शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

ई-पाससाठी बहुतेकांकडून रुग्णालयाचेच कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असून, यासाठी दररोज पाचशे अर्ज येत आहेत. रुग्णालयात जायचे आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असून, यासाठी दररोज पाचशे अर्ज येत आहेत. रुग्णालयात जायचे आहे, हेच कारण बहुतांश अर्जांमध्ये नमूद असून, त्याची शहानिशा करूनच परवानगी दिली जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी पासची आवश्यकता आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर गावी जाण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर शहरात जाण्यासाठी २३ एप्रिल ते ४ मे पर्यंत पोलीस खात्याकडे ७५०० पास आले. त्यातले ५०२ पास मंजूर झाले, तर ७२८४ इतके पास नामंजूर केले, तर अजून ११ पास प्रलंबित आहेत.

ई-पाससाठी कसा करावा अर्ज

ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर जाऊन ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते जिल्हा पोलीस विभाग निवडावा.

त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभाचे ठिकाण ते अंतिम प्रवासाचे ठिकाण व सोबत असलेल्या प्रवाशांची संख्या व माहिती.

ही कागदपत्रे हवीत

लग्नकार्य असेल, तर लग्नपत्रिका, शासनाने दिलेल्या परवानगीची प्रत, कोरोना चाचणी अहवालची प्रत (ॲन्टिजेन किंवा आरटीपीसीआर), हाॅस्पिटलचे काम असेल, तर त्याची कागदपत्रे, प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या आधारकार्डची प्रत ही कागादपत्रे जोडावी लागतात. जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल, तर त्याचा मृत्यूचा दाखल्याची प्रत, नोकरीला रुजू व्हायचे असेल, तर त्याच्या जाॅयनिंग लेटरची प्रत आवश्यक.

२४ तासांत ई-पासला परवानगी

ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर त्या अर्जाचा आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाते. पोलीस मुख्यालयामार्फत त्या अर्जाची तसेच जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून प्रवासाच्या तारखेपर्यंत २४ तासांत मंजुरी दिली जाते. पण मेडिकल इर्मजन्सी असेल, तर १ तासातही पास मंजूर केला जातो.

नाकाबंदी ठिकाणी ई-पासची चौकशी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्ट ठिकाणी ई-पास शिवाय जिल्ह्यात यायला व जिल्ह्यातून बाहेर जायला परवानगी नाही. नाकाबंदी ठिकाणी प्रत्येक गाडीची कसून चौकशी केली जात आहे.