शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

मोसम नदीच्या अस्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये संताप

By admin | Updated: August 11, 2014 21:59 IST

मोसम नदीच्या अस्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये संताप

 संगमेश्वर : मोसम नदीच्या अस्वच्छतेबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी टाकलेला प्रकाशझोत व जनमताच्या रेट्यामुळे मालेगाव महानगरपालिकेने पाणवेली काढण्यास सुरुवात केली; मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधींची पाठ फिरताच काम बंद झाल्याचे विदारक चित्र काल येथे दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.महानगरपालिकेचे जेसीबी यंत्र खराब असल्याचे कारण देऊन स्वच्छता मोहिमेस आधीच उशीर झाला होता. काल दुसऱ्या जेसीबी यंत्राद्वारे पाणवेली काढण्यास सकाळी सुरुवात झाली. मात्र काही वेळातच जेसीबी चालकाला कामच करता येत नसल्याचे कारण देत हे काम बंद पाडले. कारण देऊन जेसीबी यंत्र माघारी फिरले. नागरिकांच्या आनंदावर विरजण पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच शनिवारपासून शहरात पुन्हा विजेचे भारनियमन सुरू झाले आहे. सकाळी तीन तास तर सायंकाळी ५ ते ८ या तीन तासात वीज गायब होत आहे. याचवेळी डास मच्छरांचे आगमन होते आणि नागरिकांना या डास-मच्छरांना तोंड देता देता अक्षरश: नाकीनऊ येते. संगमेश्वर नदीकिनारी प्रत्येक घर, दुकानांसमोर धूर करून नागरिक वीज येण्याची वाट बघत होते.आगामी सण-वार लक्षात घेता बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी अपेक्षित असते. मात्र विजेचे भारनियमन व डासांचा हमला यामुळे महिला, मुले कशीबशी खरेदी पटकन आटोपून या भागातून पळ काढताना दिसत होते. (वार्ताहर)पिंपळगावी दुबार पेरणीचे संकटपिंपळगाव वाखारी : खरीप हंगामातील बाजरीच्या पिकाची दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाऊस उशिरा आल्याने परिसरात शेतकऱ्यांनी अत्यल्प ओलीवर खरिपाची पेरणी केली. खरीप पिकांतील बाजरीची उगवणी असमाधानकारक असून, उगवलेली बाजरीचे कोंब मरत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़