शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी ८८० जादा गाड्यांचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून जिल्ह्यात १२०० जादा एस.टी. गाड्यातून २४,८५८ मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून जिल्ह्यात १२०० जादा एस.टी. गाड्यातून २४,८५८ मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्यातून ८८० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर (१४ सप्टेंबर) मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुरू हाेणार आहे. त्यासाठी गाड्यांचे नियाेजन करण्यात आले आहे.

गणेशाेत्सवासाठी मुंबईहून दि. ५ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे विभागातून जादा गाड्या दाखल झाल्या. कोरोनामुळे शासनाने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून, त्याचेही पालन केले जात आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनापासून मुंबई मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी १६२९ गाड्या मुंबईला रवाना केल्या होत्या. सध्या ८८० गाड्यांचे आरक्षण झाले असून, गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नियाेजन केलेल्या जादा गाड्यांमध्ये मंडणगड आगारातून ७३, दापोली ११९, खेड ९३, चिपळूण १७८, गुहागर १२४, देवरूख ९०, रत्नागिरी ९९, लांजा ४५, तर राजापूर आगारातून ५९ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. ग्रुप बुकिंगलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

------------------------

दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जादा गाड्या येतात. यावर्षी १२०० गाड्यांनी मुंबईकर आले आहेत. परतीच्या प्रवासासाठी आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ८८० गाड्यांचे आरक्षण झाले आहे. अजूनही काही प्रवासी पुढील दिवसांचे आरक्षण करत असल्याने गाड्यांची संख्या वाढू शकते.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी