शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जिल्ह्यात पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सरीवर कोसळणारा पाऊसही मोठ्या कालावधीनंतर हजेरी लावत आहे. पाऊस कमी झाल्याने विहिरी, नदी, धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे लागवडीची शिल्लक राहिलेली कामे शेतकरी उरकत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ९३९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत ११ हजार ७३२.९१ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ११ हजार २०६.९९ मिलिमीटर पाऊस जास्त झाला आहे. दिवसभरात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस मंडणगड तालुक्यात झाला आहे.

पावसामुळे मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांत कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. मात्र, चिपळूण तालुक्यात पोलदवाडी येथे दरड कोसळली असली तरी जीवितहानी झालेली नाही. तळसर ग्रामपंचायतीलगतचा पूल वाहून गेल्याने धनगरवाडी, बाैद्धवाडीचा संपर्क तुटला आहे. येगाव येथे दोन घरांवर दरड कोसळली असली तरी जीवितहानी मात्र झालेली नाही. पेढांबे येथे घरात पुराचे पाणी शिरल्याने विनोद सकपाळ यांचे १,६४० रूपये, सुजाता शिंदे यांचे २२,६०० रूपये, पेढांब बसस्टाॅपचे ५० हजार रुपये, चंद्रशेखर शिंदे यांच्या शेतीचे १० हजार रुपये तर अन्नधान्याचे ३५ हजार ६०० रुपये, अभिषेक शिंदे यांच्या दुकानाचे दोन लाख पन्नास हजार रुपये, रघुनाथ सकपाळ यांच्या दुकानाचे ५२ हजार ५०० रुपये, विलास कदम यांच्या दुकानाचे सात लाख ५० हजार रुपये, मुस्लिम दर्ग्याचे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

संगमेश्वर येथील पांडुरंग येडगे यांची संरक्षक भिंत पडून ५० हजार रुपये, आंबेड बुद्रुक येथील भाटकर यांच्या १२ शेळी, १,२५० कोंबड्या गुदमरून मृत पावल्या. ताम्हाणे येथे संरक्षक भिंत खचली आहे. ओझरे बुद्रुक येथे पूल वाहून गेला असून, राजिवलीतील शीतल कदम यांच्या घरावर मातीचा ढिगारा पडून काैलांचे नुकसान झाले आहे. रातबी नदी परिसरातील शेती वाहून गेली आहे. निवळी निवसारवाडी रस्त्यावर भेग पडून रस्ता बंद झाला आहे.