शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

रत्नागिरीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:29 IST

Ratnagiri Nagar Parishad, muncipalcarporation रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची मंगळवारपासून अमलबजावणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता शहरातील मारूती मंदिर येथून फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केल्यानंतर काही तासातच शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

ठळक मुद्देरत्नागिरीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुटपरी टाकून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची मंगळवारपासून अमलबजावणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता शहरातील मारूती मंदिर येथून फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केल्यानंतर काही तासातच शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.मंगळवार सकाळपासून रस्त्यावरील फुटपाथवर असणारीअतिक्रमणे, टपऱ्या हटवण्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाली होती. सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. सकळाी मारुती मंदिर येथील टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत. यासाठी जेसीबी, इतर गाड्यांचा वापर करण्यात आला आहे.या कारवाईतून ग्रामीण भागातून टोपलीतून भाजी घेऊन येणाऱ्या भाजी विक्रेत्या महिलांना सूट देण्यात आली आहे. मात्र, हातगाडी, टपरी टाकून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अतिक्रमणे हटवण्याची ही मोहीम अशीच सुरू राहील, असे रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती राजन शेट्ये यांनी सांगितले आहे.नगर परिषदेने केवळ रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या हातगाडीवाले, फळविक्रेते यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला पक्के बांधकाम केलेल्यांना अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हातावर पोट घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून नगर परिषद काय साध्य करत आहे, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषद