शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

निकालाचा कौल ‘आशापुरा’च्या बाजूने

By admin | Updated: May 14, 2016 00:08 IST

कंपनी विरोधातील तक्रारीचा निपटारा

दापोली : अनेक दिवस तारखा पुढे-पुढे जात असलेल्या आशापुरा माईनकेम कंपनी विरोधातील तक्रारीचा निपटारा झाला असून, कंपनीला कौल मिळाला आहे.या कंपनीमुळे पर्यावरणाची हानी होऊन स्थानिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची तक्रार इम्तीयाज हळदे, अशोक रोडावत यांनी दिली होती. या तक्रारीनुसार प्रांताधिकारी कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस देऊन सीआरपीसी १४२ने आशापुरा कंपनीचे उत्खनन बंद ठेवण्याचे निर्देश २० फेब्रुवारी रोजी दिले होते. त्याचा निकाल देण्यात आला आहे.बॉक्साईट उत्खननाचे गेली १० वर्षे काम करणाऱ्या या कंपनी विरोधात अचानक जनतेचा उद्रेक झाला. कंपनी बेकायदेशीर काम करत असल्याची तक्रार काही लोकांनी केली. आता कंपनीच्या बाजूने निकाल लागल्याने पुन्हा रोजगाराच्या संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया देण्यात येत आहे.आशापुरा मायनिंगच्या कन्व्हेअर बेल्टमुळे प्रदूषण होत असल्याने तो बंद करण्याचा निकाल प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे. परंतु, दुसरीकडे केळशी, उंबरशेत, रोवले या गावाशेजारी बॉक्साईट उत्खननाचे काम सुरु आहे. या उत्खननाच्या कामामुळे कसल्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचा निकाल देण्यात आल्याने केवळ दिशाभूल करणारा हा निकाल आहे. प्रांंताधिकाऱ्यांनी हा पूर्वग्रहदूषीत निकाल दिला आहे. अशोक रोडावत यांनी अपर जिल्हाधिकारी यांचेकडून स्थगिती आणली होती. परंतु, तो आदेश फेटाळून लावत निकाल जाहीर करण्याची घाई करण्यात आल्याचा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी श्रीराम ईदाते उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्थानिकांवर अन्याय : केदार साठेआशापुरा मायनिंगच्या बाजूने देण्यात आलेला हा निकाल म्हणजे स्थानिकांवर अन्याय करणारा आहे. कारण या निकालावरुन स्पष्ट झाले आहे की, अधिकाऱ्याने निकाल चुकीचा दिला आहे. न्यायासाठी आपण पुढील न्यायालयात जाणार असल्याचे मत भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.