शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

राज्यात मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचे प्रश्न चर्चिले जात आहेत. त्यातही सर्वात अग्रक्रमाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार ...

राज्यात मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचे प्रश्न चर्चिले जात आहेत. त्यातही सर्वात अग्रक्रमाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी राज्यातील मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्नही प्रलंबित राहिलेला आहे. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. विशेषतः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खूप वेगाने घडामोडी घडल्या. मराठा आरक्षण वाचविण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयात ते पुन्हा टिकविण्यासाठी सर्वतोपरी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला कुणाचा विरोधही नाही. मात्र, त्याचवेळी राज्यातील मागासवर्गीय लोकांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचे भिजत घोंगडे तसेच राहिले आहे. ज्या पद्धतीने मराठा व इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, त्याच पद्धतीने मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, अशा प्रकारची अपेक्षा केली जात आहे. ती गैर नाही. राज्यातील सर्वच समाजघटकांचा विकास साधणे हे कल्याणकारी राज्याचे प्रमुख कर्तव्य आहे आणि त्याच भावनेतून राज्यकर्त्यांनी पावले टाकणे गरजेचे आहे.

देशातील काही राज्यांनी मागासवर्गीय समाजातील लोकांना नोकरीत पदोन्नतीतही आरक्षण देणारे कायदे केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रानेही तशा प्रकारचा ‘महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४’ केला. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पदोन्नतीतील आरक्षण देणारा कायदा संमत करण्याचे धाडस दाखवले आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना उच्च अधिकार पदाच्या जागांवर सन्मानाने बसण्याचा मार्ग प्रशस्त केला. त्याचा लाभही अनेकांना मधल्या काळात मिळाला. मात्र, ही गोष्ट येथील सामाजिक, राजकीय व्यवस्थेला रुचणारी नसल्यामुळे अनेक लोक त्याविरोधात न्यायालयात गेले, आणि त्यातूनच या आरक्षणाला रद्द करण्याचा प्रयत्न झाला. परिणामी दिल्या गेलेल्या कायदेशीर आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बढतीचे-पदोन्नतीचे मार्ग थांबलेले आहेत. त्याचा फटका राज्यभरातील लाखो कर्मचाऱ्यांना बसलेला आहे.

भारतीय संविधानाने कलम १६ (४ ) अनुसार मागासवर्गीयांना पदोन्नतीतील घटनात्मक आरक्षण दिलेले असताना, शिवाय त्याचा समावेश मूलभूत हक्कांची निगडीत असल्यामुळे ते कोणालाही काढता येणार नाही. सामाजिक भेदभाव आणि सामाजिक व शैक्षणिक मागास या निकषाच्या आधारे आरक्षणाचे तत्व हे लागू केलेले आहे. त्यामुळे मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण देणे हे सरकारला बंधनकारकच ठरणारे आहे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ हा रद्द केलेला नसून, २५ मे २००४चा शासन निर्णय रद्द केलेला आहे. याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी माहितीचे योग्य संकलन करणे गरजेचे आहे आणि त्यानुसार शासन निर्णय काढणे आवश्यक आहे. मागील शासन निर्णयात जी चूक झालेली आहे, ती दुरुस्त करून संविधानिक पद्धतीने मांडली गेली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून मागासवर्गीयांची ३३ टक्के पदे रिक्त ठेवून त्या पदांवर मागासवर्गीयांनाच तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत विचार करावा. मागासवर्गीय समाजाला पदोन्नतीतील आरक्षण मिळायलाच हवे!

- संदेश पवार, अडरे, चिपळूण