शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये फुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 15:07 IST

काँग्रेस जिल्हाध्यक्षांना हे अधिकारच नाहीत, असे स्पष्ट करीत राकेश चव्हाण यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांना आव्हान दिले आहे.

रत्नागिरी : रलागिरीच्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक २९ डिसेंबर २०१९ रोजी होत आहे. मात्र, या निवडणुकीवरून रत्नागिरी काँग्रेसमध्ये ठिणगी पडली असून, काँग्रेस शहर ब्लॉक अध्यक्ष राकेश चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष अॅड. विजय भोसले यांनी व्हॉट्सअॅपवर पत्र पाठवून तडकाफडकी पदमुक्त केले आहे, तर शहर ब्लॉक अध्यक्ष म्हणून मला पदावरून हटविण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्षानाच आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्षांना हे अधिकारच नाहीत, असे स्पष्ट करीत राकेश चव्हाण यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांना आव्हान दिले आहे.

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसने निवडणूक लढवावी की, महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा, याबाबत जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत काहीही निर्णय झाला नव्हता. आपण प्रदेशाच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊया, असे जिल्हाध्यक्ष भोसले यांनी आपल्याला सांगितले होते. त्यानंतर ९ डिसेंबरला वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरीत आलेल्या भोसले यांना त्याबाबत विचारणा केली असता पक्ष निरीक्षक रत्नागिरीत येऊन त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे आपल्याला सांगितले होते, असे चव्हाण म्हणाले.

मात्र, नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची १२ डिसेंबर ही अखेरची तारीख असल्याने निरीक्षक येणार कधी व निर्णय घेणार कधी असा प्रश्न असल्याने आपण आधी उमेदवारी अर्ज दाखल करुया व नंतर त्याबाबत निर्णय घेऊया, असे त्यांना सांगितले होते. त्यानंतर रत्नागिरी शहरातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली व प्रदेशशी बोलून निर्णय घेऊया, असे आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले होते. परंतु नगराध्यक्ष निवडणुकीबाबत निर्णय न होता थेट मला शहर ब्लॉक अध्यक्षपदावरून पदमुक्त केल्याचे पत्र पाठविले गेले. त्याचवेळी काँग्रेसने राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांना पाठिंबा दिल्याचे पत्र ही जिल्हाध्यक्षांनी प्रसिध्द केले.

मला पदमुक्त करण्याचे पत्र हा अन्याय असून, मला या पदावरून काढण्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांना नाही, असे सांगून चव्हाण यांनी थेट जिल्हाध्यक्षांना आव्हान दिले आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रमेश शहा यांना उमेदवारी देण्यास विरोध केल्याने आपणास हटविण्याचा मनमानी निर्णय जिल्हाध्यक्षांनी घेतला आहे. याबाबत चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती दिली असून, १५ दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये आलेल्या रमेश शहा यांच्या उमेदवारीला विरोध केला म्हणून मला पदमुक्त करण्यात आल्याचे पत्र म्हटले आहे व प्रदेश अध्यक्षांनीच याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

विजय भोसले यांच्यावर आरोपजिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले सांगत असतील तर त्यांनी तशी माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगायला हवी होती. मग मलाच पदमुक्त केल्याचे पत्र पाठविताना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचे का कळविले जाते. भोसले हे काही ठराविक जणांचेच ऐकतात व कारभार करतात. मला पदमुक्त करणे, हा त्याचा परिपाक आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.