शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

फसवणुकीची पाळेमुळे रत्नागिरीत

By admin | Updated: December 30, 2016 23:43 IST

मुंबईत ५७२ कोटीची फसवणूक : ठेवींमधून जमलेली रक्कम रत्नागिरीच्या जमिनीत

रत्नागिरी : मुंबईत केलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या फसवणुकीची पाळेमुळे रत्नागिरीच्या जमिनीत रूजली असल्यामुळे रत्नागिरी शहर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आहे. या फसवणुकीमध्ये रत्नागिरीत महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे पुढे येत आहे. त्या तपासासाठी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने रत्नागिरीत येऊन तपासणी केली आहे.मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे ५७२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. त्याची पाळेमुळे रत्नागिरीत असल्याचे समोर आले आहे. जादा व्याजाचे आमिष दाखवून, लोकांची फसवणूक करून उभे केलेले पैसे रत्नागिरीत जमिनीत गुंतवले असल्याचे पुढे येत आहे. याबाबत मुंबईत एका विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचे नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे. लोकांची आर्थिक फसवणूक करून हा पैसा रत्नागिरीमध्ये जमिनींचे व्यवहार करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवण्यात आला होता. ही माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोेलिसांचे एक पथक रत्नागिरी येथे दाखल झाले होते. रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने दोन दिवस या गुन्ह्याचा तपास युध्दपातळीवर करण्यात आला.या दोन दिवसांच्या तपासात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. मुंबईत ठेवीदारांकडून गोळा केलेल्या रकमेतील मोठा हिस्सा रत्नागिरीत जागा खरेदीमध्ये गुंतवण्यात आला आहे. त्यात काही सरकारी कर्मचाऱ्यांचा ही सामावेश असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी सील करण्यात आलेली कुवारबांव येथील जागा एका तलाठ्याने परस्पर विकली असल्याचे तपासात पुढे आले आहे. (वार्ताहर)