शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रत्नागिरी : फळपीक परताव्याची प्रतीक्षाच

By admin | Updated: September 23, 2014 23:56 IST

विमा कंपन्यांची दिरंगाई : जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

रत्नागिरी : हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली. परंतु या विमा कंपन्यांकडून अद्याप विमा परतावा जाहीर न केल्याने जिल्ह्यातील ३ हजार २८३ शेतकरी वंचित राहिले आहेत. ४०,९१४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला होता. परंतु विमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे शेतकरीवर्ग अद्याप प्रतीक्षेत असलेला दिसून येत आहे.हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात आली. समुद्र किनाऱ्यापासून १५ किलोमीटरच्या आतील अंतरावर महसूल मंडलांमध्ये ही योजना राबवण्यात आली. रत्नागिरी, पावस, खेडशी, जयगड, फणसोप, कोतवडे, मालगुंड, तरवळ, पाली या नऊ महसूल मंडलामध्ये योजना कार्यान्वित करण्यात आली. अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेडतर्फे कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना सक्तीची करण्यात आली होती. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक होती. जिल्ह्यातील २९४८ हेक्टर आंबा क्षेत्रावरील ३,१७० शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. ११,४३४ हेक्टर काजू क्षेत्रावरील ११३ लाभार्थी शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेतला होता. वास्तविक यावर्षी विमा योजनेसाठी केवळ मर्यादित कालावधी देण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद लाभला नाही. कृ षी अधिकाऱ्यांकडे धाव घेतलेल्या शेतकऱ्यांचेच अर्ज भरुन घेण्यात आले होते. १८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर इतकाच कालावधी देण्यात आल्याने शेतकरी उपेक्षित राहिले.फळपीक विमा संरक्षण कालावधी निर्धारित केलेल्या वेळेत अधिक तापमान, अवेळीचा अधिक पाऊस, नीच्चांकी तापमान या गोष्टींवर आधारित विमा योजना लागू करण्यात आली. हवामानावर आधारित फळपिकांवर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे उद्दिष्ट असतानासुद्धा ज्या शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेतला त्यांना अद्याप परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. आंब्याचा हंगाम लोटून चार महिने झाले तरीदेखील विमा कंपन्यांकडून शून्य प्रतिसाद दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये या योजनेबद्दल शंका निर्माण झाली आहे.विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी नॉट रिचेबल आल्याने एकूणच या विमा योजनेविषयी शेतकरीवर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)३ हजार २८३ शेतकरी वंचित कोकणातील आंबा बागायतदारांना हवामानाचा फटका बसतो. या हवामानामुळे शेतकरी, बागायतदार चिंतेत सापडतो. त्याला विम्याचे सुरक्षा कवच देण्याच्या हेतूने सुरू झालेल्या विमा परताव्यातच आता हा बागायतदार अडकला असून, अनेक शेतकरी वंचितच राहिले आहेत.समुद्र किनाऱ्यापासून १५ किलोमीटरच्या कक्षेत ही योजना राबविली जाणार.४१ हजार हेक्टर क्षेत्राचा काढला होता विमा. ९ महसुली मंडलात योजना केली होती कार्यान्वित.कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना होती सक्तीची. महिनाभराचाच कालावधी दिल्याने अनेक शेतकरी योजनेपासून उपेक्षित. ४ महिन्यानंतरही विमा कंपन्यांकडून प्रतिसाद नाही.शेतकरीवर्गामध्ये योजनेबाबत शंका उपस्थित. शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात अपयश.