शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

गतवर्षीच्या कोरोना स्थितीची होतेय पुनरावृत्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

रत्नागिरी : मार्च २०२० अखेर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून त्यात सातत्याने वाढ होत गेली. ...

रत्नागिरी : मार्च २०२० अखेर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून त्यात सातत्याने वाढ होत गेली. मार्च २०२१ अखेर ही संख्या ११ हजारांवर पोहोचली आहे. वर्षभरात तब्बल ११ हजार रुग्ण वाढले, तर या वर्षात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच आता शिमग्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढू लागली असून, शिमग्याप्रमाणेच आता आंब्याच्या हंगामात, उन्हाळी सुटीच्या कालावधीत पुन्हा या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे गतवर्षीची पुनरावृत्ती होणार आहे.

गेल्या वर्षी १८ मार्च रोजी जिल्ह्यात शृंगारतळी येथील पहिला कोरोना रुग्ण सापडला. मात्र, २३ मार्चपासून संपूर्ण देशातच संचारबंदी सुरू झाल्याने कोरोनाचा संसर्ग काही दिवस थांबला. त्यानंतर जिल्ह्यात दुसरा रुग्ण १४ दिवसांनंतर सापडला. ३ एप्रिल रोजी एक आणि त्यानंतर चार रुग्ण सापडले. यापैकी एकाचा ८ एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ६ झाली. महिना झाला तरी संचारबंदी उठेना. मुंबईत काेरोना वेगाने पसरू लागला. त्यामुळे मुंबईतील संचारबंदीला कंटाळलेले आणि कोरोनाच्या भीतीमुळे काेकणातील चाकरमानी मे महिन्यात आपल्या गावाला धावले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. जून महिन्यापासून स्थानिक मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागले. कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक होऊ लागली. गणेशोत्सवादरम्यान ही संख्या साडेसात हजारांपर्यंत पोहोचली. मार्चअखेर ही संख्या ११ हजारांवर पोहोचली आहे. ३७० रुग्णांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे.

गतवर्षीप्रमाणेच आता मार्चमध्ये होळीसाठी आलेल्या चाकरमान्यांमुळे काेरोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत खाली आलेला रुग्णसंख्येचा आलेख मार्चपासून पुन्हा वाढू लागला आहे. आता एप्रिल-मेपासून पुन्हा उन्हाळी सुटीतील पर्यटन, आंबा, फणस, काजूचा हंगाम यामुळे मुंबईकर पुन्हा गावाला बहुसंख्येने येणार आहेत. अजूनही लसीकरण, तसेच चाचण्यांबाबत नागरिकांमध्ये बेफिकिरी आणि उदासीनता असल्याने आता पुन्हा गेल्या वर्षाप्रमाणे कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग पुन्हा आरोग्य यंत्रणेसाठी कसोटी ठरणार आहे.