शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

आरामबस झाडावर आदळून पाच ठार

By admin | Updated: September 22, 2014 00:49 IST

असुर्डेतील दुर्घटना : २७ जखमी, सहाजणांची प्रकृती गंभीर, मृतांमध्ये देवगड तालुक्यातील दोघे

सावर्डे : पहाटेच्यावेळी दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगातील खासगी आरामबस झाडावर आदळून झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार झाले, तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गाडीतील २७ प्रवासी जखमी झाले. यापैकी पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेनजीकच्या असुर्डे (ता. चिपळूण) गावी घडला. बसमधील एकूण २७ प्रवाशांपैकी सुनील गंगाराम कांबळे (वय २७, शिपोशी लांजा), सतेज प्रभाकर वेतकर (१७, हळदेवाडी देवगड), महेंद्र महादेव तांबे (३०, राजापूर) व एक अज्ञात प्रवासी असे चारजण जागीच ठार झाले. अज्ञात प्रवाशाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला असून त्यांच्याजवळ ओळख पटू शकेल, अशी कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. त्यामुळे या इसमाची ओळख पटवणे पोलिसांसाठी अवघड बनले आहे. प्रियांका विनोद वेतकर (४५, तिर्लोट देवगड) यांना गंभीर जखमी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.असुर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अवघड वळणावर पहाटे ५.१५ च्या सुमारास हा अपघात घडला. साईपूजा ट्रॅव्हल्सची ही बस (एमएच- ४३/ एच २५५९) वरळीहून विजयदुर्गकडे जात होती. सुनील विष्णू टिकम (४७, गिऱ्ये विजयदुर्ग) हा बस चालवीत होता. असुर्डे घाट उतरताना दाट धुके होते. त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज येत नव्हता. असुर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्यामुळे बस रस्त्यालगतच्या एका झाडावर जोरदार आदळली. बसचा वेग प्रचंड असल्यामुळे ती डावीकडील पहिल्या आसनापासून शेवटच्या आसनापर्यंत झाडावर घासत गेली. बसमधील दिलीप तुकाराम पाडाळे (वय ५३, राजापूर), अनिल विठोबा झिमण (२८, जावडे लांजा), अमित जाधव (३०, राजापूर), पंकज तानाजी आतवकर (२५, गोठणे राजापूर), आत्माराम सीताराम वारीक (६२, पडेल देवगड) / पान ७ वरसलग तिसऱ्या अपघाताने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हादरला...!सावर्डे : पहाटेच्या वेळी होणारा आक्रोश आणि गगनभेदी किंकाळ्या ऐकून महामार्गानजीकचे ग्रामस्थ धावून आले. गेल्या तीन दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सलग तिसऱ्या दिवशी अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग हादरला आहे. आठवडाभरातील हा चौथा अपघात आहे.मुंबई - गोवा महामार्गावर सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सध्या पहाटेच्या वेळी पडणारे दाट धुके, रस्त्याचा न येणारा अंदाज यामुळे अपघात वाढले आहेत. विशेष म्हणजे सध्या महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ नसतानाही हे अपघात होत आहेत. रविवारी मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक असुर्डे येथे खासगी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात २७जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित २१ प्रवासी किरकोळ जखमी असून, त्यामध्ये विनोद सुदाम वेतकर (४८, तिर्लोट देवगड), जगदीश गजानन मयेकर (५२, जैतापूर), दीपक पांडुरंग करंजे (४८, ठाणे), लक्ष्मी प्रभाकर बेटकर (४५, मालवण), प्रशांत तानाजी आतवकर (२३, गोठणे, राजापूर), द्रौपदी करंगुटकर (६०, आंबोळगड राजापूर), शारदा वसंत ठुकरुल (६०, आंबोळगड), तृप्ती दत्तात्रय पावसकर (४८, शिरसे, राजापूर), कुलदीप मधुकर वेतकर (२९, देवगड), बाळा नारायण निंबाळकर (४८, कात्रादेवी, राजापूर), मधुकर सुदाम वेतकर (६५, तिर्लोट देवगड), सचिन भास्कर वेतकर (३२, तिर्लोट देवगड), सूर्यकांत आप्पा भाताडे (४४, भांबेड), वैशाली जनार्दन गिरकर (५५, गिर्ये देवगड), दीपाली दीपक तिरलोटकर (४०, तिर्लोट), नीतेश अशोक मोहिते (२१, शिपोशी), विवेक जनार्दन गिरकर (२४, गिर्ये देवगड), संध्या महेंद्र मयेकर (३७, सांगवे राजापूर), सुमित बबन गिरकर (२३, गिर्ये), आशिष सुनील मोंडे (२१, मोंडपाल देवगड), प्रमिला बबन गिरकर (४५, गिर्ये) यांचा समावेश आहे.आरवली येथे मालवण - मुंबई एस. टी. दरीत कोसळून अपघात झाला आहे. मानसकोंड येथे शुक्रवारी झालेल्या खासगी आराम गाडीच्या अपघातात दोनजण ठार झाले होते. शनिवारी आगवे पॅसिफिक हॉटेलजवळ पुणे-देवरुख एस. टी. बस दरीत कोसळली होती. त्याच पट्ट्यात आज (रविवारी) आराम बस झाडावर आदळून आणखी पाचजणांचा बळी गेला.गेल्या आठवडाभरात झालेले चारही अपघात हे मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते चिपळूणदरम्यान झाले आहेत. (वार्ताहर)