शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

रत्नागिरी - कोल्हापूर रस्ता चकाचक

By admin | Updated: March 31, 2015 00:26 IST

अनेक महिन्यांची मागणी पूर्ण : रस्ता पक्का झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढतोय

जाकादेवी : रत्नागिरी - कोल्हापूर रस्त्यावरच्या वाहनांचा वेग वाढल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने यापूर्वी रडतकढत जाणारी सर्व प्रकारची वाहने आता वेगाने धावू लागली आहेत. त्यामुळे चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात हा रस्ता खराब असतो. तसा गेल्या पावसाळ्यातही हा रस्ता खाचखळग्यांनी भरला होता. रत्नागिरी ते कोल्हापूर या मार्गावरील बराचसा रस्ता डांबरीकरणाने पूर्ण करण्यात येत आहे.रत्नागिरी - कोल्हापूर हा सुमारे १३५ किलोमीटरचा प्रवास आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीतून जाणारा व अनेक ठिकाणी वळणे असणारा हा मार्ग. अरुंद नाही व म्हणायला रुंदही नसलेला पण निसर्गसौंदर्याने नटलेला हा रस्ता. उन्हाळ्यातील काही दिवस सोडले तर नेहमी अल्हाददायक वाटणारा नागमोडी वळणाचा हा रस्ता आहे.पश्चिमी घाटातील पावसामुळे हा रस्ता नेहमीच खराब होतो. खाचखळगे निर्माण होऊन वाहनधारकांना त्रासदायक ठरतो. गेल्या पावसाळ्यात या रस्त्याची दैना झाली होती. वाहनधारक शासनकर्त्यांना व रस्ते करणाऱ्यांना दूषणे देत होती. या रस्त्यावरुन जाता-येता पुढे जाण्यासाठी व जागा देण्यासाठी कधी कधी चालकांचे वादही होत.आता मात्र डांबरीकरण झाल्याने या गोष्टींना थारा नाही. रत्नागिरी साखरपा, मुर्शी, घाटातील आंबा ते दख्खन तसेच कोल्हापूर ते बोरपाडवे दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत आले आहे. मधला काही किमीचा भाग डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, बराच रस्ता डांबरीकरण झाल्याने सर्व प्रकारच्या वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या मार्गावरील डांबरिकरणामुळे आता वाहनचालक, प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात असून, परिसरातील वर्दळ वाढली आहे. (वार्ताहर)