शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

पावसातही रत्नागिरीकरांच्या घशाला कोरड

By admin | Updated: September 26, 2016 23:15 IST

रत्नागिरी नगरपरिषद : सुधारित पाणी योजना झाली ‘हवा हवाई’

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी -पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून टाहो फोडणाऱ्या रत्नागिरीवासीयांच्या नशिबी यावर्षीही निराशाच आली आहे. मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे जुनाट व खराब झाले आहे. त्यामुळे शीळ धरण भरून वाहात असतानाही शहरात काही ठिकाणचे नळ कोरडे आहेत, तर अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने धरण उशाला, कोरड घशाला अशी रत्नागिरीवासीयांची स्थिती झाली आहे. रत्नागिरी शहराला शीळ धरण, पानवल धरणातून मुख्यत्वे पाणीपुरवठा केला जातो. शीळ धरणातून वर्षभर शहराला पाणी पुरविले जाते. पानवल धरणाचे पाणी फेब्रुवारी, मार्च महिन्यात संपुष्टात येते. एमआयडीसीकडून काही प्रमाणात शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहरात सध्या ९५००पेक्षा अधिक नळ जोडण्या आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत बिघाड झाला आहे. शीळ धरणावरून रत्नागिरीतील साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्राकडे येणारी मुख्य जलवाहिनी गंजल्याने बाद झाली आहे. जागोजागी या जलवाहिनीला गळती असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तसेच गळतीमुळे पाण्याचा दाबही कमी होतो. शहरातील पाणी कमी दाबाने येण्यामागे थेटपणे देण्यात आलेल्या जोडण्या हे मुख्य कारण आहे. जलशुध्दिकरण केंद्रातून साठवण टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते. मात्र, त्याच जलवाहिन्यांवर थेटपणे जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्णपणे भरत नाहीत व पाणी कमी दाबाने येते. पाणीपुरवठा योग्यरितीने व्हावा, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून शहरवासीय टाहो फोडत आहेत. मात्र, पालिकेत सत्तेवर आलेल्या कारभाऱ्यांना नागरिकांच्या घशाला पडलेली ही कोरड अद्याप दिसली नाही, अशी टीका होत आहे. नगरपरिषदेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. येत्या डिसेंबरमध्ये निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांना आता रत्नागिरीकरांच्या समस्यांचा उमाळा येऊ लागला आहे. पालिकेत भाजपचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे शहरात ६८ कोटी खर्चाची सुधारित पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये शीळ धरणावरील जलवाहिनी बदलणे, पानवल धरणाची सुधारणा करणे, शहरातील वितरण वाहिन्या बदलणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. या योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, त्यात ५० त्रुटी आढळल्याने हा प्रस्ताव पुन्हा जीवन प्राधिकरणकडे आला आहे. या त्रुटींची पूर्तता कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून, निवडणुकीआधी योजनेचा आरंभ होण्याची घोषणा करण्यात आली असली तरी ही योजना ‘हवा हवाई’ झाल्याची चर्चा आहे. चर्चेला ऊत : सुधारित पाणी योजनेचा बार फुसका?रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेचा ६८ कोटींचा हा प्रस्ताव तयार करण्यासाठी व तांत्रिक मंजुरीसाठी जीवन प्राधिकरणने नगरपरिषदेकडून ११ लाख शुल्काची वसुली केली आहे, तरीही ५० त्रुटी कशा काय राहिल्या, असा प्रश्न आता रत्नागिरीकरांतून केला जात आहे. जुनी जलवाहिनी तशीच ठेवून नवीन जलवाहिनी टाकायची, असेही या प्रस्तावात नमूद आहे. असंख्य त्रुटींमुळे परत आलेल्या या प्रस्तावाच्या पूर्ततेला आता अधिक वेळ लागणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे निवडणुकीआधी या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ करण्याचा बार फुसका ठरणार काय, अशी चर्चाही आता रत्नागिरीत रंगली आहे.