शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विभागाला ‘अ’ श्रेणी

By admin | Updated: November 23, 2014 23:55 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळ : उल्लेखनीय कामगिरीची घेतली दखल

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रत्नागिरी विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘अ’ श्रेणी बहाल केली आहे. राज्यातील ३१ एस. टी. विभागांचा महामंडळाकडून नव्याने सर्वे करून यावर्षी १८ विभागाना ‘अ’ श्रेणी दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी विभागाचा समावेश असून, रत्नागिरी विभागाला तसे परिपत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.रत्नागिरी विभाग नेहमी ‘क’ व ‘ब’ श्रेणी मध्ये असताना यावर्षी ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विभाग नियंत्रक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी वाढवा अभियान राबवून विभागाचे उत्पन्न वाढविण्यात यश मिळविले आहे. पूर्वी विभागाचे प्रतिदिन ५० लाखांपर्यंत उत्पन्न होते. परंतु यावर्षी उत्पन्न ६५ लाख इतके झाले आहे.विभागात ७९० गाड्या असून, दररोज ४५०० इतक्या फेऱ्या आहेत. दररोज २ लाख १६ हजार किलोमीटर इतका प्रवास होतो. अनेक ठिकाणी सुमारे ५० हून अधिक जादा गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, निवडणूक, तसेच ऊन्हाळी सुटीचे योग्य नियोजन करण्यात आल्याने ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.कर्मचाऱ्यांमधील मरगळ झटकत असताना कामचुकार कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली सुरूवातीच्या काळात केली. मात्र, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता विभाग नियंत्रक देशमुख यांनी घेतल्याने उत्पन्नात वाढ झाली. विनाअपघात सेवा, स्वच्छ व सुंदर गाड्या या योजना राबविण्यात आल्या आहेत. आता ‘मागेल त्याला एस. टी.’ ही योजना राबविण्यात येणार आहे.प्रवासी वाहतूकीदरम्यान इंधन, वंगण बचतीबरोबर चालक, वाहकांचा ओव्हरटाईम कमी असणाऱ्या विभागांना ‘अ’ श्रेणी दर्जा दिला जातो. रत्नागिरी विभागाने या निकषांचे पालन केल्यानेच ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. (प्रतिनिधी)राज्यातील ३१ एस. टी. विभागांचा महामंडळाकडून नव्याने सर्वे.यावर्षी १८ विभागाना ‘अ’ श्रेणी.रत्नागिरी विभाग नेहमी ‘क’ व ‘ब’ श्रेणी मध्ये असताना यावर्षी ‘अ’ श्रेणी प्राप्त.विभागाचे प्रतिदिन उत्पन्न ५० लाखांवरून ६५ लाखांवर.