शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

रत्नागिरी विभागाला ‘अ’ श्रेणी

By admin | Updated: November 23, 2014 23:55 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळ : उल्लेखनीय कामगिरीची घेतली दखल

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रत्नागिरी विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘अ’ श्रेणी बहाल केली आहे. राज्यातील ३१ एस. टी. विभागांचा महामंडळाकडून नव्याने सर्वे करून यावर्षी १८ विभागाना ‘अ’ श्रेणी दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी विभागाचा समावेश असून, रत्नागिरी विभागाला तसे परिपत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.रत्नागिरी विभाग नेहमी ‘क’ व ‘ब’ श्रेणी मध्ये असताना यावर्षी ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विभाग नियंत्रक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी वाढवा अभियान राबवून विभागाचे उत्पन्न वाढविण्यात यश मिळविले आहे. पूर्वी विभागाचे प्रतिदिन ५० लाखांपर्यंत उत्पन्न होते. परंतु यावर्षी उत्पन्न ६५ लाख इतके झाले आहे.विभागात ७९० गाड्या असून, दररोज ४५०० इतक्या फेऱ्या आहेत. दररोज २ लाख १६ हजार किलोमीटर इतका प्रवास होतो. अनेक ठिकाणी सुमारे ५० हून अधिक जादा गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, निवडणूक, तसेच ऊन्हाळी सुटीचे योग्य नियोजन करण्यात आल्याने ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.कर्मचाऱ्यांमधील मरगळ झटकत असताना कामचुकार कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली सुरूवातीच्या काळात केली. मात्र, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता विभाग नियंत्रक देशमुख यांनी घेतल्याने उत्पन्नात वाढ झाली. विनाअपघात सेवा, स्वच्छ व सुंदर गाड्या या योजना राबविण्यात आल्या आहेत. आता ‘मागेल त्याला एस. टी.’ ही योजना राबविण्यात येणार आहे.प्रवासी वाहतूकीदरम्यान इंधन, वंगण बचतीबरोबर चालक, वाहकांचा ओव्हरटाईम कमी असणाऱ्या विभागांना ‘अ’ श्रेणी दर्जा दिला जातो. रत्नागिरी विभागाने या निकषांचे पालन केल्यानेच ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. (प्रतिनिधी)राज्यातील ३१ एस. टी. विभागांचा महामंडळाकडून नव्याने सर्वे.यावर्षी १८ विभागाना ‘अ’ श्रेणी.रत्नागिरी विभाग नेहमी ‘क’ व ‘ब’ श्रेणी मध्ये असताना यावर्षी ‘अ’ श्रेणी प्राप्त.विभागाचे प्रतिदिन उत्पन्न ५० लाखांवरून ६५ लाखांवर.