शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

सेंद्रिय शेतीचे सर्वात चांगले मॉडेल रत्नागिरीत

By admin | Updated: May 27, 2016 23:25 IST

आरीफ शहा : कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

रत्नागिरी : केंद्र शासनाने सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार भारतातील सर्वांत चांगले मॉडेल रत्नागिरीत तयार करण्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांना कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्याबरोबर पिकाची उत्पादकता वाढवण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पन्नास एकर शेतीचे गट तयार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण २८ गट तयार करून त्यांना सेंद्रीय पध्दतीने शेती करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय खते तयार करणे, कीटकनाशके, पिकांचे लागवडीपासून उत्पादनापर्यंत वेळोवेळी रेकॉर्ड ठेवणे, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. भात, नागली, मसाला पिके तसेच नगदी पिकांमध्ये आंबा, काजू व भाजीपाला लागवडीची माहिती देऊन शेतकऱ्यांना संबंधित माल विकल्यावर बाजारभावापेक्षा अधिक पैसे मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय खते, कीटकनाशकेवगळता रासायनिक खते, कीटकनाशके वापरता येणार नाहीत. राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातून प्रत्येकी ५ मिळून एकूण १५ गट तयार करण्यात आले आहेत. एका बचत गटासाठी तीन वर्षात एकूण १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. गांडूळ खत तयार करणे, मालाची ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहन घेण्यासाठी अनुदानही देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी सेंद्रिय बचतगट योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)