शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ई-पाससाठी बहुतेकांकडून रुग्णालयाचेच कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असून, यासाठी दररोज पाचशे अर्ज येत आहेत. रुग्णालयात जायचे आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असून, यासाठी दररोज पाचशे अर्ज येत आहेत. रुग्णालयात जायचे आहे, हेच कारण बहुतांश अर्जांमध्ये नमूद असून, त्याची शहानिशा करूनच परवानगी दिली जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी पासची आवश्यकता आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर गावी जाण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर शहरात जाण्यासाठी २३ एप्रिल ते ४ मे पर्यंत पोलीस खात्याकडे ७५०० पास आले. त्यातले ५०२ पास मंजूर झाले, तर ७२८४ इतके पास नामंजूर केले, तर अजून ११ पास प्रलंबित आहेत.

ई-पाससाठी कसा करावा अर्ज

ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर जाऊन ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते जिल्हा पोलीस विभाग निवडावा.

त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभाचे ठिकाण ते अंतिम प्रवासाचे ठिकाण व सोबत असलेल्या प्रवाशांची संख्या व माहिती.

ही कागदपत्रे हवीत

लग्नकार्य असेल, तर लग्नपत्रिका, शासनाने दिलेल्या परवानगीची प्रत, कोरोना चाचणी अहवालची प्रत (ॲन्टिजेन किंवा आरटीपीसीआर), हाॅस्पिटलचे काम असेल, तर त्याची कागदपत्रे, प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या आधारकार्डची प्रत ही कागादपत्रे जोडावी लागतात. जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल, तर त्याचा मृत्यूचा दाखल्याची प्रत, नोकरीला रुजू व्हायचे असेल, तर त्याच्या जाॅयनिंग लेटरची प्रत आवश्यक.

२४ तासांत ई-पासला परवानगी

ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर त्या अर्जाचा आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाते. पोलीस मुख्यालयामार्फत त्या अर्जाची तसेच जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून प्रवासाच्या तारखेपर्यंत २४ तासांत मंजुरी दिली जाते. पण मेडिकल इर्मजन्सी असेल, तर १ तासातही पास मंजूर केला जातो.

नाकाबंदी ठिकाणी ई-पासची चौकशी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्ट ठिकाणी ई-पास शिवाय जिल्ह्यात यायला व जिल्ह्यातून बाहेर जायला परवानगी नाही. नाकाबंदी ठिकाणी प्रत्येक गाडीची कसून चौकशी केली जात आहे.