शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकरी ते थेट ग्राहक’ योजनेमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आला. यावर्षी वाशीतील एपीएमसी मार्केट सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा होता. मात्र वाशी येथे आवक ...

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आला. यावर्षी वाशीतील एपीएमसी मार्केट सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा होता. मात्र वाशी येथे आवक वाढली असतानाच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पणन महामंडळाकडून ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ विक्री साखळी तयार करण्यात आली आहे. खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत असून, पणन महामंडळाच्या या विक्री व्यवस्थेला सलग दुसऱ्या वर्षीही चांगला प्रतिसाद लाभत आहे. ऑनलाइनव्दारे हापूसचे ७५ हजार बॉक्स थेट ग्राहकांना विक्री करण्यात आले. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ विक्रीतून कोरोना संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे.

शेतकरी ग्राहकाला शेतमाल विक्री करू शकता येईल, यासाठी थेट विक्री योजना महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. त्यासाठी महामंडळाच्या bs.mfa mb.com संकेतस्थळावर बागायतदार आणि खरेदीदार यांना नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र मागणीसाठी किमान शंभर बॉक्सची अट ठेवण्यात आली होती. या पोर्टलवर रत्नागिरी जिल्ह्यातील ३५० बागायतदारांनी थेट विक्रीसाठी नावे नोंदवली होती. यामधून दोन डझनच्या २५ बॉक्सपासून ते हजार बॉक्सपर्यंतची मागणी खरेदीदारांनी केली होती. त्यानुसार बागायतदारांनी वाहतूकदारांच्या माध्यमातून तर काहींनी थेट स्वत:च्या गाडीने ग्राहकांपर्यत हापूसचे बॉक्स पोचविण्यात आले. मुंबई, पुणे, सोलापूर, बारामती, अकोल्यापर्यंत हापूस विक्रीसाठी पाठविण्यात आला.

कोरोनामुळे गतवर्षी वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. मात्र कृषी आणि पणन विभागाकडून बागायतदारांना हा दिलासादायक मार्ग दाखविण्यात आला. थेट विक्रीमुळे दर्जेदार हापूसला चांगला दर प्राप्त होत असून विक्रीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होत आहेत. ग्राहकांनी मागणी नोंदवली की तातडीने पैसेही जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांची रक्कम बुडण्याचा प्रश्न राहत नाही. या पध्दतीमुळे गतवर्षी ८० हजार बॉक्सची विक्री झाली होती. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी असतानाही गतवर्षीच्या विक्रीपर्यंत पोहचली आहे. वाशीतील फळ बाजारात हापूसचे दर गडगडल्यामुळेच थेट विक्रीसाठी चांगला प्रतिसाद लाभला. अद्याप ग्राहकांकडून मागणी होत असून शेतकऱ्यांकडून ग्राहकांना आंबा पाठविण्यात येत आहे.

गेली दोन वर्षे राज्यांतर्गत विविध जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे आंबा महोत्सव बंद आहेत. आंबा महोत्सवासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत होता. मात्र कोरोनामुळे महोत्सव शक्य नसल्याने पणन मंडळातर्फे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ साखळी योजना सुरू करण्यात आली. त्यासाठीही शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोट

पणनच्या संकेतस्थळावर ग्राहक किंवा शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. या माध्यमातून खरेदी-विक्री करण्यात येत आहे. आंब्याचा दर, दर्जाची माहिती ग्राहकाला प्राप्त होत आहे. शिवाय शेतकरीही ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देत आहेत. यावर्षी एकूणच उत्पादन कमी असताना, गतवर्षी एवढा आंबा पाठविण्यात आला आहे. अद्याप ग्राहकांकडची मागणी वाढत असल्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

- भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन महामंडळ