शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

रत्नागिरीत चाैथ्या स्तरातील निर्बंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

रत्नागिरी : शासनाने शुक्रवारी जाहीर केलेल्या कोविड संदर्भातल्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे रत्नागिरी जिल्हा हा अद्यापही चौथ्या स्तरात असल्याचे जिल्हाधिकारी ...

रत्नागिरी : शासनाने शुक्रवारी जाहीर केलेल्या कोविड संदर्भातल्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे रत्नागिरी जिल्हा हा अद्यापही चौथ्या स्तरात असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे चौथ्या स्तरासाठी चालू असलेले निर्बंध यापुढेही चालूच राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ११ आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी चौथ्या स्तरासाठीचे निर्बंध लागू होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात निर्बंध शिथील करण्याची प्रक्रिया पाच स्तरांमध्ये सुरू झाली आहे. यासाठी शासनाने ऑक्सिजन बेड आणि पाॅझिटिव्हिटी रेट हे निकष ठेवले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश चौथ्या स्तरामध्ये होतो. त्यामुळे जिल्ह्याला चौथ्या स्तराचे निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा तिसऱ्या स्तरात येण्याची शक्यता निर्माण होत असतानाच पुन्हा २२ जून रोजी जिल्ह्यातील रहिवासी अन्य जिल्ह्यात पाॅझिटिव्ह आल्याने त्यांची संख्या एकदम नऊ हजाराने वाढली. त्यामुळे जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट कमी होण्याऐवजी वाढला.

त्यातच जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे नऊ रूग्ण सापडले. अन्यही सहा जिल्ह्यांमध्ये या व्हेरिएंटचे रूग्ण सापडल्याने रत्नागिरी - सिंधुदुर्ग यासह महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याची घाई करू नका, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी दिल्या. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट पुन्हा वाढला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हा पुन्हा चौथ्या स्तरात असल्याचे जाहीर केले असून, याआधीचे निर्बंध यापुढेही चालू राहतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ९ जूनपासूनचे निर्बंध यापुढेही कोरोना प्रादुर्भाव कमी होईपर्यंत कायम राहणार आहेत.

या निर्बंधानुसार किराणा, औषधे, शेतीविषयक दुकाने तसेच अत्यावश्यक सेवांशी निगडीत अन्य दुकाने सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत सुरू राहणार आहेत. तसेच गेल्या आदेशामध्ये ज्या बाबींना ठराविक वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यांनाही कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमावलीचे पालन करून यापुढेही सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.