोसपणे सुरु आहेत. या सर्व खाणींंच्या माध्यमातून दररोज सुमारे साडेतीन हजार ब्रास उत्खनन होत असून, प्रशासनाच्या या बोटचेपे धोरणामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी राजापूर भेटीच्यावेळी तालुक्यातील विखारेगोठणे येथील चिरेखाणींची अचानक पहाणी करत धडक कारवाई केली होती. शासनाच्या बंदीकाळापासून गेल्या दोन - चार वर्षात राजरोसपणे सुरु असणाऱ्या अनधिकृत चिरेखाणींवर कारवाई करण्याचे धाडस यापूर्वी महसूल प्रशासनाने दाखवले नव्हते. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या या भूमिकेबाबत सर्वसामान्यांमधून शंका व्यक्त करण्यात येत होत्या. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर आता तरी राजापूरचा महसूल विभाग अशा विनापरवाना व नियमांचे उल्लंघन करुन सुरु असणाऱ्या चिरेखाणींवर कारवाई करेल, अशी आशा नागरिकांतून व्यक्त करण्यात येत होती.यावर्षी राजापूर महसूल विभागाने परवानगी दिलेल्या ५७ चिरेखाणींच्या माध्यमातून सुमारे ५८ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, तालुक्यात अनधिकृत व नियमांचे उल्लंघन करून सुरु असणाऱ्या चिरेखाणींची तपासणी करून महसूल विभागाने कारवाई केल्यास याच्या दुप्प्ट ते तिप्पट महसूल गोळा होऊ शकतो. मात्र, सध्याचे राजापूर महसूल विभागाचे पाठीशी घालण्याचे धोरण पाहता अशी कारवाई करण्यापेक्षा येथील महसूल अधिकारी अर्थपूर्ण व्यवहार सांभाळण्यात तरबेज असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांमधून होत असून, त्यांच्यावरच कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व त्यानंतर राजापूर महसूल विभागाने केलेल्या एकूण सहा प्रकरणातील आठ चिरेखाण मालकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा धाडून त्याची सुनावणीही घेण्यात आली. मात्र, तहसीलदार सुनावणीनंतर दोन ते तीन दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी आपला निर्णय राखून ठेवल्याने प्रारंभी दोन कोटीपेक्षा अधिक झालेली दंडात्मक कारवाई आता किती रुपयांवर खाली येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.राजापूर तालुक्यात विखारेगोठणे येथे सर्वाधिक चिरेखाणी सुरु असल्या तरी राजापूर धोपेश्वर, आडिवरे, धारतळे, निवेली, कोंड्ये आदी भागातही चिरेखाण व्यवसाय कमी नाही. या भागातून उत्खनन होणाऱ्या चिऱ्यांची वाहतूक घाटमाथ्यासह जवळच्या अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असते.राज्याच्या अन्य भागात चढ्या दराने चिरा विकला जात असल्यामुळे स्थानिकांनाही तो चिरा येथील खाणमालकांकडून चढ्या भावाने विकत घ्यावा लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)