शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपाहारगृह अडचणीच्या जागेत; नागरिकांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोर असलेले उपाहारगृह अडचणीच्या जागेत हलविण्यात आल्याने या परिसरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोर असलेले उपाहारगृह अडचणीच्या जागेत हलविण्यात आल्याने या परिसरातील विविध कार्यालयांमध्ये येणाऱ्या सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या उपाहारगृहाला नागरिकांच्यादृष्टीने या परिसरात सोयीची जागा मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या समोर असलेल्या जुन्या धान्याच्या गोदामाच्या एका बाजूला दोन वर्षांपासून हे उपाहारगृह सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पोस्ट कार्यालय, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, कोषागार कार्यालय, तसेच जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेली विविध कार्यालये, या कार्यालयांमध्ये जिल्ह्यातील विविध भागामधून शेकडो स्त्री-पुरूष विविध शासकीय कामांसाठी येत असतात. काही वेळा या नागरिकांच्या कामासाठी उशीर झाल्यास दिवसभर थांबावे लागते. त्यामुळे या परिसरात असलेल्या या उपाहारगृहामुळे त्यांना दुपारचे भोजन किंवा अल्पोपाहाराची सोय होत होती. त्याचबरोबर येथील विविध कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनाही या उपाहारगृहाचा आधार होत होता.

मात्र, काही महिन्यांपूर्वी धान्य गोदामाची जुनी इमारत पाडून ही जागा मोकळी करण्यात आली आहे. या ठिकाणी ध्वजस्तंभ तसेच उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे उपाहारगृह बंद करण्यात आले. त्यामुळे या कार्यालयांमध्ये काही वेळा लहान मुले, वृद्धांना घेऊन येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली. सध्या हे उपाहारगृह महसूल कर्मचारी पतपेढीच्या लगत एका कोपऱ्यात सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथील जागेत जेमतेम पाच - सहा जण बसू शकतील, एवढी अपुरी जागा आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसोबत वृद्ध किंवा लहान मुले असल्यास अतिशय अडचण होत आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीनेही ही जागा अयाेग्य आहे. या परिसरातील विविध कार्यालयांमध्ये कामासाठी दुरून येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून या परिसरात योग्य जागेत हे उपाहारगृह चालविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या परिसरात येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.

कोटसाठी

जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी आल्यास काही वेळा अख्खा दिवसही जातो. त्यामुळे या परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य ठिकाणी उपाहारगृह असणे गरजेचे आहे.

- अनंत ताम्हणकर, संगमेश्वर