शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पावसाच्या विश्रांतीने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

रत्नागिरी : बुधवारपासून संततधारेने काेसळणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...

रत्नागिरी : बुधवारपासून संततधारेने काेसळणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, चिपळूण, खेड आदी पूरबाधित शहरांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसल्याने पूर ओसरला असला तरी ही शहरे आणि परिसरातील जनजीवन सुरळीत होण्यास अजूनही काही कालावधी जाणार आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने केवळ रात्रीत उच्चांकी नोंद केली. या पावसाने खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या शहर आणि परिसरात पूरपरिस्थिती निर्माण केली. चिपळूणमध्ये केवळ २४ तासांत ६०० मिलिमीटरची नोंद झाली. त्यातच नद्यांना आलेला पूर आणि कोळकेवाडी धरणातून करण्यात आलेला विसर्ग यामुळे चिपळुणात महापूर आला. सर्व घरांमध्ये, बाजारपेठेत पाणी घुसले. त्यामुळे ३० तासांपेक्षा अधिककाळ नागरिक पुराच्या वेढ्यात अडकले. या महाप्रलयात सुमारे ६० हजार लोक अडकले होते. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने या ठिकाणी मदतकार्याला वेग आला आहे. मात्र, चिखल मोठ्या प्रमाणावर असल्याने पंचनामे करण्यात अडथळे येत आहेत. इथले जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजूनही काही कालावधी जाणार आहे. खेड, राजापूर, संगमेश्वर आदी भागातील पूरपरिस्थिती आता निवळली आहे. त्यामुळे या शहर आणि परिसरातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत चिपळूण तालुक्यात खासगी आणि शासकीय मालमत्तांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे सुरू आहेत.

शुक्रवारी रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारी दिवसभर किरकाेळ सरी वगळता पाऊस थांबला होता. अधूनमधून उन्हाचेही दर्शन होत होते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, हवामान विभागाने अजूनही २६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांच्या मनात पावसाची भीती कायम आहे.