शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

रिफायनरी प्रकल्प नारायण राणेच मार्गी लावतील : अनिलकुमार करंगुटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्पासाठी साडेआठ हजार एकर जमिनींची संमत्तीपत्रे देण्यात आल्याने तो प्रकल्प मूळ जागेवरच मार्गी लागला पाहिजे. यापूर्वी ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्पासाठी साडेआठ हजार एकर जमिनींची संमत्तीपत्रे देण्यात आल्याने तो प्रकल्प मूळ जागेवरच मार्गी लागला पाहिजे. यापूर्वी राज्यसभा सदस्य नारायण राणे यांच्या प्रयत्नाने अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागला होता. तशाच पध्दतीने रिफायनरी प्रकल्पही नारायण राणेच मार्गी लावू शकतील, असा आमचा ठाम विश्वास आहे. लवकरच त्यांची भेट घेणार असल्याची माहिती राजापूर तालुका प्रकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर यांनी पत्रकारांना दिली.

ऱाजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी सुमारे साडेआठ हजार एकर जमिनींची संमत्तीपत्रे स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वीच दिली आहेत. या प्रकल्पाची जागा ही पेट्रोलियम कंपनीच्या समितीने प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केल्यावरच निवडली आहे. शिवाय आवश्यक त्या तांत्रिक बाजूही प्रकल्पासाठी या परिसरात आहेत. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये व्हावा, अशी जोरदार मागणी अनिलकुमार करंगुटकर यांनी केली आहे. सुमारे साडेतीन लाख कोटींच्या या प्रस्तावित प्रकल्पामुळे राजापूर तालुक्याचा कायापालट तर होईलच शिवाय तालुक्याचा विकास जोमाने होईल, असे अनिलकुमार करंगुटकर यांनी सांगितले.

ते म्हणाले की, फेब्रुवारी २०१९मध्ये राजापूर तालुका प्रकल्प समन्वय समितीने प्रकल्प समर्थकांचा मेळावा घेतला होता. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतल्याची आठवण करंगुटकर यांनी करुन दिली. तालुक्यात पहिल्यांदा आलेला अणुऊर्जा प्रकल्प भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला होता. तशाचप्रकारे रिफायनरी प्रकल्पही ते मार्गी लावतील, असे अनिलकुमार करंगुटकर यांनी पत्रकारांना सांगितले.