शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील धान्य दुकानांची रवींद्र चव्हाण करणार पाहणी

By admin | Updated: July 15, 2017 14:52 IST

दापोलीत आढावा बैठक : लोकाभिमुख कामे करण्याच्या सूचना

आॅनलाईन लोकमतदापोली (जि. रत्नागिरी), दि. १५ : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी भरलेल्या करातूनच राज्याचा कारभार चालवला जात असून, शासकीय यंत्रणा ही सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यास बांधिल असून, अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोलीतील आढावा बैठकीत बोलताना केले.दापोली, खेड व मंडणगडातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोली येथे घेतली. या आढावा बैठकीत पुरवठा विभागाचा आढावा घेताना रेशन दुकानांसंदर्भात जनतेच्या किती तक्रारी अद्याप आपल्यापर्यंत आल्या आहेत, असे चव्हाण यांनी विचारले असता, तीनही तालुक्यांतील पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रारी नसल्याचे सांगितले. रेशन दुकानदारांकडून सर्व नियमांचे पालन होते का, अशी विचारणाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केली. यावर रेशन दुकानांसंदर्भात एकही तक्रार नाही, असे सांगितले. यावर चव्हाण यांनी अशा दुकानांची पाहणी आपण पुढील भेटीत करु, असे सांगितले.टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्याबाबत काय उपाययोजना केल्या असे चव्हाण यांनी विचारले असता, अधिकाऱ्यांनी या गावांमध्ये तळी खोदण्यात येणार असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितल्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी पावसाळ्यात तळी खोदणार का? असे विचारले. यावेळी चव्हाण म्हणाले की, सर्वसामान्यांच्या कराचा पैसा विकासकामांसाठी वापरला जातो. त्यामुळे त्याचा विनियोग योग्यठिकाणी होतो की नाही, यावर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी माजी आमदार बाळ माने, जिल्हा सरचिटणीस केदार साठे, शशिकांत चव्हाण, सचिन थोरे, दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव, मंडणगड व खेड तहसीलदार, पुरवठा अधिकारी, बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले, पोलीस निरीक्षक अनिल लाड उपस्थित होते.