शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

आरक्षणाचा गुंता संयमाने, चर्चेने सोडवणे आवश्यक

By admin | Updated: September 25, 2016 00:48 IST

श्रीपाल सबनीस : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मांडली अभ्यासाची गरज

रत्नागिरी : जातीची भूमिका घेऊन येणारे मोर्चे हे जातीवादी नाही तर वेदनेचे आहेत. त्यामध्ये मातीची वेदना आहे. ही वेदना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीत आहे. मौनातून बोलणारा शिवाजी महाराजांचा मावळा गांधीवादीप्रमाणे व्यक्त होत आहे. ही विस्फोटक शांतता असून, सरकारने या मौनामागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. सरकारने जे-जे मागास आहेत, त्यांचे दु:ख दूर करणे आवश्यक आहे. सरकारने आरक्षणाचा गुंता शांत, संयमाने बसून, चर्चा करून वास्तवातील चुकलेलं गणित सुधारून, राज्य घटनेतील कलमांचा विचार करून सोडविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले. मराठा समाजाच्या मागणीमुळे मागासवर्गीयांमध्ये असुरक्षितता व अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकसंघ महाराष्ट्राचा चेहरा यातून विद्रुप होऊ पाहात आहे. त्यामुळे आरक्षणावर अभ्यासपूर्वक निर्णय घेणे उचित राहिल. त्यामुळे लोकशाहीला पूरक असलेली मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका योग्य असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले. वाद हा मानवाचा स्वभाव, स्थायीभाव आहे. व्यक्ती व जाती व्यवस्थेवर होणारे वाद वांझ आहेत. वादातून सत्य बाहेर येत असेल तर निश्चितच चांगले आहे. लोकशाही मार्गाने संमेलन अध्यक्षपदी निवडून आल्यावर हास्यास्पद आरोप करणे, बदनाम करणे चुकीचे आहे. ब्राम्हण समाजात जन्म घेऊन डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यावर पीएचडी करून आंबेडकर चळवळीत आयुष्य घालविणाऱ्यावर अ‍ॅक्ट्रॉसिटी करण्यात आली, झाली नाही ती वेगळी गोष्ट. माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर मी आता केस दाखल केली असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले. संमेलन अध्यक्ष निवड प्रक्रियेत त्रुटी असून, त्यामध्ये बदल आवश्यक आहेत. महामंडळात जुनी, जाणकार साहित्यिक मंडळी आहेत. संमेलने म्हणजे अखिल भारतीय पातळीवरचा उत्सव आहे. गेली अनेक वर्षे संमेलने होत आहेत. संमेलन कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली आहेत. अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची आवश्यकता नाही. मात्र, त्याचा गैरवापर केला जात असेल तर सर्वेक्षण होऊन त्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समाज व सरकार इंग्रजी शाळांच्या फेव्हरमध्ये असल्यानेच इंग्रजी शाळांची संख्या वाढत आहे. मातृभाषेचे महत्त्व अन्य राज्यांनी जपले आहे. मराठी भाषेबाबतही असेच आग्रह असणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाची गेल्या ८० वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मराठी जपली गेली पाहिजे. डॉ. सबनीस यांनी साहित्य निर्मितीत तरूणाईचा सहभाग चांगला असल्याचे सांगून, सोशल मीडियावरील साहित्य विकृत नसल्याचे मत व्यक्त केले. सोशल मीडियावर वादविवाद, चर्चा, कविता रोज सुरू आहेत. हे एक प्रकारचे संमेलनच म्हणावे लागेल. परंतु, कौर्य, असहिष्णूता, असभ्यता टाळण्याचे भान मात्र सांभाळणे आवश्यक असून, त्यासाठी वयस्क मंडळींनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठे असूनदेखील शेतकरी आत्महत्या गंभीर असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले.(प्रतिनिधी)