शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

रत्नागिरी-ओवशाच्या सुपाला सोन्याचा भाव

By admin | Updated: August 26, 2014 22:53 IST

बुरूड व्यवसायाला तेजी

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. यावर्षी गौरी पूर्वा नक्षत्रावर येत असल्याने सर्वत्र गौरी पूजन व नवविवाहितांचे ओवसे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाचशे ते सहाशे रूपये दराने ओवशाची सूपे विकण्यात येत असल्यामुळे बुरूड व्यवसायाला तेजी आलेली दिसून येते.मोठे सूप व लहान चार शिपल्या मिळून पाच सुपांचा सेट नवविवाहितांच्या ओवशांसाठी विकत घेतला जातो. फळे, पाच प्रकारचे गोड पदार्थ, पान सुपारी, नारळ सुपात ठेवून गौरी पूजन केले जाते. नवविवाहिता माहेरहून ओवसा तयार करून सासरी घेऊन घेतात. माहेरी व सासरी दोन्ही ठिकाणी ओवसा देण्यात येतो. ओवसा दिल्यावर विवाहितेला भेटवस्तू साडी किंंवा पैसे तसेच ओटी देण्यात येते. गतवर्षी गौरी पूर्वा नक्षत्रात आल्या होत्या. यावर्षीदेखील पूर्वा नक्षत्रात आल्याने ओवसे केले जाणार आहेत.ओवशासाठी सुपांची विक्री सुरू आहे. रोखीचे पैसे मिळत असल्याने या व्यवसायात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे एरव्ही अवकळा असलेल्या बुरूड व्यवसायाला या महिनाभरात का होईना, परंतु तेजी आली आहे. ओवशासाठी सुपांना सोन्याचा भाव आला आहे. पारंपरिक बुरूड व्यवसाय करणारी मंडळी बांबू कापून त्यापासून पट्ट्या तयार करून सुपे तयार करतात. मोठे सूप वळण्यास जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ छोटी सूपे तयार करण्यास लागतो. मोठी सूपे सर्रास विकत मिळतात. मात्र, छोटी सूपे किंवा शिपल्या विणणारी मंडळी आता संख्येने कमी झाली आहेत. त्यामुळे या व्यवसायातील दलाल मंडळी घाऊक स्वरूपात गुजरात राज्यातून सूपे विकत आणतात. ५० ते ६० रूपयांमध्ये हे सूप विकत मिळते. हजारो सूपे एकाच वेळी खरेदी करून आणली जातात. शिपल्या तेथे मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागात बुरूड व्यवसाय करणाऱ्या मंडळींकडून विकत घेतले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील मंडळींनादेखील मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. दलाल मंडळी ग्रामीण भागातून अल्प किमतीत शिपल्या खरेदी करून पाच सुपांचा सेट ५०० ते ६०० रूपयांना सहज विकताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)ओवशांसाठी सूपे लागत असल्याने रोखीने ती खरेदी केली जातात. शिवाय दरवर्षी ओवसे येत नसल्यामुळे यावर्षी अधिकाधिक ओवसे उरकण्यात येणार आहेत. त्यामुळे सुपांना विशेष मागणी दिसून येत आहे. गणेशोत्सव घरोघरी साजरा करण्यात येतो. नवविवाहितांचे ओवसे करण्याची प्रथा असल्यामुळे ओवशांच्या सुपांना अधिक मागणी होत आहे. मोठी सूपे गुजरातमध्ये स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. परंतु शिपल्या केवळ आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध होतात. आंबेशेत, देवरूख, पोमेंडी, राजापूर, चिपळूण येथून आणली जातात. रोखीने व्यवहार होत असल्यामुळे सणासुदीच्या काळात दोन पैसे मिळतात.ए. एस. पवार, रत्नागिरी