शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लाल मातीत विक्रमी भुईमूग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील संजय हर्षे यांना शेतीची आवड असल्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते सातत्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील संजय हर्षे यांना शेतीची आवड असल्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते सातत्याने करीत असतात. आंबा, नारळ, सुपारी बागायतीतून उत्पन्न घेत असताना बारमाही शेती ते करीत आहेत. कोकणच्या लाल मातीत भुईमुगाचे विक्रमी उत्पादन घेता येत असल्याने हर्षे यांनी सिद्ध केले आहे.

पावसाळ्यात भात पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर जमीन मोकळी ठेवण्यापेक्षा वेगवेगळी पिके ते घेत असतात. कुळीथ, पावटा, चवळी, काकडी, कलिंगड, उडीद, टोमॅटो, हळद तसेच भुईमूग लागवड करीत आहेत. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन ते घेत असून उत्पादनाचा दर्जाही चांगला आहे.

शेतीसाठी यांत्रिक अवजारांचा वापर करतानाच आधुनिक तंत्राचा वापर अधिक उत्पन्न घेण्यासाठी करीत आहेत. प्रत्येक पीक लागवडीपूर्वी बियाणे, रोपांची निवड, लागवड पद्धती, खताची मात्रा, कीटकनाशक फवारणी, बेनणी, पाण्याची मात्रा याबाबत योग्य नियोजन करतात. हवामानातील बदलाचा पिकावर परिणाम होत असल्याने तालुका कृषी कार्यालयाकडून मार्गदर्शन घेत आहेत. भुईमूग लागवडीसाठी त्यांनी ‘कोकण भूरत्न’ या विद्यापीठ मान्यताप्राप्त वाणाची निवड केली. २० किलो बियाणे लागवडीतून त्यांना ९२० किलो भुईमुगाचे उत्पन्न मिळाले आहे. भुईमुगाचा दर्जा तसेच भरघोस उत्पन्न मिळविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

जनावरांसाठी मका

शेतीला जोड म्हणून त्यांनी दुभत्या जनावरांचे पालन केले आहे. सेंद्रिय शेतीसाठी शेणखताचा वापर होतो. मात्र, दुभत्या जनावरांना पोषक खाद्य आवश्यक असते. त्यामुळे त्यांनी मका लागवड केली आहे. भाजीपाला लागवडीमुळे ओला चारा उपलब्ध असला तरी मकामुळे गुरांना पौष्टिक खाद्य उपलब्ध होत आहे. दुधाची मात्रा चांगली असून दर्जाही उत्तम राखण्यात यशस्वी ठरले आहेत.

बारमाही भाजीपाला

आंबा, नारळ, सुपारीतून उत्पन्न मिळवत असतानाच बारमाही भाजीपाला उत्पादन घेण्यात हर्षे यशस्वी ठरले आहेत. प्रत्येकी तीन गुंठ्यांवर हळद, उडीद, कुळीथ, पावटा, लाल व पांढरी चवळी, कलिंगड, काकडी, टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. विक्रीसाठी शहराकडे धाव घेण्यापेक्षा गावातच विक्री होत आहे. याशिवाय पालेभाज्यांचे भरघोस उत्पादन ते घेत आहेत.

कोकणच्या लाल मातीत विविध प्रकारची उत्पादने घेता येतात. मात्र, त्यासाठी योग्य मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. कमी श्रमासाठी आधुनिक अवजारे, तर पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी तुषार सिंचन गरजेचे आहे. लागवड करण्यासाठी वाणाची निवड महत्त्वपूर्ण असून हवामानातील बदलाचा परिणाम पिकावर होत असल्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गांडूळ व शेणखताचा वापर करीत आहे.

- संजय हर्षे, शेतकरी, नेवरे.