शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीचे सर्वात चांगले मॉडेल रत्नागिरीत

By admin | Updated: May 27, 2016 23:25 IST

आरीफ शहा : कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

रत्नागिरी : केंद्र शासनाने सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार भारतातील सर्वांत चांगले मॉडेल रत्नागिरीत तयार करण्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांना कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्याबरोबर पिकाची उत्पादकता वाढवण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पन्नास एकर शेतीचे गट तयार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण २८ गट तयार करून त्यांना सेंद्रीय पध्दतीने शेती करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय खते तयार करणे, कीटकनाशके, पिकांचे लागवडीपासून उत्पादनापर्यंत वेळोवेळी रेकॉर्ड ठेवणे, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. भात, नागली, मसाला पिके तसेच नगदी पिकांमध्ये आंबा, काजू व भाजीपाला लागवडीची माहिती देऊन शेतकऱ्यांना संबंधित माल विकल्यावर बाजारभावापेक्षा अधिक पैसे मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय खते, कीटकनाशकेवगळता रासायनिक खते, कीटकनाशके वापरता येणार नाहीत. राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातून प्रत्येकी ५ मिळून एकूण १५ गट तयार करण्यात आले आहेत. एका बचत गटासाठी तीन वर्षात एकूण १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. गांडूळ खत तयार करणे, मालाची ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहन घेण्यासाठी अनुदानही देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी सेंद्रिय बचतगट योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)