शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

आरक्षणाचा गुंता संयमाने, चर्चेने सोडवणे आवश्यक

By admin | Updated: September 25, 2016 00:48 IST

श्रीपाल सबनीस : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मांडली अभ्यासाची गरज

रत्नागिरी : जातीची भूमिका घेऊन येणारे मोर्चे हे जातीवादी नाही तर वेदनेचे आहेत. त्यामध्ये मातीची वेदना आहे. ही वेदना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीत आहे. मौनातून बोलणारा शिवाजी महाराजांचा मावळा गांधीवादीप्रमाणे व्यक्त होत आहे. ही विस्फोटक शांतता असून, सरकारने या मौनामागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. सरकारने जे-जे मागास आहेत, त्यांचे दु:ख दूर करणे आवश्यक आहे. सरकारने आरक्षणाचा गुंता शांत, संयमाने बसून, चर्चा करून वास्तवातील चुकलेलं गणित सुधारून, राज्य घटनेतील कलमांचा विचार करून सोडविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले. मराठा समाजाच्या मागणीमुळे मागासवर्गीयांमध्ये असुरक्षितता व अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकसंघ महाराष्ट्राचा चेहरा यातून विद्रुप होऊ पाहात आहे. त्यामुळे आरक्षणावर अभ्यासपूर्वक निर्णय घेणे उचित राहिल. त्यामुळे लोकशाहीला पूरक असलेली मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका योग्य असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले. वाद हा मानवाचा स्वभाव, स्थायीभाव आहे. व्यक्ती व जाती व्यवस्थेवर होणारे वाद वांझ आहेत. वादातून सत्य बाहेर येत असेल तर निश्चितच चांगले आहे. लोकशाही मार्गाने संमेलन अध्यक्षपदी निवडून आल्यावर हास्यास्पद आरोप करणे, बदनाम करणे चुकीचे आहे. ब्राम्हण समाजात जन्म घेऊन डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यावर पीएचडी करून आंबेडकर चळवळीत आयुष्य घालविणाऱ्यावर अ‍ॅक्ट्रॉसिटी करण्यात आली, झाली नाही ती वेगळी गोष्ट. माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर मी आता केस दाखल केली असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले. संमेलन अध्यक्ष निवड प्रक्रियेत त्रुटी असून, त्यामध्ये बदल आवश्यक आहेत. महामंडळात जुनी, जाणकार साहित्यिक मंडळी आहेत. संमेलने म्हणजे अखिल भारतीय पातळीवरचा उत्सव आहे. गेली अनेक वर्षे संमेलने होत आहेत. संमेलन कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली आहेत. अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची आवश्यकता नाही. मात्र, त्याचा गैरवापर केला जात असेल तर सर्वेक्षण होऊन त्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समाज व सरकार इंग्रजी शाळांच्या फेव्हरमध्ये असल्यानेच इंग्रजी शाळांची संख्या वाढत आहे. मातृभाषेचे महत्त्व अन्य राज्यांनी जपले आहे. मराठी भाषेबाबतही असेच आग्रह असणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाची गेल्या ८० वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मराठी जपली गेली पाहिजे. डॉ. सबनीस यांनी साहित्य निर्मितीत तरूणाईचा सहभाग चांगला असल्याचे सांगून, सोशल मीडियावरील साहित्य विकृत नसल्याचे मत व्यक्त केले. सोशल मीडियावर वादविवाद, चर्चा, कविता रोज सुरू आहेत. हे एक प्रकारचे संमेलनच म्हणावे लागेल. परंतु, कौर्य, असहिष्णूता, असभ्यता टाळण्याचे भान मात्र सांभाळणे आवश्यक असून, त्यासाठी वयस्क मंडळींनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठे असूनदेखील शेतकरी आत्महत्या गंभीर असल्याचे डॉ. सबनीस यांनी सांगितले.(प्रतिनिधी)