शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

राजकारण कराल तर याद राखा : कदम

By admin | Updated: October 5, 2015 00:16 IST

खेडमध्ये ५ तालुक्यातील जनतेसाठी शनिवारी भरणे येथील पाटीदार भवन येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

खेड : खेडसह संपूर्ण रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह संपूर्ण ग्रामपचांयती शिवसेनेच्या अधिपत्याखाली असताना जातीपातीच्या भिंती निर्माण करून शिवसेनेमध्ये समाजाचे राजकारण करण्यात आले. असं काय कारण घडलं, असा सवाल उपस्थित करीत समाजाचे राजकारण कराल तर याद राखा, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला.यावेळी त्यांचा रोख होता तो केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्याकडेच! राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या अशा धेंडांना दया दाखवू नका, असे आवाहन कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले़शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या वतीने खेडमध्ये ५ तालुक्यातील जनतेसाठी शनिवारी भरणे येथील पाटीदार भवन येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदास कदम यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. खेडमध्ये अनंत गीते आणि रामदास कदम यांच्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून विस्तव जात नाही. त्यांच्यातील राजकीय मतभेद आता विकोपाला गेले आहेत. याच पार्श्वभूमीेवर कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गीते यांचे नाव न घेता त्यांच्या दिशेने प्रहार केला. समाजाचे राजकारण करणाऱ्यांची यापुढे गय करणार नाही, असेही ते म्हणाले.यावेळी रवींद्र वायकर, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, खेड पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेडचे तालुकाप्रमुख राजा बेलोसे, खेडचे शहरप्रमुख संजय मोदी उपस्थित होते. पालकमंत्री वायकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कदम यांनी विशेष कौतुक केले. लोकोपयोगी उपक्रम राबवणारे वायकर हे खरेखुरे सेवाव्रती आहेत, असे ते म्हणाले. वंचित शेतकऱ्यांसह इतर लोकांनाही कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांनी वितरण केलेल्या रोख रक्कम आणि धान्याचा यावेळी रामदास कदम यांनी विशेष उल्लेख केला. दापोलीचे किशोर देसाई यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा उल्लेख करीत देसाई यांना लवकर आठवण झाल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. (प्रतिनिधी)