शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये फुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 15:07 IST

काँग्रेस जिल्हाध्यक्षांना हे अधिकारच नाहीत, असे स्पष्ट करीत राकेश चव्हाण यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांना आव्हान दिले आहे.

रत्नागिरी : रलागिरीच्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक २९ डिसेंबर २०१९ रोजी होत आहे. मात्र, या निवडणुकीवरून रत्नागिरी काँग्रेसमध्ये ठिणगी पडली असून, काँग्रेस शहर ब्लॉक अध्यक्ष राकेश चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष अॅड. विजय भोसले यांनी व्हॉट्सअॅपवर पत्र पाठवून तडकाफडकी पदमुक्त केले आहे, तर शहर ब्लॉक अध्यक्ष म्हणून मला पदावरून हटविण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्षानाच आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्षांना हे अधिकारच नाहीत, असे स्पष्ट करीत राकेश चव्हाण यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांना आव्हान दिले आहे.

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसने निवडणूक लढवावी की, महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा, याबाबत जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत काहीही निर्णय झाला नव्हता. आपण प्रदेशाच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊया, असे जिल्हाध्यक्ष भोसले यांनी आपल्याला सांगितले होते. त्यानंतर ९ डिसेंबरला वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरीत आलेल्या भोसले यांना त्याबाबत विचारणा केली असता पक्ष निरीक्षक रत्नागिरीत येऊन त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे आपल्याला सांगितले होते, असे चव्हाण म्हणाले.

मात्र, नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची १२ डिसेंबर ही अखेरची तारीख असल्याने निरीक्षक येणार कधी व निर्णय घेणार कधी असा प्रश्न असल्याने आपण आधी उमेदवारी अर्ज दाखल करुया व नंतर त्याबाबत निर्णय घेऊया, असे त्यांना सांगितले होते. त्यानंतर रत्नागिरी शहरातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली व प्रदेशशी बोलून निर्णय घेऊया, असे आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले होते. परंतु नगराध्यक्ष निवडणुकीबाबत निर्णय न होता थेट मला शहर ब्लॉक अध्यक्षपदावरून पदमुक्त केल्याचे पत्र पाठविले गेले. त्याचवेळी काँग्रेसने राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांना पाठिंबा दिल्याचे पत्र ही जिल्हाध्यक्षांनी प्रसिध्द केले.

मला पदमुक्त करण्याचे पत्र हा अन्याय असून, मला या पदावरून काढण्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांना नाही, असे सांगून चव्हाण यांनी थेट जिल्हाध्यक्षांना आव्हान दिले आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रमेश शहा यांना उमेदवारी देण्यास विरोध केल्याने आपणास हटविण्याचा मनमानी निर्णय जिल्हाध्यक्षांनी घेतला आहे. याबाबत चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती दिली असून, १५ दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये आलेल्या रमेश शहा यांच्या उमेदवारीला विरोध केला म्हणून मला पदमुक्त करण्यात आल्याचे पत्र म्हटले आहे व प्रदेश अध्यक्षांनीच याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

विजय भोसले यांच्यावर आरोपजिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले सांगत असतील तर त्यांनी तशी माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगायला हवी होती. मग मलाच पदमुक्त केल्याचे पत्र पाठविताना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचे का कळविले जाते. भोसले हे काही ठराविक जणांचेच ऐकतात व कारभार करतात. मला पदमुक्त करणे, हा त्याचा परिपाक आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.