शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

ओणी अणुस्कुरा मार्ग दुरुस्ती काम थांबलेलेच

By admin | Updated: May 15, 2016 00:01 IST

राजापूर तालुका : बारीक खडीचे यंदाही गूढच!

राजापूर : गतवर्षाप्रमाणेच ओणी अणुस्कुरा मार्गावर बारीक खडी आणून टाकण्यात आली आहे. पण अनेक दिवस उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने उलट-सुलट प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत.मागील वर्षीही अशाच प्रकारची खडी मार्गावर काही ठिकाणी आणून टाकण्यात आली होती. परंतु, १५ मे पासून डांबरीकरणाची कामे थांबतात. हा अनेक वर्षापासूनचा पायंडा असल्याने नंतर पावसाला सुरुवात होताच ती खडी तेथून हटवण्यात आली होती. त्याचीच पुनरावृत्ती यावर्षीही पहावयास मिळत आहे. मागील दोन आठवड्यापासून अधिक काळ असे खडीचे ढीग ओणी, पाचल मार्गावर टाकण्यात आले आहेत. आता शासनाच्या धोरणानुसार १५ मे जवळ असल्याने पुढच्या काही दिवसात ही खडी पसरुन खडीकरणाचे काम खरोखरच मार्गी लागणार आहे का? की गतवर्षीप्रमाणे ती खडी पुन्हा तेथून हटवली जाणार आहे? असा खोचक सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान चालू उन्हाळ्यात याच मार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्यात आले होते. पण त्या झालेल्या कामाचा दर्जा लक्षात घेता आगामी पावसाळ्यात हे खड्डे पुन्हा पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास गतवर्षाप्रमाणे तालुक्यातील पूर्व परिसरवासीयांना या खड्ड्यांतून प्रवास करण्याचे नशिबी येणार आहे. या संपूर्ण मार्गाचेच डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित बांधकाम विभागाने तसे न करता केवळ मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचा फार्स केला व संपूर्ण मार्गाचे डांबरीकरण करण्याचे काम लटकवून ठेवले आहे. त्याचा फटका हा आगामी पावसाळ्यात या मार्गाला बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात या परिसरातील ग्रामस्थांना खड्डेमय रस्त्यावरुनच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे आतातरी डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी)सवाल : गेल्यावर्षीची पुनरावृत्ती?गेल्यावर्षीही असाच प्रकार घडला होता. बारीक खडी आणून ठेवण्यात आली. मात्र त्यानंतर त्या खडीचे काय झाले? कुणासच ठाऊक नाही. त्याचप्रमाणे यंदाही बारीक खडी आणून ठेवण्यात आली आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे हे डांबरीकरणाचे काम कधी होणार? असा सवाल होत आहे.घाटाची दुरवस्थाअणुस्कुरा घाटाची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांबरोबरच खडीही वर आल्याने वाहन चालविणे जिकरीचे बनले आहे.