शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

रत्नागिरी समुद्रात धोक्याचा बावटा

By admin | Updated: July 3, 2016 23:38 IST

मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना : मुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी : संततधार पडणाऱ्या वादळी पावसामुळे रत्नागिरीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जागोजागी पाणी भरून सर्व जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे चित्र दिसत आहे, तर पुढच्या चोवीस तासात किनारपट्टीवरील मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रामध्ये तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. कोकण व गोवा याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे. गेले दहा दिवस पावसाने रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये थैमान घातले असून, जिल्ह्यातील काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे चित्र दिसत आहे. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार सुरूवात केली आहे. गेले आठ दिवस पावसाने रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. दमदार पडणाऱ्या या पावसामुळे जागोजागी पाणी भरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. जनजीवन विस्कळीत झाले असून, पडझडीचे प्रमाणही दिवसेदिवस वाढत आहे. शनिवारी रात्री हातिवले व राजापूर तालुक्याला च्रकीवादळाचा चांगलाच तडाखा बसला असून, घरे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या पावसाचा आवेश दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मासेमारी बंदीचा काळ असतानाही छोट्या - मोठ्या बोटी सुमद्रात मासेमारी करताना दिसत असतात. त्यात नैऋत्य वारे जोरदार वाहण्याची शक्यता असून, समुद्रकिनारपट्टी व मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून हा इशारा देण्यात आला आहे. येत्या चोवीस तासात नैऋत्य दिशेने ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकाळात समुद्र अतिशय खवळलेला असतो. त्यामुळे रत्नागिरी समुद्रकिनारी बंदर विभाग, रत्नागिरी यांच्याकडून तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असून, मच्छीमारांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर) आज दिवसभरात रत्नागिरी जिल्ह्यात ६५९ मिलिमीटर पावसांची नोंद झाली असून, सर्वाधिक १०८ मिलिमीटर पाऊस संगमेश्वरमध्ये झाला आहे. मंडणगडमध्ये ७५ मिलिमीटर, दापोली ५२, खेड ९८, गुहागर ३६, चिपळूण १०५, रत्नागिरी २७, लांजा १०५ आणि राजापूरमध्ये ५३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.