शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या कोरोना स्थितीची होतेय पुनरावृत्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

रत्नागिरी : मार्च २०२० अखेर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून त्यात सातत्याने वाढ होत गेली. ...

रत्नागिरी : मार्च २०२० अखेर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून त्यात सातत्याने वाढ होत गेली. मार्च २०२१ अखेर ही संख्या ११ हजारांवर पोहोचली आहे. वर्षभरात तब्बल ११ हजार रुग्ण वाढले, तर या वर्षात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच आता शिमग्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढू लागली असून, शिमग्याप्रमाणेच आता आंब्याच्या हंगामात, उन्हाळी सुटीच्या कालावधीत पुन्हा या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे गतवर्षीची पुनरावृत्ती होणार आहे.

गेल्या वर्षी १८ मार्च रोजी जिल्ह्यात शृंगारतळी येथील पहिला कोरोना रुग्ण सापडला. मात्र, २३ मार्चपासून संपूर्ण देशातच संचारबंदी सुरू झाल्याने कोरोनाचा संसर्ग काही दिवस थांबला. त्यानंतर जिल्ह्यात दुसरा रुग्ण १४ दिवसांनंतर सापडला. ३ एप्रिल रोजी एक आणि त्यानंतर चार रुग्ण सापडले. यापैकी एकाचा ८ एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ६ झाली. महिना झाला तरी संचारबंदी उठेना. मुंबईत काेरोना वेगाने पसरू लागला. त्यामुळे मुंबईतील संचारबंदीला कंटाळलेले आणि कोरोनाच्या भीतीमुळे काेकणातील चाकरमानी मे महिन्यात आपल्या गावाला धावले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. जून महिन्यापासून स्थानिक मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागले. कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक होऊ लागली. गणेशोत्सवादरम्यान ही संख्या साडेसात हजारांपर्यंत पोहोचली. मार्चअखेर ही संख्या ११ हजारांवर पोहोचली आहे. ३७० रुग्णांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे.

गतवर्षीप्रमाणेच आता मार्चमध्ये होळीसाठी आलेल्या चाकरमान्यांमुळे काेरोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत खाली आलेला रुग्णसंख्येचा आलेख मार्चपासून पुन्हा वाढू लागला आहे. आता एप्रिल-मेपासून पुन्हा उन्हाळी सुटीतील पर्यटन, आंबा, फणस, काजूचा हंगाम यामुळे मुंबईकर पुन्हा गावाला बहुसंख्येने येणार आहेत. अजूनही लसीकरण, तसेच चाचण्यांबाबत नागरिकांमध्ये बेफिकिरी आणि उदासीनता असल्याने आता पुन्हा गेल्या वर्षाप्रमाणे कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग पुन्हा आरोग्य यंत्रणेसाठी कसोटी ठरणार आहे.