शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

‘शेतकरी ते थेट ग्राहक’ योजनेमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आला. यावर्षी वाशीतील एपीएमसी मार्केट सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा होता. मात्र वाशी येथे आवक ...

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी लॉकडाऊन करण्यात आला. यावर्षी वाशीतील एपीएमसी मार्केट सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा होता. मात्र वाशी येथे आवक वाढली असतानाच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पणन महामंडळाकडून ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ विक्री साखळी तयार करण्यात आली आहे. खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत असून, पणन महामंडळाच्या या विक्री व्यवस्थेला सलग दुसऱ्या वर्षीही चांगला प्रतिसाद लाभत आहे. ऑनलाइनव्दारे हापूसचे ७५ हजार बॉक्स थेट ग्राहकांना विक्री करण्यात आले. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ विक्रीतून कोरोना संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे.

शेतकरी ग्राहकाला शेतमाल विक्री करू शकता येईल, यासाठी थेट विक्री योजना महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. त्यासाठी महामंडळाच्या bs.mfa mb.com संकेतस्थळावर बागायतदार आणि खरेदीदार यांना नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र मागणीसाठी किमान शंभर बॉक्सची अट ठेवण्यात आली होती. या पोर्टलवर रत्नागिरी जिल्ह्यातील ३५० बागायतदारांनी थेट विक्रीसाठी नावे नोंदवली होती. यामधून दोन डझनच्या २५ बॉक्सपासून ते हजार बॉक्सपर्यंतची मागणी खरेदीदारांनी केली होती. त्यानुसार बागायतदारांनी वाहतूकदारांच्या माध्यमातून तर काहींनी थेट स्वत:च्या गाडीने ग्राहकांपर्यत हापूसचे बॉक्स पोचविण्यात आले. मुंबई, पुणे, सोलापूर, बारामती, अकोल्यापर्यंत हापूस विक्रीसाठी पाठविण्यात आला.

कोरोनामुळे गतवर्षी वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. मात्र कृषी आणि पणन विभागाकडून बागायतदारांना हा दिलासादायक मार्ग दाखविण्यात आला. थेट विक्रीमुळे दर्जेदार हापूसला चांगला दर प्राप्त होत असून विक्रीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होत आहेत. ग्राहकांनी मागणी नोंदवली की तातडीने पैसेही जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांची रक्कम बुडण्याचा प्रश्न राहत नाही. या पध्दतीमुळे गतवर्षी ८० हजार बॉक्सची विक्री झाली होती. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी असतानाही गतवर्षीच्या विक्रीपर्यंत पोहचली आहे. वाशीतील फळ बाजारात हापूसचे दर गडगडल्यामुळेच थेट विक्रीसाठी चांगला प्रतिसाद लाभला. अद्याप ग्राहकांकडून मागणी होत असून शेतकऱ्यांकडून ग्राहकांना आंबा पाठविण्यात येत आहे.

गेली दोन वर्षे राज्यांतर्गत विविध जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे आंबा महोत्सव बंद आहेत. आंबा महोत्सवासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत होता. मात्र कोरोनामुळे महोत्सव शक्य नसल्याने पणन मंडळातर्फे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ साखळी योजना सुरू करण्यात आली. त्यासाठीही शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोट

पणनच्या संकेतस्थळावर ग्राहक किंवा शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. या माध्यमातून खरेदी-विक्री करण्यात येत आहे. आंब्याचा दर, दर्जाची माहिती ग्राहकाला प्राप्त होत आहे. शिवाय शेतकरीही ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देत आहेत. यावर्षी एकूणच उत्पादन कमी असताना, गतवर्षी एवढा आंबा पाठविण्यात आला आहे. अद्याप ग्राहकांकडची मागणी वाढत असल्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

- भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन महामंडळ