शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

रत्नागिरी विभागाला ‘अ’ श्रेणी

By admin | Updated: November 23, 2014 23:55 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळ : उल्लेखनीय कामगिरीची घेतली दखल

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रत्नागिरी विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘अ’ श्रेणी बहाल केली आहे. राज्यातील ३१ एस. टी. विभागांचा महामंडळाकडून नव्याने सर्वे करून यावर्षी १८ विभागाना ‘अ’ श्रेणी दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी विभागाचा समावेश असून, रत्नागिरी विभागाला तसे परिपत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.रत्नागिरी विभाग नेहमी ‘क’ व ‘ब’ श्रेणी मध्ये असताना यावर्षी ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विभाग नियंत्रक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी वाढवा अभियान राबवून विभागाचे उत्पन्न वाढविण्यात यश मिळविले आहे. पूर्वी विभागाचे प्रतिदिन ५० लाखांपर्यंत उत्पन्न होते. परंतु यावर्षी उत्पन्न ६५ लाख इतके झाले आहे.विभागात ७९० गाड्या असून, दररोज ४५०० इतक्या फेऱ्या आहेत. दररोज २ लाख १६ हजार किलोमीटर इतका प्रवास होतो. अनेक ठिकाणी सुमारे ५० हून अधिक जादा गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, निवडणूक, तसेच ऊन्हाळी सुटीचे योग्य नियोजन करण्यात आल्याने ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.कर्मचाऱ्यांमधील मरगळ झटकत असताना कामचुकार कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली सुरूवातीच्या काळात केली. मात्र, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता विभाग नियंत्रक देशमुख यांनी घेतल्याने उत्पन्नात वाढ झाली. विनाअपघात सेवा, स्वच्छ व सुंदर गाड्या या योजना राबविण्यात आल्या आहेत. आता ‘मागेल त्याला एस. टी.’ ही योजना राबविण्यात येणार आहे.प्रवासी वाहतूकीदरम्यान इंधन, वंगण बचतीबरोबर चालक, वाहकांचा ओव्हरटाईम कमी असणाऱ्या विभागांना ‘अ’ श्रेणी दर्जा दिला जातो. रत्नागिरी विभागाने या निकषांचे पालन केल्यानेच ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. (प्रतिनिधी)राज्यातील ३१ एस. टी. विभागांचा महामंडळाकडून नव्याने सर्वे.यावर्षी १८ विभागाना ‘अ’ श्रेणी.रत्नागिरी विभाग नेहमी ‘क’ व ‘ब’ श्रेणी मध्ये असताना यावर्षी ‘अ’ श्रेणी प्राप्त.विभागाचे प्रतिदिन उत्पन्न ५० लाखांवरून ६५ लाखांवर.