शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

उत्तर रत्नागिरीत सेनेचा बुरुज लागला ढासळू

By admin | Updated: October 27, 2014 23:32 IST

विधानसभा निवडणूक : जिल्हा नेतृत्व बदलाची चर्चा

रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेचा बुरुज ढासळत चालल्याने त्याचा परिणाम भविष्यात होणाऱ्या निवडणुकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी उत्तर रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय गोटात सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात गुहागरवगळता किमान चार मतदार संघांमध्ये शिवसेना बाजी मारेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तिन्ही मतदार संघात गड राखले़ मात्र, दापोलीची शिवसेनेची जागा गेल्याने हा अंदाज फोल ठरला. गेल्या २५ वर्षांत दापोली शिवसेनेकडे असतानाही या निवडणुकीमध्ये आमदार सूर्यकांत दळवी यावेळी मात्र, सूर्याप्रमाणे तेज दाखवू शकले नाहीत. चिपळूण तालुक्यावर शिवसेनेची पकड ढिली झाल्याचे विधानसभा निवडणुकीनंतर चित्र समोर आले आहे़ चिपळुणात राष्ट्रवादीचे मताधिक्य वाढलेले असतानाच शिवसेनेची पीछेहाट झाली़ कारण गुहागर आणि चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले़ त्याउलट चिपळूण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या संगमेश्वर तालुक्याने शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांना तारले़ अन्यथा शिवसेनेची ही जागाही धोक्यात होती़ उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातही शिवसेना दिवसेंदिवस कमकुवत होत चालल्याचे दिसत आहे.उत्तर रत्नागिरीमध्ये चिपळूण, खेड, गुहागर, दापोली आणि मंडणगड हे पाच तालुके येतात़ शिवसेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांपैकी एक जिल्हाप्रमुख उत्तर रत्नागिरीसाठी आहे़ या निवडणुकीत विविध कारणांनी शिवसेनेची उत्तर रत्नागिरीत झालेली पीछेहाट भविष्यात होणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर त्याचे परिणाम दिसून येतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे़ त्यावर शिवसेनेने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा आगामी काळात शिवसेनेचे प्राबल्य आणखी कमी होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)