शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

२३० एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार

By admin | Updated: April 30, 2016 00:47 IST

टेटवलीतील शेतकऱ्यांना दिलासा : दापोली कृ षी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय

दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्या नावाने सात-बारा असलेल्या परंतु शेतकरी कसत असलेल्या अतिरिक्त शेतजमिनी शेतकऱ्यांकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेत झाला. टेटवली गावातील २३0 एकर जमीन मूळ मालकांना परत केली जाणार असून, तसा प्रस्ताव कार्यकारी परिषद सरकारला देणार आहे.दापोलीचे आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दापोली कोकण कृषी विद्यापीठाने १९७२ च्या दरम्यान विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासाठी हजारो एकर जमिनी अल्पदराने घेतल्या होत्या; परंतु वाकवली-टेटवली या परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची २ हजार एकर जमीन विद्यापीठाकडे पडून आहे. या जमिनीचा कसल्याही प्रकारे वापर केला जात नाही. विद्यापीठाकडे अतिरिक्त असणाऱ्या जमिनीची मालकी कृ षी विद्यापीठाकडे आहे; परंतु त्या जमिनी अजूनही शेतकरी कसत आहेत. त्याचा सात-बारा कृ षी विद्यापीठाचा व जमिनी शेतकऱ्यांकडे अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी असूनसुद्धा शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या जमिनी शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत, असा मुद्दा पुढे आला. त्यादृष्टीने शुक्रवारी झालेल्या कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेत टेटवली गावातील २३० एकर जमिनींचे हस्तांतरण शेतकऱ्यांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या जमिनीचा शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा व जमिनी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आमदार कदम यांनी सांगितले.कृ षी विद्यापीठातील १०९ रोजंदार मंजुरांची पदे भरण्यात आली; परंतु शिपाई, मजूरदार यांना गावापासून लांब ठेवण्यात आले आहे. अशा लोकांना त्या त्या भागातील जागेवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी पर्यटनासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. नाममात्र शुल्कामध्ये विद्यापीठात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.या कार्यकारी परिषदेला विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांसह दापोलीचे आमदार संजय कदम, ठाणेचे आमदार संजय केळकर, राजापूरचे आमदार राजन साळवी उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. (प्रतिनिधी)ज्या शेतकऱ्यांच्याजमिनी विद्यापीठाकरिता गेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा. इतर विद्यापीठांत शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळतो, मग दापोली कृ षी विद्यापीठातील शेतकऱ्यांना हा दाखला का दिला जात नाही?- संजय कदम, आमदार