शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प नारायण राणेच मार्गी लावतील : अनिलकुमार करंगुटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्पासाठी साडेआठ हजार एकर जमिनींची संमत्तीपत्रे देण्यात आल्याने तो प्रकल्प मूळ जागेवरच मार्गी लागला पाहिजे. यापूर्वी ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्पासाठी साडेआठ हजार एकर जमिनींची संमत्तीपत्रे देण्यात आल्याने तो प्रकल्प मूळ जागेवरच मार्गी लागला पाहिजे. यापूर्वी राज्यसभा सदस्य नारायण राणे यांच्या प्रयत्नाने अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागला होता. तशाच पध्दतीने रिफायनरी प्रकल्पही नारायण राणेच मार्गी लावू शकतील, असा आमचा ठाम विश्वास आहे. लवकरच त्यांची भेट घेणार असल्याची माहिती राजापूर तालुका प्रकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर यांनी पत्रकारांना दिली.

ऱाजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी सुमारे साडेआठ हजार एकर जमिनींची संमत्तीपत्रे स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वीच दिली आहेत. या प्रकल्पाची जागा ही पेट्रोलियम कंपनीच्या समितीने प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केल्यावरच निवडली आहे. शिवाय आवश्यक त्या तांत्रिक बाजूही प्रकल्पासाठी या परिसरात आहेत. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये व्हावा, अशी जोरदार मागणी अनिलकुमार करंगुटकर यांनी केली आहे. सुमारे साडेतीन लाख कोटींच्या या प्रस्तावित प्रकल्पामुळे राजापूर तालुक्याचा कायापालट तर होईलच शिवाय तालुक्याचा विकास जोमाने होईल, असे अनिलकुमार करंगुटकर यांनी सांगितले.

ते म्हणाले की, फेब्रुवारी २०१९मध्ये राजापूर तालुका प्रकल्प समन्वय समितीने प्रकल्प समर्थकांचा मेळावा घेतला होता. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतल्याची आठवण करंगुटकर यांनी करुन दिली. तालुक्यात पहिल्यांदा आलेला अणुऊर्जा प्रकल्प भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला होता. तशाचप्रकारे रिफायनरी प्रकल्पही ते मार्गी लावतील, असे अनिलकुमार करंगुटकर यांनी पत्रकारांना सांगितले.