शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

रत्नागिरी - कोल्हापूर रस्ता चकाचक

By admin | Updated: March 31, 2015 00:26 IST

अनेक महिन्यांची मागणी पूर्ण : रस्ता पक्का झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढतोय

जाकादेवी : रत्नागिरी - कोल्हापूर रस्त्यावरच्या वाहनांचा वेग वाढल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने यापूर्वी रडतकढत जाणारी सर्व प्रकारची वाहने आता वेगाने धावू लागली आहेत. त्यामुळे चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात हा रस्ता खराब असतो. तसा गेल्या पावसाळ्यातही हा रस्ता खाचखळग्यांनी भरला होता. रत्नागिरी ते कोल्हापूर या मार्गावरील बराचसा रस्ता डांबरीकरणाने पूर्ण करण्यात येत आहे.रत्नागिरी - कोल्हापूर हा सुमारे १३५ किलोमीटरचा प्रवास आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीतून जाणारा व अनेक ठिकाणी वळणे असणारा हा मार्ग. अरुंद नाही व म्हणायला रुंदही नसलेला पण निसर्गसौंदर्याने नटलेला हा रस्ता. उन्हाळ्यातील काही दिवस सोडले तर नेहमी अल्हाददायक वाटणारा नागमोडी वळणाचा हा रस्ता आहे.पश्चिमी घाटातील पावसामुळे हा रस्ता नेहमीच खराब होतो. खाचखळगे निर्माण होऊन वाहनधारकांना त्रासदायक ठरतो. गेल्या पावसाळ्यात या रस्त्याची दैना झाली होती. वाहनधारक शासनकर्त्यांना व रस्ते करणाऱ्यांना दूषणे देत होती. या रस्त्यावरुन जाता-येता पुढे जाण्यासाठी व जागा देण्यासाठी कधी कधी चालकांचे वादही होत.आता मात्र डांबरीकरण झाल्याने या गोष्टींना थारा नाही. रत्नागिरी साखरपा, मुर्शी, घाटातील आंबा ते दख्खन तसेच कोल्हापूर ते बोरपाडवे दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत आले आहे. मधला काही किमीचा भाग डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, बराच रस्ता डांबरीकरण झाल्याने सर्व प्रकारच्या वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या मार्गावरील डांबरिकरणामुळे आता वाहनचालक, प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात असून, परिसरातील वर्दळ वाढली आहे. (वार्ताहर)