शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी ८८० जादा गाड्यांचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून जिल्ह्यात १२०० जादा एस.टी. गाड्यातून २४,८५८ मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून जिल्ह्यात १२०० जादा एस.टी. गाड्यातून २४,८५८ मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्यातून ८८० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर (१४ सप्टेंबर) मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुरू हाेणार आहे. त्यासाठी गाड्यांचे नियाेजन करण्यात आले आहे.

गणेशाेत्सवासाठी मुंबईहून दि. ५ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे विभागातून जादा गाड्या दाखल झाल्या. कोरोनामुळे शासनाने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून, त्याचेही पालन केले जात आहे. पाच दिवसांच्या गणेश विसर्जनापासून मुंबई मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी १६२९ गाड्या मुंबईला रवाना केल्या होत्या. सध्या ८८० गाड्यांचे आरक्षण झाले असून, गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नियाेजन केलेल्या जादा गाड्यांमध्ये मंडणगड आगारातून ७३, दापोली ११९, खेड ९३, चिपळूण १७८, गुहागर १२४, देवरूख ९०, रत्नागिरी ९९, लांजा ४५, तर राजापूर आगारातून ५९ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. ग्रुप बुकिंगलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

------------------------

दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जादा गाड्या येतात. यावर्षी १२०० गाड्यांनी मुंबईकर आले आहेत. परतीच्या प्रवासासाठी आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ८८० गाड्यांचे आरक्षण झाले आहे. अजूनही काही प्रवासी पुढील दिवसांचे आरक्षण करत असल्याने गाड्यांची संख्या वाढू शकते.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी