शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा गुंता संयमाने, चर्चेने सोडवणे आवश्यक

By admin | Updated: September 25, 2016 00:48 IST

श्रीपाल सबनीस : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मांडली अभ्यासाची गरज

रत्नागिरी : जातीची भूमिका घेऊन येणारे मोर्चे हे जातीवादी नाही तर वेदनेचे आहेत. त्यामध्ये मातीची वेदना आहे. ही वेदना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीत आहे. मौनातून बोलणारा शिवाजी महाराजांचा मावळा गांधीवादीप्रमाणे व्यक्त होत आहे. ही विस्फोटक शांतता असून, सरकारने या मौनामागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. सरकारने जे-जे मागास आहेत, त्यांचे दु:ख दूर करणे आवश्यक आहे. सरकारने आरक्षणाचा गुंता शांत, संयमाने बसून, चर्चा करून वास्तवातील चुकलेलं गणित सुधारून, राज्य घटनेतील कलमांचा विचार करून सोडविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले. मराठा समाजाच्या मागणीमुळे मागासवर्गीयांमध्ये असुरक्षितता व अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकसंघ महाराष्ट्राचा चेहरा यातून विद्रुप होऊ पाहात आहे. त्यामुळे आरक्षणावर अभ्यासपूर्वक निर्णय घेणे उचित राहिल. त्यामुळे लोकशाहीला पूरक असलेली मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका योग्य असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले. वाद हा मानवाचा स्वभाव, स्थायीभाव आहे. व्यक्ती व जाती व्यवस्थेवर होणारे वाद वांझ आहेत. वादातून सत्य बाहेर येत असेल तर निश्चितच चांगले आहे. लोकशाही मार्गाने संमेलन अध्यक्षपदी निवडून आल्यावर हास्यास्पद आरोप करणे, बदनाम करणे चुकीचे आहे. ब्राम्हण समाजात जन्म घेऊन डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यावर पीएचडी करून आंबेडकर चळवळीत आयुष्य घालविणाऱ्यावर अ‍ॅक्ट्रॉसिटी करण्यात आली, झाली नाही ती वेगळी गोष्ट. माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर मी आता केस दाखल केली असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले. संमेलन अध्यक्ष निवड प्रक्रियेत त्रुटी असून, त्यामध्ये बदल आवश्यक आहेत. महामंडळात जुनी, जाणकार साहित्यिक मंडळी आहेत. संमेलने म्हणजे अखिल भारतीय पातळीवरचा उत्सव आहे. गेली अनेक वर्षे संमेलने होत आहेत. संमेलन कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली आहेत. अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची आवश्यकता नाही. मात्र, त्याचा गैरवापर केला जात असेल तर सर्वेक्षण होऊन त्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समाज व सरकार इंग्रजी शाळांच्या फेव्हरमध्ये असल्यानेच इंग्रजी शाळांची संख्या वाढत आहे. मातृभाषेचे महत्त्व अन्य राज्यांनी जपले आहे. मराठी भाषेबाबतही असेच आग्रह असणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाची गेल्या ८० वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मराठी जपली गेली पाहिजे. डॉ. सबनीस यांनी साहित्य निर्मितीत तरूणाईचा सहभाग चांगला असल्याचे सांगून, सोशल मीडियावरील साहित्य विकृत नसल्याचे मत व्यक्त केले. सोशल मीडियावर वादविवाद, चर्चा, कविता रोज सुरू आहेत. हे एक प्रकारचे संमेलनच म्हणावे लागेल. परंतु, कौर्य, असहिष्णूता, असभ्यता टाळण्याचे भान मात्र सांभाळणे आवश्यक असून, त्यासाठी वयस्क मंडळींनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठे असूनदेखील शेतकरी आत्महत्या गंभीर असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले.(प्रतिनिधी)