शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पावसाच्या विश्रांतीने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

रत्नागिरी : बुधवारपासून संततधारेने काेसळणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. ...

रत्नागिरी : बुधवारपासून संततधारेने काेसळणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, चिपळूण, खेड आदी पूरबाधित शहरांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसल्याने पूर ओसरला असला तरी ही शहरे आणि परिसरातील जनजीवन सुरळीत होण्यास अजूनही काही कालावधी जाणार आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने केवळ रात्रीत उच्चांकी नोंद केली. या पावसाने खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या शहर आणि परिसरात पूरपरिस्थिती निर्माण केली. चिपळूणमध्ये केवळ २४ तासांत ६०० मिलिमीटरची नोंद झाली. त्यातच नद्यांना आलेला पूर आणि कोळकेवाडी धरणातून करण्यात आलेला विसर्ग यामुळे चिपळुणात महापूर आला. सर्व घरांमध्ये, बाजारपेठेत पाणी घुसले. त्यामुळे ३० तासांपेक्षा अधिककाळ नागरिक पुराच्या वेढ्यात अडकले. या महाप्रलयात सुमारे ६० हजार लोक अडकले होते. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केल्याने या ठिकाणी मदतकार्याला वेग आला आहे. मात्र, चिखल मोठ्या प्रमाणावर असल्याने पंचनामे करण्यात अडथळे येत आहेत. इथले जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजूनही काही कालावधी जाणार आहे. खेड, राजापूर, संगमेश्वर आदी भागातील पूरपरिस्थिती आता निवळली आहे. त्यामुळे या शहर आणि परिसरातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत चिपळूण तालुक्यात खासगी आणि शासकीय मालमत्तांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे सुरू आहेत.

शुक्रवारी रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारी दिवसभर किरकाेळ सरी वगळता पाऊस थांबला होता. अधूनमधून उन्हाचेही दर्शन होत होते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, हवामान विभागाने अजूनही २६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांच्या मनात पावसाची भीती कायम आहे.