शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:33 IST

विविध ठिकाणी पडझड : अडीच लाखांची हानी, रत्नागिरी, लांजात कमी नुकसान

रत्नागिरी : सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले असून, जागोजागी पाणी भरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधार पडणाऱ्या पावसमुळे पडझड होऊन जिल्हाभरात सुमारे २ लाख ५२ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सोेमवारी सांयकाळी पावसाने क्षणभर विश्रांती घेतली.रविवारपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी व लांजा तालुका सोडल्यास सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंडणगड येथील तोडली येथे घराचे ६ हजार ८०० रुपयांचे नुकसान, मौजे भिंगळोली येथे घराचे १४ हजार ८५० रुपयांचे नुकसान, मौजे मंडणगड येथे घरांवर बांध कोसळून २१९५ रुपयांचे नुकसान झाले. मौजे पालघर येथे चंद्रकांत तपकिरी यांचे कंपाऊंडचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, मंडणगड तालुक्यात दोन दिवसात सुमारे ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दापोली तालुक्यात पाजपंढरी येथे २ घरांचे १६ हजार ४०० रुपयांचे किरकोळ नुकसान झाले. हर्णै येथे नथुराम वैद्य यांच्या गडग्याचे ४ हजार ८०० रुपयांचे, तर एका घराचे २१०० रुपयांचे किरकोळ नुकसान झाले. मौजे पाडले येथे घराचे २३ हजार रुपयांचे किरकोळ नुकसान झाले. गव्हे येथे घराचे १००० रुपयांचे किरकोळ, तर मांदिवले येथे एक गोठा पूर्ण कोसळला असून, मालकाचे ७५ हजार रुपयांचे नुकसान नोंदवले गेले आहे. दापोली येथे सुमारे १ लाख २३ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले.खेड येथे रस्त्यात दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती. मौजे कसबा नातू येथे बांध कोसळल्याने १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात मौजे विल्ये येथे गोठ्याचे किरकोळ नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात चिखली-कारोळ व पालपेणे साखरी त्रिशुळ येथील मोऱ्या ढासळल्याने नुकसान झाले आहे. मौजे कासुर्ली येथे घरावर झाडाची फांदी पडून ४ हजार ५५० रुपयांचे, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची कंपाऊड वॉल कोसळल्याने २९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुहागरात एकूण ३३ हजार ४५० रुपयांचे नुकसान झाले आहे.संगमेश्वर येथे ४ घरांचे ३३ हजार ६५० रुपयांचे नुकसान झाले आहे, तर मौजे माखजन येथे घरावर झाड पडल्याने दोन घराचे ३ हजार २१० रुपयांचे नुकसान झाले आहे. राजापूरमध्ये एका घरांची भिंत कोसळून ५ हजार रुपये, तर राजापूर वरचीवाडीमध्ये पडवी कोसळल्याने ५ हजार रुपये नुकसान असे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात २,५२,८०० इतके नुकसान झाले आहे. (वार्ताहर)राजापुरात व्यापाऱ्यांची धावपळदापोलीत अंगणवाडी जमीनदोस्तभोर महाड मार्गावरील वाहतूक बंद; बस अडकलीगावखडीत घर कोसळले, महिला बेघर