शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

चौरंगी लढतीतच कळणार खरी ताकद

By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST

युती फुटली, आघाडीत बिघाडी : मुख्य लढत शिवसेना-राष्ट्रवादीत होण्याची शक्यता

रत्नागिरी : महायुतीत झालेली फाटाफूट आणि आघाडीत झालेली बिघाडी यामुळे आता चौरंगी लढत निश्चित झाली आहे. जिल्ह्यात कोणत्याही मतदार संघावर कुठल्या एका पक्षाची मक्तेदारी नाही. विद्यमान आमदारांच्या विजयात युती किंवा आघाडीचाच वाटा आहे. आता चारही पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहणार असल्याने जिल्ह्यात खरी ताकद नेमकी कोणाची आहे, हे नेमकेपणाने समोर येईल. त्यातही चार पक्ष समोर आले तरी मुख्य लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्येच होईल, असे अपेक्षित आहे.जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांमध्ये तीन ठिकाणी युतीचे आणि दोन ठिकाणी आघाडीचे आमदार आहेत. या पाचही आमदारांच्या विजयात मित्रपक्षाचा वाटा आहे. त्यामुळे आता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल.रत्नागिरी मतदार संघरत्नागिरीत राष्ट्रवादीचा आमदार असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीला शिवसेनेची अंतर्गत मदत मिळत होती. आता शिवसेनाही स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याने राष्ट्रवादीला एकट्यालाच निवडणुकीला सामोरे जावे लागेल. राष्ट्रवादीकडून उदय सामंत आणि भाजपकडून बाळ माने यांची नावे निश्चितच मानली जात आहेत. आता काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रसाद तथा बाबू पाटील आणि बंटी वणजू यांची तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आणि माजी तालुकाप्रमुख उदय बने यांची नावे चर्चेत आहेत.राजापूर-लांजा मतदार संघशिवसेनेकडे असलेल्या या मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद तुलनेने कमी आहे. त्यामुळे येथील लढत शिवसेना विरूद्ध काँग्रेस अशी असेल. येथे शिवसेनेकडून राजन साळवी आणि काँग्रेसकडून राजन देसाई यांचे नाव नक्की झाले आहे तर आता राष्ट्रवादीकडून अजित यशवंतराव यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदार संघसध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादीकडून शेखर निकम यांचे नाव नक्की आहे. या तालुक्यात काँग्रेसची ताकद कमी असली तरी लियाकत शाह आणि रश्मी कदम यांची नावे उमेदवारीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकम यांना तोटा होऊ शकतो. या तालुक्यातही भाजपची ताकद कमी असल्याने मुख्य लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना अशीच होईल, हे निश्चित आहे. भाजपकडून माधव गवळी किंवा गणेश चाचे यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.गुहागर-खेड मतदार संघमहाराष्ट्राचे कामगार मंत्री भास्कर जाधव यांनी येथे राष्ट्रवादीकडून पुन्हा उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपकडून विनय नातू यांचे नाव निश्चित आहे. गतवेळी या मतदार संघात शिवसेना-भाजपची मते फुटल्यामुळे भास्कर जाधव निवडून आले होते. आता शिवसेनेकडून रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम यांचे नाव चर्चेत आहे. युतीची मते फुटणार असल्याने जाधव यांना फायदा होण्याची शक्यता आहे. अर्थात यावेळी जाधव यांना काँग्रेसकडून कसलेच सहकार्य मिळणार नाही, उलट काँग्रेसकडून उमेदवार उभा राहिला तर जाधव यांची मते कमी होण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसकडून संदीप सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.दापोली-मंडणगड मतदार संघयेथे विद्यमान आमदार सूर्यकांत दळवी आहेत. भाजपची ताकद कमी असली तरी ती शिवसेनेला सहाय्य करणारी आहेत. भाजपकडून येथे तालुकाध्यक्ष केदार साठे यांचे नाव चर्चेत आहे. गेली २५ वर्षे आघाडीपैकी काँग्रेसकडे हा मतदार संघ आहे. मात्र त्यांना विजय मिळवता आलेला नाही. आता काँग्रेसकडून या मतदार संघासाठी माजी जिल्हाध्यक्ष सुजित झिमण यांचे नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादीनेही या मतदार संघाची मागणी केली आहे. येथे संजय कदम आणि किशोर देसाई हे राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार इच्छुक आहेत.(प्रतिनिधी)उमेदवारांची शोधाशोधठाम विजयाचा दावा करणे कोणत्याही पक्षाला अशक्यजिल्ह्यात तुलनेने भाजप आणि काँग्रेसची ताकद कमीशिवसेना जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकावरचा पक्षशिवसेनाशी सामना करण्याची ताकद केवळ राष्ट्रवादीकडेयुती आणि आघाडी फिस्कटण्याची शक्यता कोणत्याही कार्यकर्त्यांना वाटत नव्हती. जागा वाटपाचे वाद सुरू असले तरी ते पेल्यातील वादळ ठरतील, असे वाटत होते. पण हे वाद विकोपाला गेल्याने आता काही ठिकाणी उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे.