शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

ग्रामस्थांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

खेड : तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीच्या दीड वर्षानंतर झालेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच सुनीता कासार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना ...

खेड : तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीच्या दीड वर्षानंतर झालेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच सुनीता कासार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत ही ग्रामसभा पार पडली. या वेळी विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. ग्रामस्थांच्या काही शंका आल्या होत्या त्यांचेही निरसन केले गेले.

ग्रामस्वच्छता अभियान

खेड : तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायत व स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुणदे येथील ग्रामदैवत मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेेंतर्गत सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. सरपंच रवींद्र आंब्रे, उपसरपंच संध्या कांदेकर, सदस्य सुभाष आंब्रे, रुणाली आंब्रे व अन्य सदस्य, स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी झाले होते.

बैठकीत चर्चा

खेड : खेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची बैठक शासकीय विश्रामगृहात कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ, तालुकाध्यक्ष शंकर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तसेच या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी पार्टीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तंटामुक्त अध्यक्षपदी विलास नारकर

राजापूर : तालुक्यातील करक ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली. या वेळी माजी सरपंच विलास नारकर यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विलास नारकर यांनी यापूर्वी करक ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले आहे. तसेच या परिसरात ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.

गणपतीपुळेत आज रक्तदान शिबिर

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे पंचक्रोशी मदत ग्रुपतर्फे सोमवार २७ सप्टेंबर रोजी पर्यटन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गणपतीपुळे येथील श्री चंडिका देवी मंदिरात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या शिबिरात यावे व रक्तदान करावे, असे आवाहन मदत ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

गाड्यांना मुदतवाढ

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रत्नागिरी मडगाव पॅसेंजर तसेच दिवा रत्नागिरी गाडीसह आठ गाड्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाड्या मर्यादित कालावधीसाठी जाहीर करण्यात आल्या होत्या.