शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

जिल्ह्यात पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सरीवर कोसळणारा पाऊसही मोठ्या कालावधीनंतर हजेरी लावत आहे. पाऊस कमी झाल्याने विहिरी, नदी, धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे लागवडीची शिल्लक राहिलेली कामे शेतकरी उरकत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ९३९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत ११ हजार ७३२.९१ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ११ हजार २०६.९९ मिलिमीटर पाऊस जास्त झाला आहे. दिवसभरात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस मंडणगड तालुक्यात झाला आहे.

पावसामुळे मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांत कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. मात्र, चिपळूण तालुक्यात पोलदवाडी येथे दरड कोसळली असली तरी जीवितहानी झालेली नाही. तळसर ग्रामपंचायतीलगतचा पूल वाहून गेल्याने धनगरवाडी, बाैद्धवाडीचा संपर्क तुटला आहे. येगाव येथे दोन घरांवर दरड कोसळली असली तरी जीवितहानी मात्र झालेली नाही. पेढांबे येथे घरात पुराचे पाणी शिरल्याने विनोद सकपाळ यांचे १,६४० रूपये, सुजाता शिंदे यांचे २२,६०० रूपये, पेढांब बसस्टाॅपचे ५० हजार रुपये, चंद्रशेखर शिंदे यांच्या शेतीचे १० हजार रुपये तर अन्नधान्याचे ३५ हजार ६०० रुपये, अभिषेक शिंदे यांच्या दुकानाचे दोन लाख पन्नास हजार रुपये, रघुनाथ सकपाळ यांच्या दुकानाचे ५२ हजार ५०० रुपये, विलास कदम यांच्या दुकानाचे सात लाख ५० हजार रुपये, मुस्लिम दर्ग्याचे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

संगमेश्वर येथील पांडुरंग येडगे यांची संरक्षक भिंत पडून ५० हजार रुपये, आंबेड बुद्रुक येथील भाटकर यांच्या १२ शेळी, १,२५० कोंबड्या गुदमरून मृत पावल्या. ताम्हाणे येथे संरक्षक भिंत खचली आहे. ओझरे बुद्रुक येथे पूल वाहून गेला असून, राजिवलीतील शीतल कदम यांच्या घरावर मातीचा ढिगारा पडून काैलांचे नुकसान झाले आहे. रातबी नदी परिसरातील शेती वाहून गेली आहे. निवळी निवसारवाडी रस्त्यावर भेग पडून रस्ता बंद झाला आहे.