शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

रत्नागिरी नगर परिषदेचे निर्बीजीकरणावरील ५० लाख वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST

रत्नागिरी : शहरातील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण (नसबंदी) करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने आतापर्यंत ५० लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, ...

रत्नागिरी : शहरातील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण (नसबंदी) करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने आतापर्यंत ५० लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, हे निर्बीजीकरण केल्यानंतरही भटक्या श्वानांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे आता शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन मार्गदर्शन करावे, अशा प्रकारची चर्चा रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाली.

नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील सात विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणे आणि त्यासाठी जागानिश्चिती करण्याबाबतचा विषय सुरुवातीलाच चर्चेला आला. मात्र, याबाबत नगराध्यक्ष प्रदीप साळवी व इतर सदस्यांनी या नसबंदीचा काहीच फायदा होत नसल्याचे सभागृहापुढे सांगितले. भटक्या श्वानांना उचलून त्यांची नसबंदी करून पुन्हा त्याच ठिकाणी त्याला सोडले जाते. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या काही कमी हाेत नसून, श्वानांचा उपद्रव कायम आहे. आतापर्यंत या निर्बीजीकरणावर नगर परिषदेने ५० लाखांच्या वर रक्कम खर्च केली आहे. तरीही त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. त्यामुळे आता निर्बीजीकरण मोहीम बंद करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. पुढील उपाययोजनेबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,

तसेच कोलकाता येथील एस. बी. नंबरिंग वर्क प्रा. लि. कंपनीला महाराष्ट्रात घरांना नंबर प्लेट बसविण्याबाबत सर्व नगर परिषदांना पत्र दिले आहे. याबाबतही सभेत चर्चा करण्यात आली. मात्र, नगर परिषदेने यापूर्वीच शहरातील २८,०८८ घरांना नंबर प्लेट दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा त्याची गरज नसल्याचे कंपनीला कळविण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.-----------------------

जनावरे विश्व हिंदू परिषदेकडे देणार

रत्नागिरी नगर परिषदेने मोकाट जनावरांवर कारवाई करून जनावरे पकडून ती कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी दंड भरून जनावरे सोडवून नेण्यात न आल्याने ४८ जनावरे नगर परिषदेच्या कोंडवाड्यात आहेत. ही जनावरे विश्व हिंदू परिषदेला संगोपनासाठी निःशुल्क देण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.