शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

उत्तर रत्नागिरीत सेनेचा बुरुज लागला ढासळू

By admin | Updated: October 27, 2014 23:32 IST

विधानसभा निवडणूक : जिल्हा नेतृत्व बदलाची चर्चा

रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेचा बुरुज ढासळत चालल्याने त्याचा परिणाम भविष्यात होणाऱ्या निवडणुकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी उत्तर रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय गोटात सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात गुहागरवगळता किमान चार मतदार संघांमध्ये शिवसेना बाजी मारेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तिन्ही मतदार संघात गड राखले़ मात्र, दापोलीची शिवसेनेची जागा गेल्याने हा अंदाज फोल ठरला. गेल्या २५ वर्षांत दापोली शिवसेनेकडे असतानाही या निवडणुकीमध्ये आमदार सूर्यकांत दळवी यावेळी मात्र, सूर्याप्रमाणे तेज दाखवू शकले नाहीत. चिपळूण तालुक्यावर शिवसेनेची पकड ढिली झाल्याचे विधानसभा निवडणुकीनंतर चित्र समोर आले आहे़ चिपळुणात राष्ट्रवादीचे मताधिक्य वाढलेले असतानाच शिवसेनेची पीछेहाट झाली़ कारण गुहागर आणि चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले़ त्याउलट चिपळूण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या संगमेश्वर तालुक्याने शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांना तारले़ अन्यथा शिवसेनेची ही जागाही धोक्यात होती़ उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातही शिवसेना दिवसेंदिवस कमकुवत होत चालल्याचे दिसत आहे.उत्तर रत्नागिरीमध्ये चिपळूण, खेड, गुहागर, दापोली आणि मंडणगड हे पाच तालुके येतात़ शिवसेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांपैकी एक जिल्हाप्रमुख उत्तर रत्नागिरीसाठी आहे़ या निवडणुकीत विविध कारणांनी शिवसेनेची उत्तर रत्नागिरीत झालेली पीछेहाट भविष्यात होणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर त्याचे परिणाम दिसून येतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे़ त्यावर शिवसेनेने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा आगामी काळात शिवसेनेचे प्राबल्य आणखी कमी होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)