शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग पाच दिवस राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या भागात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्गाचे नुकसान ...

रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या भागात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्गाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे साखरपा तसेच घाटातील महामार्गाच्या दुरूस्तीसाठी हा महामार्ग पुढील पाच दिवस बंद राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये आता पाऊस थांबला आहे. चिपळूण, खेडमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला आता वेग आला आहे. गेल्या २४ तासांत एकूण १७५ (सरासरी १९.४४) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने विश्रांती घेतली असली तरी नुकसान झालेल्या घटनांचे पंचनामे अजूनही सुरूच आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मंडणगडनजिकच्या कुंभार्ली येथील रत्नप्रभा सायकर यांच्या घराचे अंशत: ८ हजार रुपये नुकसान झाले आहे. इस्लामपूर येथील खतिजा महाकुगकर यांच्या घराचे अंशत: ८१ हजार ६०० रुपये नुकसान झाले आहे. कुंभार्ली येथील तुकाराम कलमकर यांच्या घराचे अंशत: ७ हजार ८०० रुपये नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील निवदे येथील पुराच्या पाण्याने पूल वाहून गेला आहे.

जिल्ह्यात तुरळक सर वगळता पावसाने विश्रांती घेतली होती. हवामान खात्याने गुरूवारी जिल्ह्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या भागात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्गाचे नुकसान झाले आहे. तसेच महामार्गाचा काही भाग तीन ठिकाणी तुटला आहे. याठिकाणी महामार्गावरील दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील हा ढिगारा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याठिकाणी खचलेला रस्ता दुरुस्त करण्यासह ढिगारा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे दुरुस्तीचे काम पुढील पाच दिवस सुरु राहणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस महामार्ग बंद राहणार आहे. त्यानंतर या महामार्गाची पुन्हा पाहणी करून सुरुवातीला फक्त हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी कळविले आहे.