शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उंदीर, सापांची वस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

मंदार गोयथळे/असगाेली : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र काेराेनामुळे तब्बल ...

मंदार गोयथळे/असगाेली : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र काेराेनामुळे तब्बल दोन वर्षे बंद असलेल्या शाळांचा आतील भाग व बाहेरील परिसर उंदीर, साप, विंचू, मोकाट जनावरे यांचे माहेरघर बनले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनल्या आहेत.

कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत त्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. ग्रामीण भागातील बंद शाळांच्या कुलपांवर गंज चढला आहे. खासगी शाळा बंद असल्या तरी त्या शाळांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत सफाई कामगार नसल्याने बंद असलेल्या शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. वर्गखोल्यांमध्ये आता धुळीचे साम्राज्य पसरले असून, बंद शाळांमध्ये उंदरांनी आपले घर केले आहे. त्या उंदरांना आपले भक्ष्य बनविण्यासाठी सापांनीही शाळेतच ठाण मांडल्याचे काहीवेळा पाहायला मिळत आहे.

तसेच शाळेच्या परिसरात कंबरे एवढे गवत वाढल्याने त्यातून जायचे कसे, हा प्रश्नच आहे. ज्या शाळेला आवार, भिंत नाही किंवा आवार, भिंत असूनही प्रवेशद्वार नाही अशा शाळेच्या आवारात त्या गावातील जनावरे येऊन थांबत आहेत. त्यातच वर्गावर्गांमध्ये बेंचवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. शाळाच बंद असल्याने त्या शाळा स्वच्छ करण्याचा मानस कुणी ठेवला नाही. धूळ आणि वर्गात पसरलेले जाळे अशी या शाळांतील विदारक परिस्थिती असून, शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांची स्वच्छता करण्याची मागणी हाेत आहे.