शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा

By admin | Updated: September 1, 2014 00:27 IST

अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर : जालगावात ३५ घरांना पुराचा धोका; संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी

रत्नागिरी : जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. यामुळे काल, शनिवारी रात्रीपासून नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून, परिसरातील गावात भीती निर्माण झाली आहे. दापोलीतील कोडजाई नदीच्या पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने जालगावात ३५ घरांना धोका निर्माण झाला आहे. काही घरांत पाणी घुसले. संगमेश्वर बाजारपेठेत आज, रविवारी सकाळी पुराचे पाणी घुसल्याने व्यापारीवर्गाची धावपळ उडाली. चिपळूण तालुक्यातील टेरवमध्ये वृद्ध वहाळात वाहून गेला. राजापूर शहरातील जवाहर चौकापर्यंत पुराचे पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. संगमेश्वर तालुक्यात आज, रविवारी सकाळपर्यंत ११५.५८ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली असून, धुवांधार झालेल्या पावसाने नदीकाठची शेती वाहून गेली. संगमेश्वर बाजारपेठेत सकाळपासून पुराचे पाणी शिरले. सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठेतील पाणी ओसरले नव्हते. त्यामुळे पाणी वाढण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानांतील माल अन्यत्र हलवावा लागला. संगमेश्वरातून असुर्डेला जाणाऱ्या पुलाभोवती पाण्याचा वेढा होता. त्यामुळे वाहतूक बंद होती. तालुक्यात अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी बसथांब्यानजीक संगमेश्वर देवरुख राज्य मार्गावर पहाटे भला मोठा वृक्ष रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने सुमारे तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गुहागर शहरातही अतिवृष्टीने कहर केला. त्यामुळे येथील प्रताप गोयथळे यांच्या घरात पाणी शिरले. पाणी घरात शिरल्याने चारजणांचे सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळून पडल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. रत्नागिरी तालुक्यालाही अतिवृष्टीने तडाखा दिला आहे. तालुक्यातील विविध भागांतील शेती पाण्याखाली गेली आहे. आधी पाऊस नव्हता म्हणून लोक चिंतेत होते. आता अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान डोळ्यांसमोर पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला. (प्रतिनिधी)