शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

गावातील पुनर्वसन वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

या दुर्घटनेत ५४ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यापैकी २४ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जवळजवळ मार्गी लागला आहे. त्यातील काही घरं ...

या दुर्घटनेत ५४ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यापैकी २४ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जवळजवळ मार्गी लागला आहे. त्यातील काही घरं तयार झाली असून, लवकरच ताब्यात दिली जाणार आहेत. मात्र, ज्या कुटुंबीयांचे तिवरे गावातच पुनर्वसन होणार आहे, त्यांच्या जागेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्याठिकाणी २० गुंठे जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु, अद्याप त्याच्या खरेदीखताची प्रक्रिया सुरू आहे.

-------------------------

कंटेनरमध्ये दोन वर्षे रहिवास

ताप्तुरते पुनर्वसन करण्यासाठी कंटेनर केबीनचा पर्याय निवडण्यात आला. ६० लाख रुपये खर्चातून ३०० स्वेअर फुटाच्या १५ कंटेनरमध्ये बाधितांचे पुनर्वसन करण्यात आले. हॉल, रूम, किचन व बाथरूमची व्यवस्था असलेल्या या कंटेनरमध्ये आजही १५ कुटुंंबे राहात आहेत. त्यांना कायमस्वरूपी घरासाठी अलोरे येथे कोयना प्रकल्प वसाहतीत २४ घरे बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये त्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.

--------------------

‘सिद्धीविनायक नगरी’ होतेय सज्ज

दोन ठेकेदारांच्या माध्यमातून प्रत्येकी १२ घरं उभारली जात आहेत. त्यासाठी सिद्धीविनायक ट्रस्टमार्फत पहिल्या टप्प्यात ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे, तर अजून सहा कोटी रुपये या संस्थेकडून प्रकल्पासाठी मंजूर केले आहेत. सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी या ‘सिद्धीविनायक नगरी’ पुनर्वसनासाठी मंजूर केला आहे. अजूनही पेढांबे येथे १६ कुटुंबीयांचे पुनर्वसन बाकी आहे. त्यासाठी दुसऱ्या टप्प्यात निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.

--------------------------------

तिवरे धरणफुटीच्या घटनेला दोन वर्षे झाली. या घटनेनंतरचा काही कालावधी वाया गेला असला, तरी पेढांबे येथे सुरु असलेले पुनर्वसनाचे काम समाधानकारकपणे सुरु आहे. आतापर्यंत २४ घरांचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. अजूनही उर्वरित घरांचा प्रश्न कायम असून, तातडीने निविदा प्रक्रिया शासनाने राबवावी.

- तानाजी चव्हाण, तिवरे

-----------------------------

तिवरे धरण काँक्रिट पद्धतीने बांधणे सद्यस्थितीत शक्य नाही. ते खूप खर्चिक होणार असल्याने पुन्हा मातीचे धरण उभारले जाणार आहे. तसा प्रस्ताव तयार केला असून, तो मान्यतेसाठी सादर केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही प्रक्रिया लांबली. मात्र, लवकरच पुढील प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

- संकेत शेट्ये, जलसंधारण विभाग, चिपळूण.

घटनाक्रम -

- रात्री ८़ ३० वाजता प्रथम तिवरे धरण भरून वाहू लागलं.

- धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने तलाठ्यांकडून खबरदारीचा इशारा.

- रात्री ९.३० वाजता धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले.

- धरण क्षेत्रातील गावांमध्ये पाणी घुसले होते.

- रात्री ११ वाजता शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल.

- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफची दोन पथके दाखल.

- अवघ्या २४ तासात १८ मृतदेह सापडले होते.

- तिवरे धरणापासून ३५ किलोमीटर अंतरावर वाशिष्ठी नदीत एका महिलेचा मृतदेह आढळला.

- बेपत्ता दुर्वा रणजित चव्हाण (दीड वर्ष) या चिमुकलीचा मृतदेह शेवटपर्यंत मिळाला नाही.

पाणी साठवण्याची क्षमता २,४५२ दशलक्ष घनफूट इतकी होती.

धरणाची लांबी ३०८ मीटर तर उंची २८ मीटर होती.

-----------------------------

दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे अनंत हरिभाऊ चव्हाण (६३), अनिता अनंत चव्हाण (५८), रणजित अनंत चव्हाण (१५), ऋतुजा अनंत चव्हाण (२५), दुर्वा रणजित चव्हाण (दीड वर्ष), आत्माराम धोंडू चव्हाण (७५), लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२), नंदाराम महादेव चव्हाण (६५), पांडुरंग धोंडू चव्हाण (५०), रवींद्र तुकाराम चव्हाण (५०), रेश्मा रवींद्र चव्हाण (४५), दशरथ रवींद्र चव्हाण (२०), वैष्णवी रवींद्र चव्हाण (१८), अनुसिया सीताराम चव्हाण (७०), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५), बळीराम कृष्णा चव्हाण (५५), शारदा बळीराम चव्हाण (४८), संदेश विश्वास धाडवे (१८), सुशील विश्वास धाडवे (४८), रणजित काजवे (३०), राकेश घाणेकर (३०).