शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

७१ लाखांच्या नुकसानापोटी केवळ तीन लाखांची भरपाई

By admin | Updated: November 10, 2014 23:55 IST

भौगोलिक संकट : आजवरचा अनुभव असमाधानकारकच

सुभाष कदम - चिपळूण -पावसाळ्यात कोकणात अनेक उलथापालथी होत असतात. कोकणचा भौगोलिक विचार करता येथे मुसळधार पाऊस पडतो. झाडांची पडझड होते. अनेक ठिकाणी दरडी कोसळतात. यातूनच घरांची, गोठ्यांची, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. यावर्षी ९ जनावरे व एका माणसाचा बळी गेला. ७१ लाख १६ हजार ३६७ रुपयांचे नुकसान झाले. त्यापैकी शासनाकडून ३ लाख २६ हजार २९१ रुपयांची भरपाई मिळाली आहे. यावर्षी चिपळूण तालुक्यात पावसाला उशिरा सुरुवात झाली. तब्बल १ महिना उशिरा पाऊस सुरु झाला. त्यामुळे पेरण्या वाया जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. लोक हवालदिल झाले होते. यातच पावसाने सुरुवात केली. त्यानंतरही पावसामध्ये सातत्य नव्हते. पावसामुळे ३६ गावे बाधित झाली. ३ घरे पूर्ण पडून २ लाख ९ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले. २४२ घरांचे अंशत: १६ लाख ६ हजार ३४१ रुपयांचे नुकसान झाले. याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत ५९ घरांना १ लाख २२ हजार २४१ रुपये नुकसान भरपाईची मदत देण्यात आली. पूर्णत: नुकसान झालेल्या ५ गोठ्यांना ६ हजार २५० रुपये मदत देण्यात आली, तर अंशत: नुकसान झालेल्या १२ गोठ्यांना १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. या पावसात एका पुरुषाचे अतिवृष्टीमुळे निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांना शासनातर्फे १ लाख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. विद्युतभारित तारेचा स्पर्श किंवा पावसामुळे ९ जनावरे मृत्युमुखी पडून १ लाख ६९ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले होते. पैकी २ जनावरांच्या मालकांना ३२ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. पावसामुळे ११ दुकानांचे ३४ लाख ५९ हजार ९२० रुपयांचे नुकसान झाले, तर १८ ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे १५ लाख ३० हजार ३२४ रुपये नुकसान झाले. शासनातर्फे नुकसान भरपाई मिळण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने पंचनामा झाल्यानुसार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आतापर्यंतचा अनुभव सकारात्मक नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी नुकसान ग्रस्तांना महसूल विभागाकडून भरपाई मिळविताना खुप खेटा माराव्या लागत होत्या.