शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

माेडकळीस आलेल्या विद्युत खांबाची ग्रामस्थांकडून डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा - मोरेवाडीतील मोडकळीस आलेला विद्युत खांब धाेकादायक बनला हाेता. ग्रामस्थांनी धाेका ओळखून या ...

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा - मोरेवाडीतील मोडकळीस आलेला विद्युत खांब धाेकादायक बनला हाेता. ग्रामस्थांनी धाेका ओळखून या खांबाची डागडुजी करून जीर्ण झालेल्या या वीजखांबाला तात्पुरता आधार दिला आहे.

तालुक्यात झालेल्या वादळामुळे पाकतेकरवाडीतील विद्युत खांब मोडून पडला होता. त्यावेळी जीवितहानी होता होता टळली होती. त्यानंतर मोरेवाडी व पाकतेकरवाडीमधील गंजून जीर्ण झालेले वीजखांब बदलण्याची विनंती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

सध्या पावसाळा सुरू झाल्याने शेतीची कामे सुरू आहेत. बहुतांशी जीर्ण झालेले विद्युत खांब भातशेतीमध्ये आहेत. मुसळधार पावसात वाऱ्याचा जाेर वाढल्यास हे धाेकादायक वीजखांब काेसळण्याची भीती आहे. यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी महावितरण कंपनीच्या भरवशावर न राहता, मोरेवाडीतील ग्रामस्थांनी जाड लोखंडी सळ्या, खडी, सिमेंट व वाळू इत्यादीचा वापर करून मोडकळीस आलेल्या मोरेवाडीकडे येणाऱ्या विद्युत खांबाला महेंद्र मोरे, संजय मोरे, तुकाराम मोरे व अजय मोरे यांनी काॅंक्रिट करून तात्पुरती डागडुजी केली. त्यामुळे खांब पडण्याची शक्यता कमी झाली आहे.