शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘खंबाटा’चे कोकणातील कर्मचारी करणार राऊत यांचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:39 IST

रत्नागिरी : अडीच वर्षांपूर्वी खंबाटा एव्हिएशन कंपनी संगनमताने रातोरात बंद करून या कंपनीत भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार ...

रत्नागिरी : अडीच वर्षांपूर्वी खंबाटा एव्हिएशन कंपनी संगनमताने रातोरात बंद करून या कंपनीत भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी २७६३ कामगारांना देशोधडीला लावले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही विनायक राऊत यांच्या संस्थेला खंबाटा एव्हिएशनकडून थेटपणे एक मोठ्या रकमेचा धनादेश मिळाला होता, असा आरोप केला होता. या कंपनीचे ६० टक्के कामगार हे कोकणातील असून ते गावोगावी जाऊन खासदार राऊत यांचा खरा चेहरा मतदारांसमोर ठेवणार आहेत. राऊत यांना त्यांच्या प्रश्नांची उतरे द्यावीच लागतील, असे स्वाभिमानचे रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवार नीलेश राणे यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी नीलेश राणे याच्यासोबत उपस्थित खंबाटा कंपनीतील कर्मचाऱ्यांनीही पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. कंपनीचे कर्मचारी सुनील तळेकर म्हणाले की, कंपनी अडीच वर्षांपूर्वी बंद पडूनही कामगारांचे सहा महिन्यांचे पगार, भविष्य निर्वाह निधी, लिव्ह एन्कॅशमेंट व अन्य फायदे अजूनही मिळालेले नाहीत. त्यातील अनेक कामगारांनी गेल्या अडीच वर्षात आर्थिक समस्येमुळे आत्महत्या केल्या. या सर्व स्थितीला विनायक राऊत हे जबाबदार आहेत. असे असतानाही त्यांनाच रत्नागिरी मतदारसंघातून सेना पक्षप्रमुखांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. राऊत यांच्या भ्रष्टाचाराचे ठाकरे यांनी समर्थनच केले आहे, असा आरोप सुनील तळेकर यांनी केला आहे. राऊत यांनी कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत त्याच जागेत बडस एव्हिएशन कंपनी येण्यास मदत केली, असे तळेकर म्हणाले.कर्मचारी विश्वनाथ दळवी म्हणाले, खंबाटा बंद झाल्याने कर्मचाऱ्यांवर अवलंबून ११ ते १२ हजार लोकांना राऊत यांनी एका रात्रीत रस्त्यावर आणले आहे. कंपनी २०१६ला बंद झाली, त्यामागील खरा सूत्रधार विनायक राऊत हेच आहेत. खंबाटाचे पूर्ण युनिट राऊत हे पाहात होते. कर्मचाºयांच्या येणे असलेल्या रकमेबाबत राऊत यांनी आजपर्यंत आम्हाला उत्तर दिलेले नाही, असे दळवी म्हणाले.राऊत यांना यावेळी मत मागण्याचा अधिकारच नाही. त्यांना घरी उभेही करू नका, असे आम्ही सर्व कर्मचारी मतदारांना आवाहन करणार आहोत. ज्या ज्यावेळी आम्ही राऊत, पक्षप्रमुख ठाकरे यांना भेटलो त्या त्यावेळी पाहतो, करतो, असे सांगून आजपर्यंत काहीच केलेले नाही. भेट नाकारणे, उडवाउडवी सुरूच आहे. कामगारांबाबत राऊत व सेनेला सोयरसूतक नाही. त्यामुळे या प्रकरणी राऊत यांच्याबरोबर पक्षप्रमुख ठाकरे हेसुध्दा गुन्हेगार आहेत, असा आरोप दळवी यांनी केला.