शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

फसवणुकीची पाळेमुळे रत्नागिरीत

By admin | Updated: December 30, 2016 23:43 IST

मुंबईत ५७२ कोटीची फसवणूक : ठेवींमधून जमलेली रक्कम रत्नागिरीच्या जमिनीत

रत्नागिरी : मुंबईत केलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या फसवणुकीची पाळेमुळे रत्नागिरीच्या जमिनीत रूजली असल्यामुळे रत्नागिरी शहर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आहे. या फसवणुकीमध्ये रत्नागिरीत महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे पुढे येत आहे. त्या तपासासाठी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने रत्नागिरीत येऊन तपासणी केली आहे.मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे ५७२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. त्याची पाळेमुळे रत्नागिरीत असल्याचे समोर आले आहे. जादा व्याजाचे आमिष दाखवून, लोकांची फसवणूक करून उभे केलेले पैसे रत्नागिरीत जमिनीत गुंतवले असल्याचे पुढे येत आहे. याबाबत मुंबईत एका विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचे नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे. लोकांची आर्थिक फसवणूक करून हा पैसा रत्नागिरीमध्ये जमिनींचे व्यवहार करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवण्यात आला होता. ही माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोेलिसांचे एक पथक रत्नागिरी येथे दाखल झाले होते. रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने दोन दिवस या गुन्ह्याचा तपास युध्दपातळीवर करण्यात आला.या दोन दिवसांच्या तपासात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. मुंबईत ठेवीदारांकडून गोळा केलेल्या रकमेतील मोठा हिस्सा रत्नागिरीत जागा खरेदीमध्ये गुंतवण्यात आला आहे. त्यात काही सरकारी कर्मचाऱ्यांचा ही सामावेश असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी सील करण्यात आलेली कुवारबांव येथील जागा एका तलाठ्याने परस्पर विकली असल्याचे तपासात पुढे आले आहे. (वार्ताहर)