शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
2
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
3
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
4
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
5
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
6
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
7
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
10
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
11
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
12
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
13
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
14
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
15
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
17
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
18
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
19
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
20
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार

‘शेतकरी ते थेट ग्राहक’ योजनेमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आला. यावर्षी वाशीतील एपीएमसी मार्केट सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा होता. मात्र वाशी येथे आवक ...

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आला. यावर्षी वाशीतील एपीएमसी मार्केट सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा होता. मात्र वाशी येथे आवक वाढली असतानाच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पणन महामंडळाकडून ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ विक्री साखळी तयार करण्यात आली आहे. खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत असून, पणन महामंडळाच्या या विक्री व्यवस्थेला सलग दुसऱ्या वर्षीही चांगला प्रतिसाद लाभत आहे. ऑनलाइनव्दारे हापूसचे ७५ हजार बॉक्स थेट ग्राहकांना विक्री करण्यात आले. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ विक्रीतून कोरोना संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे.

शेतकरी ग्राहकाला शेतमाल विक्री करू शकता येईल, यासाठी थेट विक्री योजना महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. त्यासाठी महामंडळाच्या bs.mfa mb.com संकेतस्थळावर बागायतदार आणि खरेदीदार यांना नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र मागणीसाठी किमान शंभर बॉक्सची अट ठेवण्यात आली होती. या पोर्टलवर रत्नागिरी जिल्ह्यातील ३५० बागायतदारांनी थेट विक्रीसाठी नावे नोंदवली होती. यामधून दोन डझनच्या २५ बॉक्सपासून ते हजार बॉक्सपर्यंतची मागणी खरेदीदारांनी केली होती. त्यानुसार बागायतदारांनी वाहतूकदारांच्या माध्यमातून तर काहींनी थेट स्वत:च्या गाडीने ग्राहकांपर्यत हापूसचे बॉक्स पोचविण्यात आले. मुंबई, पुणे, सोलापूर, बारामती, अकोल्यापर्यंत हापूस विक्रीसाठी पाठविण्यात आला.

कोरोनामुळे गतवर्षी वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. मात्र कृषी आणि पणन विभागाकडून बागायतदारांना हा दिलासादायक मार्ग दाखविण्यात आला. थेट विक्रीमुळे दर्जेदार हापूसला चांगला दर प्राप्त होत असून विक्रीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होत आहेत. ग्राहकांनी मागणी नोंदवली की तातडीने पैसेही जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांची रक्कम बुडण्याचा प्रश्न राहत नाही. या पध्दतीमुळे गतवर्षी ८० हजार बॉक्सची विक्री झाली होती. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी असतानाही गतवर्षीच्या विक्रीपर्यंत पोहचली आहे. वाशीतील फळ बाजारात हापूसचे दर गडगडल्यामुळेच थेट विक्रीसाठी चांगला प्रतिसाद लाभला. अद्याप ग्राहकांकडून मागणी होत असून शेतकऱ्यांकडून ग्राहकांना आंबा पाठविण्यात येत आहे.

गेली दोन वर्षे राज्यांतर्गत विविध जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे आंबा महोत्सव बंद आहेत. आंबा महोत्सवासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत होता. मात्र कोरोनामुळे महोत्सव शक्य नसल्याने पणन मंडळातर्फे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ साखळी योजना सुरू करण्यात आली. त्यासाठीही शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोट

पणनच्या संकेतस्थळावर ग्राहक किंवा शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. या माध्यमातून खरेदी-विक्री करण्यात येत आहे. आंब्याचा दर, दर्जाची माहिती ग्राहकाला प्राप्त होत आहे. शिवाय शेतकरीही ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देत आहेत. यावर्षी एकूणच उत्पादन कमी असताना, गतवर्षी एवढा आंबा पाठविण्यात आला आहे. अद्याप ग्राहकांकडची मागणी वाढत असल्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

- भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन महामंडळ