शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

रत्नागिरी जिल्ह्यात एकाचदिवशी सापडले ४७ काेराेनाचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने उसळी घेतली असून, दिवसभरात ४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १०,३६५ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने उसळी घेतली असून, दिवसभरात ४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १०,३६५ झाली आहे, तर ७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यात ९,७९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांतील शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले ४७ रुग्ण ही जास्त संख्या आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. जिल्ह्यात ७५८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील २९ रुग्ण असून, ॲन्टिजेन तपासणीतील १८ रुग्ण आहेत.

दिवसभरात आरटीपीसीआर तपासणीतील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये महिला रुग्णालयातील ५ रुग्ण, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, पाली ग्रामीण रुग्णालय, गुहागर ग्रामीण रुग्णालय, राजापूर ग्रामीण रुग्णालय, धामापूर प्राथमिक आराेग्य केंद्र, खानू प्राथमिक आराेग्य केंद्र, वाटद प्राथमिक आराेग्य केंद्र, शिरगाव प्राथमिक आराेग्य केंद्र, देवळे प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये प्रत्येकी १ रुग्ण, देवरुख ग्रामीण रुग्णालयात २ रुग्ण, सावर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ रुग्ण आणि उंबर्ले, वावे, वहाळ या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण आढळले.

जिल्ह्यात ३७१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.५८ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५२ टक्के आहे. ६५ कोरोनाचे रुग्ण गृहविलगीकरणात असून, १५३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.