शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पावसाच्या विश्रांतीने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

रत्नागिरी : बुधवारपासून संततधारेने काेसळणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...

रत्नागिरी : बुधवारपासून संततधारेने काेसळणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, चिपळूण, खेड आदी पूरबाधित शहरांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसल्याने पूर ओसरला असला तरी ही शहरे आणि परिसरातील जनजीवन सुरळीत होण्यास अजूनही काही कालावधी जाणार आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने केवळ रात्रीत उच्चांकी नोंद केली. या पावसाने खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या शहर आणि परिसरात पूरपरिस्थिती निर्माण केली. चिपळूणमध्ये केवळ २४ तासांत ६०० मिलिमीटरची नोंद झाली. त्यातच नद्यांना आलेला पूर आणि कोळकेवाडी धरणातून करण्यात आलेला विसर्ग यामुळे चिपळुणात महापूर आला. सर्व घरांमध्ये, बाजारपेठेत पाणी घुसले. त्यामुळे ३० तासांपेक्षा अधिककाळ नागरिक पुराच्या वेढ्यात अडकले. या महाप्रलयात सुमारे ६० हजार लोक अडकले होते. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने या ठिकाणी मदतकार्याला वेग आला आहे. मात्र, चिखल मोठ्या प्रमाणावर असल्याने पंचनामे करण्यात अडथळे येत आहेत. इथले जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजूनही काही कालावधी जाणार आहे. खेड, राजापूर, संगमेश्वर आदी भागातील पूरपरिस्थिती आता निवळली आहे. त्यामुळे या शहर आणि परिसरातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत चिपळूण तालुक्यात खासगी आणि शासकीय मालमत्तांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे सुरू आहेत.

शुक्रवारी रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारी दिवसभर किरकाेळ सरी वगळता पाऊस थांबला होता. अधूनमधून उन्हाचेही दर्शन होत होते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, हवामान विभागाने अजूनही २६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांच्या मनात पावसाची भीती कायम आहे.