शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सेंद्रिय शेतीचे सर्वात चांगले मॉडेल रत्नागिरीत

By admin | Updated: May 27, 2016 23:25 IST

आरीफ शहा : कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

रत्नागिरी : केंद्र शासनाने सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार भारतातील सर्वांत चांगले मॉडेल रत्नागिरीत तयार करण्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांना कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्याबरोबर पिकाची उत्पादकता वाढवण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पन्नास एकर शेतीचे गट तयार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण २८ गट तयार करून त्यांना सेंद्रीय पध्दतीने शेती करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय खते तयार करणे, कीटकनाशके, पिकांचे लागवडीपासून उत्पादनापर्यंत वेळोवेळी रेकॉर्ड ठेवणे, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. भात, नागली, मसाला पिके तसेच नगदी पिकांमध्ये आंबा, काजू व भाजीपाला लागवडीची माहिती देऊन शेतकऱ्यांना संबंधित माल विकल्यावर बाजारभावापेक्षा अधिक पैसे मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय खते, कीटकनाशकेवगळता रासायनिक खते, कीटकनाशके वापरता येणार नाहीत. राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातून प्रत्येकी ५ मिळून एकूण १५ गट तयार करण्यात आले आहेत. एका बचत गटासाठी तीन वर्षात एकूण १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. गांडूळ खत तयार करणे, मालाची ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहन घेण्यासाठी अनुदानही देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी सेंद्रिय बचतगट योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)