शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

२३० एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार

By admin | Updated: April 30, 2016 00:47 IST

टेटवलीतील शेतकऱ्यांना दिलासा : दापोली कृ षी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय

दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्या नावाने सात-बारा असलेल्या परंतु शेतकरी कसत असलेल्या अतिरिक्त शेतजमिनी शेतकऱ्यांकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेत झाला. टेटवली गावातील २३0 एकर जमीन मूळ मालकांना परत केली जाणार असून, तसा प्रस्ताव कार्यकारी परिषद सरकारला देणार आहे.दापोलीचे आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दापोली कोकण कृषी विद्यापीठाने १९७२ च्या दरम्यान विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासाठी हजारो एकर जमिनी अल्पदराने घेतल्या होत्या; परंतु वाकवली-टेटवली या परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची २ हजार एकर जमीन विद्यापीठाकडे पडून आहे. या जमिनीचा कसल्याही प्रकारे वापर केला जात नाही. विद्यापीठाकडे अतिरिक्त असणाऱ्या जमिनीची मालकी कृ षी विद्यापीठाकडे आहे; परंतु त्या जमिनी अजूनही शेतकरी कसत आहेत. त्याचा सात-बारा कृ षी विद्यापीठाचा व जमिनी शेतकऱ्यांकडे अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी असूनसुद्धा शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या जमिनी शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत, असा मुद्दा पुढे आला. त्यादृष्टीने शुक्रवारी झालेल्या कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेत टेटवली गावातील २३० एकर जमिनींचे हस्तांतरण शेतकऱ्यांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या जमिनीचा शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा व जमिनी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आमदार कदम यांनी सांगितले.कृ षी विद्यापीठातील १०९ रोजंदार मंजुरांची पदे भरण्यात आली; परंतु शिपाई, मजूरदार यांना गावापासून लांब ठेवण्यात आले आहे. अशा लोकांना त्या त्या भागातील जागेवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी पर्यटनासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. नाममात्र शुल्कामध्ये विद्यापीठात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.या कार्यकारी परिषदेला विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांसह दापोलीचे आमदार संजय कदम, ठाणेचे आमदार संजय केळकर, राजापूरचे आमदार राजन साळवी उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. (प्रतिनिधी)ज्या शेतकऱ्यांच्याजमिनी विद्यापीठाकरिता गेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा. इतर विद्यापीठांत शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळतो, मग दापोली कृ षी विद्यापीठातील शेतकऱ्यांना हा दाखला का दिला जात नाही?- संजय कदम, आमदार