शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

रत्नागिरी समुद्रात धोक्याचा बावटा

By admin | Updated: July 3, 2016 23:38 IST

मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना : मुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी : संततधार पडणाऱ्या वादळी पावसामुळे रत्नागिरीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जागोजागी पाणी भरून सर्व जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे चित्र दिसत आहे, तर पुढच्या चोवीस तासात किनारपट्टीवरील मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रामध्ये तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. कोकण व गोवा याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे. गेले दहा दिवस पावसाने रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये थैमान घातले असून, जिल्ह्यातील काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे चित्र दिसत आहे. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार सुरूवात केली आहे. गेले आठ दिवस पावसाने रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. दमदार पडणाऱ्या या पावसामुळे जागोजागी पाणी भरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. जनजीवन विस्कळीत झाले असून, पडझडीचे प्रमाणही दिवसेदिवस वाढत आहे. शनिवारी रात्री हातिवले व राजापूर तालुक्याला च्रकीवादळाचा चांगलाच तडाखा बसला असून, घरे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या पावसाचा आवेश दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मासेमारी बंदीचा काळ असतानाही छोट्या - मोठ्या बोटी सुमद्रात मासेमारी करताना दिसत असतात. त्यात नैऋत्य वारे जोरदार वाहण्याची शक्यता असून, समुद्रकिनारपट्टी व मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून हा इशारा देण्यात आला आहे. येत्या चोवीस तासात नैऋत्य दिशेने ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकाळात समुद्र अतिशय खवळलेला असतो. त्यामुळे रत्नागिरी समुद्रकिनारी बंदर विभाग, रत्नागिरी यांच्याकडून तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असून, मच्छीमारांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर) आज दिवसभरात रत्नागिरी जिल्ह्यात ६५९ मिलिमीटर पावसांची नोंद झाली असून, सर्वाधिक १०८ मिलिमीटर पाऊस संगमेश्वरमध्ये झाला आहे. मंडणगडमध्ये ७५ मिलिमीटर, दापोली ५२, खेड ९८, गुहागर ३६, चिपळूण १०५, रत्नागिरी २७, लांजा १०५ आणि राजापूरमध्ये ५३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.