शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रत्नागिरी नगर परिषदेचे निर्बीजीकरणावरील ५० लाख वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST

रत्नागिरी : शहरातील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण (नसबंदी) करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने आतापर्यंत ५० लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, ...

रत्नागिरी : शहरातील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण (नसबंदी) करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने आतापर्यंत ५० लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, हे निर्बीजीकरण केल्यानंतरही भटक्या श्वानांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे आता शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन मार्गदर्शन करावे, अशा प्रकारची चर्चा रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाली.

नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील सात विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणे आणि त्यासाठी जागानिश्चिती करण्याबाबतचा विषय सुरुवातीलाच चर्चेला आला. मात्र, याबाबत नगराध्यक्ष प्रदीप साळवी व इतर सदस्यांनी या नसबंदीचा काहीच फायदा होत नसल्याचे सभागृहापुढे सांगितले. भटक्या श्वानांना उचलून त्यांची नसबंदी करून पुन्हा त्याच ठिकाणी त्याला सोडले जाते. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या काही कमी हाेत नसून, श्वानांचा उपद्रव कायम आहे. आतापर्यंत या निर्बीजीकरणावर नगर परिषदेने ५० लाखांच्या वर रक्कम खर्च केली आहे. तरीही त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. त्यामुळे आता निर्बीजीकरण मोहीम बंद करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. पुढील उपाययोजनेबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,

तसेच कोलकाता येथील एस. बी. नंबरिंग वर्क प्रा. लि. कंपनीला महाराष्ट्रात घरांना नंबर प्लेट बसविण्याबाबत सर्व नगर परिषदांना पत्र दिले आहे. याबाबतही सभेत चर्चा करण्यात आली. मात्र, नगर परिषदेने यापूर्वीच शहरातील २८,०८८ घरांना नंबर प्लेट दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा त्याची गरज नसल्याचे कंपनीला कळविण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.-----------------------

जनावरे विश्व हिंदू परिषदेकडे देणार

रत्नागिरी नगर परिषदेने मोकाट जनावरांवर कारवाई करून जनावरे पकडून ती कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी दंड भरून जनावरे सोडवून नेण्यात न आल्याने ४८ जनावरे नगर परिषदेच्या कोंडवाड्यात आहेत. ही जनावरे विश्व हिंदू परिषदेला संगोपनासाठी निःशुल्क देण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.