शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

निकालाचा कौल ‘आशापुरा’च्या बाजूने

By admin | Updated: May 14, 2016 00:08 IST

कंपनी विरोधातील तक्रारीचा निपटारा

दापोली : अनेक दिवस तारखा पुढे-पुढे जात असलेल्या आशापुरा माईनकेम कंपनी विरोधातील तक्रारीचा निपटारा झाला असून, कंपनीला कौल मिळाला आहे.या कंपनीमुळे पर्यावरणाची हानी होऊन स्थानिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची तक्रार इम्तीयाज हळदे, अशोक रोडावत यांनी दिली होती. या तक्रारीनुसार प्रांताधिकारी कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस देऊन सीआरपीसी १४२ने आशापुरा कंपनीचे उत्खनन बंद ठेवण्याचे निर्देश २० फेब्रुवारी रोजी दिले होते. त्याचा निकाल देण्यात आला आहे.बॉक्साईट उत्खननाचे गेली १० वर्षे काम करणाऱ्या या कंपनी विरोधात अचानक जनतेचा उद्रेक झाला. कंपनी बेकायदेशीर काम करत असल्याची तक्रार काही लोकांनी केली. आता कंपनीच्या बाजूने निकाल लागल्याने पुन्हा रोजगाराच्या संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया देण्यात येत आहे.आशापुरा मायनिंगच्या कन्व्हेअर बेल्टमुळे प्रदूषण होत असल्याने तो बंद करण्याचा निकाल प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे. परंतु, दुसरीकडे केळशी, उंबरशेत, रोवले या गावाशेजारी बॉक्साईट उत्खननाचे काम सुरु आहे. या उत्खननाच्या कामामुळे कसल्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचा निकाल देण्यात आल्याने केवळ दिशाभूल करणारा हा निकाल आहे. प्रांंताधिकाऱ्यांनी हा पूर्वग्रहदूषीत निकाल दिला आहे. अशोक रोडावत यांनी अपर जिल्हाधिकारी यांचेकडून स्थगिती आणली होती. परंतु, तो आदेश फेटाळून लावत निकाल जाहीर करण्याची घाई करण्यात आल्याचा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी श्रीराम ईदाते उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्थानिकांवर अन्याय : केदार साठेआशापुरा मायनिंगच्या बाजूने देण्यात आलेला हा निकाल म्हणजे स्थानिकांवर अन्याय करणारा आहे. कारण या निकालावरुन स्पष्ट झाले आहे की, अधिकाऱ्याने निकाल चुकीचा दिला आहे. न्यायासाठी आपण पुढील न्यायालयात जाणार असल्याचे मत भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.