शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपाहारगृह अडचणीच्या जागेत; नागरिकांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोर असलेले उपाहारगृह अडचणीच्या जागेत हलविण्यात आल्याने या परिसरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोर असलेले उपाहारगृह अडचणीच्या जागेत हलविण्यात आल्याने या परिसरातील विविध कार्यालयांमध्ये येणाऱ्या सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या उपाहारगृहाला नागरिकांच्यादृष्टीने या परिसरात सोयीची जागा मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या समोर असलेल्या जुन्या धान्याच्या गोदामाच्या एका बाजूला दोन वर्षांपासून हे उपाहारगृह सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पोस्ट कार्यालय, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, कोषागार कार्यालय, तसेच जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेली विविध कार्यालये, या कार्यालयांमध्ये जिल्ह्यातील विविध भागामधून शेकडो स्त्री-पुरूष विविध शासकीय कामांसाठी येत असतात. काही वेळा या नागरिकांच्या कामासाठी उशीर झाल्यास दिवसभर थांबावे लागते. त्यामुळे या परिसरात असलेल्या या उपाहारगृहामुळे त्यांना दुपारचे भोजन किंवा अल्पोपाहाराची सोय होत होती. त्याचबरोबर येथील विविध कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनाही या उपाहारगृहाचा आधार होत होता.

मात्र, काही महिन्यांपूर्वी धान्य गोदामाची जुनी इमारत पाडून ही जागा मोकळी करण्यात आली आहे. या ठिकाणी ध्वजस्तंभ तसेच उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे उपाहारगृह बंद करण्यात आले. त्यामुळे या कार्यालयांमध्ये काही वेळा लहान मुले, वृद्धांना घेऊन येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली. सध्या हे उपाहारगृह महसूल कर्मचारी पतपेढीच्या लगत एका कोपऱ्यात सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथील जागेत जेमतेम पाच - सहा जण बसू शकतील, एवढी अपुरी जागा आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसोबत वृद्ध किंवा लहान मुले असल्यास अतिशय अडचण होत आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीनेही ही जागा अयाेग्य आहे. या परिसरातील विविध कार्यालयांमध्ये कामासाठी दुरून येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून या परिसरात योग्य जागेत हे उपाहारगृह चालविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या परिसरात येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.

कोटसाठी

जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी आल्यास काही वेळा अख्खा दिवसही जातो. त्यामुळे या परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य ठिकाणी उपाहारगृह असणे गरजेचे आहे.

- अनंत ताम्हणकर, संगमेश्वर