शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा

By admin | Updated: September 1, 2014 00:27 IST

अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर : जालगावात ३५ घरांना पुराचा धोका; संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी

रत्नागिरी : जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. यामुळे काल, शनिवारी रात्रीपासून नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून, परिसरातील गावात भीती निर्माण झाली आहे. दापोलीतील कोडजाई नदीच्या पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने जालगावात ३५ घरांना धोका निर्माण झाला आहे. काही घरांत पाणी घुसले. संगमेश्वर बाजारपेठेत आज, रविवारी सकाळी पुराचे पाणी घुसल्याने व्यापारीवर्गाची धावपळ उडाली. चिपळूण तालुक्यातील टेरवमध्ये वृद्ध वहाळात वाहून गेला. राजापूर शहरातील जवाहर चौकापर्यंत पुराचे पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. संगमेश्वर तालुक्यात आज, रविवारी सकाळपर्यंत ११५.५८ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली असून, धुवांधार झालेल्या पावसाने नदीकाठची शेती वाहून गेली. संगमेश्वर बाजारपेठेत सकाळपासून पुराचे पाणी शिरले. सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठेतील पाणी ओसरले नव्हते. त्यामुळे पाणी वाढण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानांतील माल अन्यत्र हलवावा लागला. संगमेश्वरातून असुर्डेला जाणाऱ्या पुलाभोवती पाण्याचा वेढा होता. त्यामुळे वाहतूक बंद होती. तालुक्यात अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी बसथांब्यानजीक संगमेश्वर देवरुख राज्य मार्गावर पहाटे भला मोठा वृक्ष रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने सुमारे तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गुहागर शहरातही अतिवृष्टीने कहर केला. त्यामुळे येथील प्रताप गोयथळे यांच्या घरात पाणी शिरले. पाणी घरात शिरल्याने चारजणांचे सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळून पडल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. रत्नागिरी तालुक्यालाही अतिवृष्टीने तडाखा दिला आहे. तालुक्यातील विविध भागांतील शेती पाण्याखाली गेली आहे. आधी पाऊस नव्हता म्हणून लोक चिंतेत होते. आता अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान डोळ्यांसमोर पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला. (प्रतिनिधी)