शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘बांधकाम’चा खोडा जिल्हाधिकाऱ्यांकडून दूर

By admin | Updated: November 19, 2014 23:14 IST

नवीन इमारत : जिल्हा शासकीय कार्यालये २६ जानेवारीपासून नव्या जागेत?

रत्नागिरी : बांधकाम विभागाने अंदाजपत्रकात पाणी आणि वीज यांचा समावेश केला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर्षापूर्वीच सुसज्ज झालेल्या इमारती वापराविना पडून होत्या. मात्र, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी हा खोडा दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याने आता या दोन्ही इमारतींच्या उद्घाटनाचा मुहूर्त येत्या २६ जानेवारी रोजी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी या दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १५ आॅगस्ट २०१३ रोजी या इमारतींचे उद्घाटन होणार असे म्हटले जात होते. या नव्या दोन इमारतीत कोणकोणती कार्यालये ठेवावी, यांचे वाटपही झाले आहे. या दोन्ही बिल्डिंगपैकी प्रत्येक मजल्यावर चार ब्लॉक आहेत. ‘ए’ बिल्डिंगमध्ये एकूण १२ ब्लॉकमध्ये १६ कार्यालये ठेवण्यात येणार आहेत. ‘बी’ इमारतीत १२ ब्लॉकमध्ये १५ कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांचा कारभार एकछत्री झाला, तर विविध कार्यालयांची कामे एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे जनतेचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग अंदाजपत्रक तयार करताना वीज आणि पाणीपुरवठा या दोन मुख्य गोष्टीच नमूद करायला विसरला. त्यामुळे या दोन्ही इमारती तयार होऊनही त्यात कार्यालये स्थलांतर करता येत नाहीत. गेल्या वर्षीपासून या नव्या इमारतीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, या दोन्ही इमारतीत विद्युत पुरवठा आणि पाण्याची काहीच सुविधा उपलब्ध नसल्याने या कार्यालयाला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अखेर याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नेहमीप्रमाणे सकारात्मक भूमिका घेत बांधकाम विभागाच्या चुका दुरूस्त करून इमारतीच्या उद्घाटनाचा खोडा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. गेले वर्षभर या दोन्ही इमारती ओस पडलेल्या असल्याने आता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आपल्या स्तरावर प्रयत्न केले. ते यशस्वीही झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही इमारतींमध्ये विजेचा पुरवठा मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचीही सोय होणार आहे. ही कामे आता अंतिम टप्प्यात आल्याने या दोन्ही इमारतींच्या उद्घाटनातील अडसर दूर झाला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी ही सर्व कायालये या नव्या वास्तूत जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)बिल्डिंग - बी १२ ब्लॉकमध्ये १५ कार्यालयेतळमजला : नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि संजय गांधी निराधार योजना विभाग एकाच ब्लॉकमध्ये, तसेच लेखा शाखा आणि भूसंपादन विभाग एकाच ब्लॉकमध्ये.पहिला मजला : रोजगार हमी योजना, नगररचनाकार, भूसंपादन अधिकारी, पुनर्वसन आणि नियंत्रण कक्ष (वातानुकुलीत).दुसरा मजला : पुरवठा शाखेसाठी दोन ब्लॉक, तर उर्वरित दोन ब्लॉकमध्ये जिल्हाधिकारी यांची केबिन तसेच सभागृह.अशी राहणार कार्यालयांची रचना...बिल्डिंग ए - १२ ब्लॉकमध्ये १६ कार्यालयेतळमजला : जिल्हा माहिती कार्यालय, वरिष्ठ भू-वैज्ञानिक, भू-जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सहजिल्हा उपनिबंधक वर्ग-१ मुद्रांक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र. पहिला मजला : महाराष्ट्र विकास महामंडळ आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय एकाच ब्लॉकमध्ये राहणार आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था (पदूम) आणि (पणन) एकाच भागात राहतील.दुसरा मजला : जिल्हा सांख्यिकी अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय एकाच भागात आहेत. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दुसऱ्या भागात, तर उर्वरित भागात सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र हेही एकाच भागात राहणार आहेत. शेवटच्या भागात सहायक कामगार आयुक्त यांचे कार्यालय आहे.