शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

७१ लाखांच्या नुकसानापोटी केवळ तीन लाखांची भरपाई

By admin | Updated: November 10, 2014 23:55 IST

भौगोलिक संकट : आजवरचा अनुभव असमाधानकारकच

सुभाष कदम - चिपळूण -पावसाळ्यात कोकणात अनेक उलथापालथी होत असतात. कोकणचा भौगोलिक विचार करता येथे मुसळधार पाऊस पडतो. झाडांची पडझड होते. अनेक ठिकाणी दरडी कोसळतात. यातूनच घरांची, गोठ्यांची, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. यावर्षी ९ जनावरे व एका माणसाचा बळी गेला. ७१ लाख १६ हजार ३६७ रुपयांचे नुकसान झाले. त्यापैकी शासनाकडून ३ लाख २६ हजार २९१ रुपयांची भरपाई मिळाली आहे. यावर्षी चिपळूण तालुक्यात पावसाला उशिरा सुरुवात झाली. तब्बल १ महिना उशिरा पाऊस सुरु झाला. त्यामुळे पेरण्या वाया जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. लोक हवालदिल झाले होते. यातच पावसाने सुरुवात केली. त्यानंतरही पावसामध्ये सातत्य नव्हते. पावसामुळे ३६ गावे बाधित झाली. ३ घरे पूर्ण पडून २ लाख ९ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले. २४२ घरांचे अंशत: १६ लाख ६ हजार ३४१ रुपयांचे नुकसान झाले. याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत ५९ घरांना १ लाख २२ हजार २४१ रुपये नुकसान भरपाईची मदत देण्यात आली. पूर्णत: नुकसान झालेल्या ५ गोठ्यांना ६ हजार २५० रुपये मदत देण्यात आली, तर अंशत: नुकसान झालेल्या १२ गोठ्यांना १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. या पावसात एका पुरुषाचे अतिवृष्टीमुळे निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांना शासनातर्फे १ लाख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. विद्युतभारित तारेचा स्पर्श किंवा पावसामुळे ९ जनावरे मृत्युमुखी पडून १ लाख ६९ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले होते. पैकी २ जनावरांच्या मालकांना ३२ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. पावसामुळे ११ दुकानांचे ३४ लाख ५९ हजार ९२० रुपयांचे नुकसान झाले, तर १८ ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे १५ लाख ३० हजार ३२४ रुपये नुकसान झाले. शासनातर्फे नुकसान भरपाई मिळण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने पंचनामा झाल्यानुसार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आतापर्यंतचा अनुभव सकारात्मक नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी नुकसान ग्रस्तांना महसूल विभागाकडून भरपाई मिळविताना खुप खेटा माराव्या लागत होत्या.