शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

पावसातही रत्नागिरीकरांच्या घशाला कोरड

By admin | Updated: September 26, 2016 23:15 IST

रत्नागिरी नगरपरिषद : सुधारित पाणी योजना झाली ‘हवा हवाई’

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी -पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून टाहो फोडणाऱ्या रत्नागिरीवासीयांच्या नशिबी यावर्षीही निराशाच आली आहे. मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे जुनाट व खराब झाले आहे. त्यामुळे शीळ धरण भरून वाहात असतानाही शहरात काही ठिकाणचे नळ कोरडे आहेत, तर अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने धरण उशाला, कोरड घशाला अशी रत्नागिरीवासीयांची स्थिती झाली आहे. रत्नागिरी शहराला शीळ धरण, पानवल धरणातून मुख्यत्वे पाणीपुरवठा केला जातो. शीळ धरणातून वर्षभर शहराला पाणी पुरविले जाते. पानवल धरणाचे पाणी फेब्रुवारी, मार्च महिन्यात संपुष्टात येते. एमआयडीसीकडून काही प्रमाणात शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहरात सध्या ९५००पेक्षा अधिक नळ जोडण्या आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत बिघाड झाला आहे. शीळ धरणावरून रत्नागिरीतील साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्राकडे येणारी मुख्य जलवाहिनी गंजल्याने बाद झाली आहे. जागोजागी या जलवाहिनीला गळती असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तसेच गळतीमुळे पाण्याचा दाबही कमी होतो. शहरातील पाणी कमी दाबाने येण्यामागे थेटपणे देण्यात आलेल्या जोडण्या हे मुख्य कारण आहे. जलशुध्दिकरण केंद्रातून साठवण टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते. मात्र, त्याच जलवाहिन्यांवर थेटपणे जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्णपणे भरत नाहीत व पाणी कमी दाबाने येते. पाणीपुरवठा योग्यरितीने व्हावा, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून शहरवासीय टाहो फोडत आहेत. मात्र, पालिकेत सत्तेवर आलेल्या कारभाऱ्यांना नागरिकांच्या घशाला पडलेली ही कोरड अद्याप दिसली नाही, अशी टीका होत आहे. नगरपरिषदेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. येत्या डिसेंबरमध्ये निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांना आता रत्नागिरीकरांच्या समस्यांचा उमाळा येऊ लागला आहे. पालिकेत भाजपचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे शहरात ६८ कोटी खर्चाची सुधारित पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये शीळ धरणावरील जलवाहिनी बदलणे, पानवल धरणाची सुधारणा करणे, शहरातील वितरण वाहिन्या बदलणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. या योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, त्यात ५० त्रुटी आढळल्याने हा प्रस्ताव पुन्हा जीवन प्राधिकरणकडे आला आहे. या त्रुटींची पूर्तता कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून, निवडणुकीआधी योजनेचा आरंभ होण्याची घोषणा करण्यात आली असली तरी ही योजना ‘हवा हवाई’ झाल्याची चर्चा आहे. चर्चेला ऊत : सुधारित पाणी योजनेचा बार फुसका?रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेचा ६८ कोटींचा हा प्रस्ताव तयार करण्यासाठी व तांत्रिक मंजुरीसाठी जीवन प्राधिकरणने नगरपरिषदेकडून ११ लाख शुल्काची वसुली केली आहे, तरीही ५० त्रुटी कशा काय राहिल्या, असा प्रश्न आता रत्नागिरीकरांतून केला जात आहे. जुनी जलवाहिनी तशीच ठेवून नवीन जलवाहिनी टाकायची, असेही या प्रस्तावात नमूद आहे. असंख्य त्रुटींमुळे परत आलेल्या या प्रस्तावाच्या पूर्ततेला आता अधिक वेळ लागणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे निवडणुकीआधी या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ करण्याचा बार फुसका ठरणार काय, अशी चर्चाही आता रत्नागिरीत रंगली आहे.