शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
4
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
5
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
6
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
7
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
8
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
9
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
10
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
11
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
12
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
13
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
14
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
15
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
16
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
17
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
18
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
19
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
20
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
Daily Top 2Weekly Top 5

लाल मातीत विक्रमी भुईमूग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील संजय हर्षे यांना शेतीची आवड असल्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते सातत्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील संजय हर्षे यांना शेतीची आवड असल्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते सातत्याने करीत असतात. आंबा, नारळ, सुपारी बागायतीतून उत्पन्न घेत असताना बारमाही शेती ते करीत आहेत. कोकणच्या लाल मातीत भुईमुगाचे विक्रमी उत्पादन घेता येत असल्याने हर्षे यांनी सिद्ध केले आहे.

पावसाळ्यात भात पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर जमीन मोकळी ठेवण्यापेक्षा वेगवेगळी पिके ते घेत असतात. कुळीथ, पावटा, चवळी, काकडी, कलिंगड, उडीद, टोमॅटो, हळद तसेच भुईमूग लागवड करीत आहेत. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन ते घेत असून उत्पादनाचा दर्जाही चांगला आहे.

शेतीसाठी यांत्रिक अवजारांचा वापर करतानाच आधुनिक तंत्राचा वापर अधिक उत्पन्न घेण्यासाठी करीत आहेत. प्रत्येक पीक लागवडीपूर्वी बियाणे, रोपांची निवड, लागवड पद्धती, खताची मात्रा, कीटकनाशक फवारणी, बेनणी, पाण्याची मात्रा याबाबत योग्य नियोजन करतात. हवामानातील बदलाचा पिकावर परिणाम होत असल्याने तालुका कृषी कार्यालयाकडून मार्गदर्शन घेत आहेत. भुईमूग लागवडीसाठी त्यांनी ‘कोकण भूरत्न’ या विद्यापीठ मान्यताप्राप्त वाणाची निवड केली. २० किलो बियाणे लागवडीतून त्यांना ९२० किलो भुईमुगाचे उत्पन्न मिळाले आहे. भुईमुगाचा दर्जा तसेच भरघोस उत्पन्न मिळविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

जनावरांसाठी मका

शेतीला जोड म्हणून त्यांनी दुभत्या जनावरांचे पालन केले आहे. सेंद्रिय शेतीसाठी शेणखताचा वापर होतो. मात्र, दुभत्या जनावरांना पोषक खाद्य आवश्यक असते. त्यामुळे त्यांनी मका लागवड केली आहे. भाजीपाला लागवडीमुळे ओला चारा उपलब्ध असला तरी मकामुळे गुरांना पौष्टिक खाद्य उपलब्ध होत आहे. दुधाची मात्रा चांगली असून दर्जाही उत्तम राखण्यात यशस्वी ठरले आहेत.

बारमाही भाजीपाला

आंबा, नारळ, सुपारीतून उत्पन्न मिळवत असतानाच बारमाही भाजीपाला उत्पादन घेण्यात हर्षे यशस्वी ठरले आहेत. प्रत्येकी तीन गुंठ्यांवर हळद, उडीद, कुळीथ, पावटा, लाल व पांढरी चवळी, कलिंगड, काकडी, टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. विक्रीसाठी शहराकडे धाव घेण्यापेक्षा गावातच विक्री होत आहे. याशिवाय पालेभाज्यांचे भरघोस उत्पादन ते घेत आहेत.

कोकणच्या लाल मातीत विविध प्रकारची उत्पादने घेता येतात. मात्र, त्यासाठी योग्य मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. कमी श्रमासाठी आधुनिक अवजारे, तर पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी तुषार सिंचन गरजेचे आहे. लागवड करण्यासाठी वाणाची निवड महत्त्वपूर्ण असून हवामानातील बदलाचा परिणाम पिकावर होत असल्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गांडूळ व शेणखताचा वापर करीत आहे.

- संजय हर्षे, शेतकरी, नेवरे.