शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

रत्नागिरी - कोल्हापूर रस्ता चकाचक

By admin | Updated: March 31, 2015 00:26 IST

अनेक महिन्यांची मागणी पूर्ण : रस्ता पक्का झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढतोय

जाकादेवी : रत्नागिरी - कोल्हापूर रस्त्यावरच्या वाहनांचा वेग वाढल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने यापूर्वी रडतकढत जाणारी सर्व प्रकारची वाहने आता वेगाने धावू लागली आहेत. त्यामुळे चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात हा रस्ता खराब असतो. तसा गेल्या पावसाळ्यातही हा रस्ता खाचखळग्यांनी भरला होता. रत्नागिरी ते कोल्हापूर या मार्गावरील बराचसा रस्ता डांबरीकरणाने पूर्ण करण्यात येत आहे.रत्नागिरी - कोल्हापूर हा सुमारे १३५ किलोमीटरचा प्रवास आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीतून जाणारा व अनेक ठिकाणी वळणे असणारा हा मार्ग. अरुंद नाही व म्हणायला रुंदही नसलेला पण निसर्गसौंदर्याने नटलेला हा रस्ता. उन्हाळ्यातील काही दिवस सोडले तर नेहमी अल्हाददायक वाटणारा नागमोडी वळणाचा हा रस्ता आहे.पश्चिमी घाटातील पावसामुळे हा रस्ता नेहमीच खराब होतो. खाचखळगे निर्माण होऊन वाहनधारकांना त्रासदायक ठरतो. गेल्या पावसाळ्यात या रस्त्याची दैना झाली होती. वाहनधारक शासनकर्त्यांना व रस्ते करणाऱ्यांना दूषणे देत होती. या रस्त्यावरुन जाता-येता पुढे जाण्यासाठी व जागा देण्यासाठी कधी कधी चालकांचे वादही होत.आता मात्र डांबरीकरण झाल्याने या गोष्टींना थारा नाही. रत्नागिरी साखरपा, मुर्शी, घाटातील आंबा ते दख्खन तसेच कोल्हापूर ते बोरपाडवे दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत आले आहे. मधला काही किमीचा भाग डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, बराच रस्ता डांबरीकरण झाल्याने सर्व प्रकारच्या वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या मार्गावरील डांबरिकरणामुळे आता वाहनचालक, प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात असून, परिसरातील वर्दळ वाढली आहे. (वार्ताहर)