शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

रत्नागिरी : फळपीक परताव्याची प्रतीक्षाच

By admin | Updated: September 23, 2014 23:56 IST

विमा कंपन्यांची दिरंगाई : जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

रत्नागिरी : हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली. परंतु या विमा कंपन्यांकडून अद्याप विमा परतावा जाहीर न केल्याने जिल्ह्यातील ३ हजार २८३ शेतकरी वंचित राहिले आहेत. ४०,९१४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला होता. परंतु विमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे शेतकरीवर्ग अद्याप प्रतीक्षेत असलेला दिसून येत आहे.हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली. समुद्र किनाऱ्यापासून १५ किलोमीटरच्या आतील अंतरावर महसूल मंडलांमध्ये ही योजना राबवण्यात आली. रत्नागिरी, पावस, खेडशी, जयगड, फणसोप, कोतवडे, मालगुंड, तरवळ, पाली या नऊ महसूल मंडलामध्ये योजना कार्यान्वित करण्यात आली. अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेडतर्फे कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना सक्तीची करण्यात आली होती. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक होती. जिल्ह्यातील २९४८ हेक्टर आंबा क्षेत्रावरील ३,१७० शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. ११,४३४ हेक्टर काजू क्षेत्रावरील ११३ लाभार्थी शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेतला होता. वास्तविक यावर्षी विमा योजनेसाठी केवळ मर्यादित कालावधी देण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद लाभला नाही. कृ षी अधिकाऱ्यांकडे धाव घेतलेल्या शेतकऱ्यांचेच अर्ज भरुन घेण्यात आले होते. १८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर इतकाच कालावधी देण्यात आल्याने शेतकरी उपेक्षित राहिले.फळपीक विमा संरक्षण कालावधी निर्धारित केलेल्या वेळेत अधिक तापमान, अवेळीचा अधिक पाऊस, नीच्चांकी तापमान या गोष्टींवर आधारित विमा योजना लागू करण्यात आली. हवामानावर आधारित फळपिकांवर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे उद्दिष्ट असतानासुद्धा ज्या शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेतला त्यांना अद्याप परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. आंब्याचा हंगाम लोटून चार महिने झाले तरीदेखील विमा कंपन्यांकडून शून्य प्रतिसाद दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये या योजनेबद्दल शंका निर्माण झाली आहे.विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी नॉट रिचेबल आल्याने एकूणच या विमा योजनेविषयी शेतकरीवर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)३ हजार २८३ शेतकरी वंचित कोकणातील आंबा बागायतदारांना हवामानाचा फटका बसतो. या हवामानामुळे शेतकरी, बागायतदार चिंतेत सापडतो. त्याला विम्याचे सुरक्षा कवच देण्याच्या हेतूने सुरू झालेल्या विमा परताव्यातच आता हा बागायतदार अडकला असून, अनेक शेतकरी वंचितच राहिले आहेत.समुद्र किनाऱ्यापासून १५ किलोमीटरच्या कक्षेत ही योजना राबविली जाणार.४१ हजार हेक्टर क्षेत्राचा काढला होता विमा. ९ महसुली मंडलात योजना केली होती कार्यान्वित.कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना होती सक्तीची. महिनाभराचाच कालावधी दिल्याने अनेक शेतकरी योजनेपासून उपेक्षित. ४ महिन्यानंतरही विमा कंपन्यांकडून प्रतिसाद नाही.शेतकरीवर्गामध्ये योजनेबाबत शंका उपस्थित. शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात अपयश.