शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकरी ते थेट ग्राहक’ योजनेमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आला. यावर्षी वाशीतील एपीएमसी मार्केट सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा होता. मात्र वाशी येथे आवक ...

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आला. यावर्षी वाशीतील एपीएमसी मार्केट सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा होता. मात्र वाशी येथे आवक वाढली असतानाच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पणन महामंडळाकडून ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ विक्री साखळी तयार करण्यात आली आहे. खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत असून, पणन महामंडळाच्या या विक्री व्यवस्थेला सलग दुसऱ्या वर्षीही चांगला प्रतिसाद लाभत आहे. ऑनलाइनव्दारे हापूसचे ७५ हजार बॉक्स थेट ग्राहकांना विक्री करण्यात आले. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ विक्रीतून कोरोना संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे.

शेतकरी ग्राहकाला शेतमाल विक्री करू शकता येईल, यासाठी थेट विक्री योजना महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. त्यासाठी महामंडळाच्या bs.mfa mb.com संकेतस्थळावर बागायतदार आणि खरेदीदार यांना नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र मागणीसाठी किमान शंभर बॉक्सची अट ठेवण्यात आली होती. या पोर्टलवर रत्नागिरी जिल्ह्यातील ३५० बागायतदारांनी थेट विक्रीसाठी नावे नोंदवली होती. यामधून दोन डझनच्या २५ बॉक्सपासून ते हजार बॉक्सपर्यंतची मागणी खरेदीदारांनी केली होती. त्यानुसार बागायतदारांनी वाहतूकदारांच्या माध्यमातून तर काहींनी थेट स्वत:च्या गाडीने ग्राहकांपर्यत हापूसचे बॉक्स पोचविण्यात आले. मुंबई, पुणे, सोलापूर, बारामती, अकोल्यापर्यंत हापूस विक्रीसाठी पाठविण्यात आला.

कोरोनामुळे गतवर्षी वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. मात्र कृषी आणि पणन विभागाकडून बागायतदारांना हा दिलासादायक मार्ग दाखविण्यात आला. थेट विक्रीमुळे दर्जेदार हापूसला चांगला दर प्राप्त होत असून विक्रीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होत आहेत. ग्राहकांनी मागणी नोंदवली की तातडीने पैसेही जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांची रक्कम बुडण्याचा प्रश्न राहत नाही. या पध्दतीमुळे गतवर्षी ८० हजार बॉक्सची विक्री झाली होती. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी असतानाही गतवर्षीच्या विक्रीपर्यंत पोहचली आहे. वाशीतील फळ बाजारात हापूसचे दर गडगडल्यामुळेच थेट विक्रीसाठी चांगला प्रतिसाद लाभला. अद्याप ग्राहकांकडून मागणी होत असून शेतकऱ्यांकडून ग्राहकांना आंबा पाठविण्यात येत आहे.

गेली दोन वर्षे राज्यांतर्गत विविध जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे आंबा महोत्सव बंद आहेत. आंबा महोत्सवासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत होता. मात्र कोरोनामुळे महोत्सव शक्य नसल्याने पणन मंडळातर्फे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ साखळी योजना सुरू करण्यात आली. त्यासाठीही शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोट

पणनच्या संकेतस्थळावर ग्राहक किंवा शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. या माध्यमातून खरेदी-विक्री करण्यात येत आहे. आंब्याचा दर, दर्जाची माहिती ग्राहकाला प्राप्त होत आहे. शिवाय शेतकरीही ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देत आहेत. यावर्षी एकूणच उत्पादन कमी असताना, गतवर्षी एवढा आंबा पाठविण्यात आला आहे. अद्याप ग्राहकांकडची मागणी वाढत असल्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

- भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन महामंडळ