शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

रत्नागिरी गॅसमधून पुन्हा ऊर्जानिर्मिती होणार

By admin | Updated: January 4, 2015 01:04 IST

हालचाली सुरू : १५ जानेवारीपासून निर्मिती शक्य

संकेत गोयथळे / गुहागरवर्षभर बंद असणारा रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. १५ जानेवारीपर्यंत प्रकल्पातील एका युनिटमधून वीजनिर्मिती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक गॅसची उपलब्धता करणे व तयार वीज कोणाला द्यायची, याबाबत नियोजन सुरू आहे.महाराष्ट्रातील विजेचे संकट दूर करण्यासाठी बुडीत गेलेल्या एन्रॉन म्हणजेच दाभोळ वीज प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करून आॅक्टोबर २००५मध्ये प्रकल्प सुरू करण्यात आला. सुरुवातीला आलेल्या अनेक अडचणींवर मात करून हा प्रकल्प चालू झाला. १,९०० मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे.२०१० ते २०१२ पर्यंत प्रकल्पातून सरासरी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. रिलायन्सच्या गोदावरी प्रकल्पातून होणारा गॅसपुरवठा कमी होऊ लागल्याने वीजनिर्मितीवर परिणाम होत होता. २०१२ व २०१३ मध्ये कमी-अधिक प्रमाणात वीजनिर्मिती होत होती. गोदावरी प्रकल्पातून २६ जानेवारी २०१२ रोजी प्रथम गॅसपुरवठा बंद झाल्याने वीजनिर्मिती बंद करण्यात आली. पुढील वर्षभर गॅस उपलब्ध होईल त्याप्रमाणे वीजनिर्मिती होत होती. डिसेंबर २०१३ला प्रकल्पातून पूर्णपणे वीजनिर्मिती बंद झाली. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करण्यात आली. अशा स्थितीत वीजनिर्मिती करणाऱ्या पॉवर ब्लॉकमधील इलेक्ट्रिक विभागातील कमी केलेले कर्मचारी काही प्रमाणात पुन्हा नियुक्त करण्यात आले आहेत. डिसेंबर २०१४मध्ये आरजीपीपीएलचे अध्यक्ष गिरीष देशपांडे यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन गॅसवर तोडगा म्हणून एलएनजीमध्ये इतर द्रव्ये मिसळून त्याची किंमत कमी करून स्वस्त गॅसवर वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करीत रत्नागिरी गॅस प्रकल्प नव्या जोमाने सुरू होईल, असे संकेत दिले होते. पुढील काही दिवसांतच या प्रकल्पाचे सरव्यवस्थापक म्हणून पूर्वी कार्यरत असलेले एनटीपीसीचे प्रमुख गर्ग प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रकल्पाला भेट देणार आहेत.