शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपाहारगृह अडचणीच्या जागेत; नागरिकांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोर असलेले उपाहारगृह अडचणीच्या जागेत हलविण्यात आल्याने या परिसरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोर असलेले उपाहारगृह अडचणीच्या जागेत हलविण्यात आल्याने या परिसरातील विविध कार्यालयांमध्ये येणाऱ्या सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या उपाहारगृहाला नागरिकांच्यादृष्टीने या परिसरात सोयीची जागा मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या समोर असलेल्या जुन्या धान्याच्या गोदामाच्या एका बाजूला दोन वर्षांपासून हे उपाहारगृह सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पोस्ट कार्यालय, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, कोषागार कार्यालय, तसेच जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेली विविध कार्यालये, या कार्यालयांमध्ये जिल्ह्यातील विविध भागामधून शेकडो स्त्री-पुरूष विविध शासकीय कामांसाठी येत असतात. काही वेळा या नागरिकांच्या कामासाठी उशीर झाल्यास दिवसभर थांबावे लागते. त्यामुळे या परिसरात असलेल्या या उपाहारगृहामुळे त्यांना दुपारचे भोजन किंवा अल्पोपाहाराची सोय होत होती. त्याचबरोबर येथील विविध कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनाही या उपाहारगृहाचा आधार होत होता.

मात्र, काही महिन्यांपूर्वी धान्य गोदामाची जुनी इमारत पाडून ही जागा मोकळी करण्यात आली आहे. या ठिकाणी ध्वजस्तंभ तसेच उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे उपाहारगृह बंद करण्यात आले. त्यामुळे या कार्यालयांमध्ये काही वेळा लहान मुले, वृद्धांना घेऊन येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली. सध्या हे उपाहारगृह महसूल कर्मचारी पतपेढीच्या लगत एका कोपऱ्यात सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथील जागेत जेमतेम पाच - सहा जण बसू शकतील, एवढी अपुरी जागा आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसोबत वृद्ध किंवा लहान मुले असल्यास अतिशय अडचण होत आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीनेही ही जागा अयाेग्य आहे. या परिसरातील विविध कार्यालयांमध्ये कामासाठी दुरून येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून या परिसरात योग्य जागेत हे उपाहारगृह चालविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या परिसरात येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.

कोटसाठी

जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी आल्यास काही वेळा अख्खा दिवसही जातो. त्यामुळे या परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य ठिकाणी उपाहारगृह असणे गरजेचे आहे.

- अनंत ताम्हणकर, संगमेश्वर