शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकीमुळे रापमची एसटी मालामाल; चालक मात्र कंगाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:25 IST

मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले, तेव्हा आंबा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. ...

मेहरुन नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले, तेव्हा आंबा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. राज्य परिवहन महामंडळाने तत्परता दर्शवीत माल वाहतूक सुरू झाली. जिल्ह्यात आंबापेटीच्या वाहतुकीने माल वाहतुकीला प्रारंभ झाला. मे (२०२०) पासून दि. २० मे (२०२१) पर्यंत ५७ हजार १४७ किलोमीटर वाहतुकीतून दोन कोटी ७३ लाख १९ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मालवाहतुकीमुळे एस.टी.च्या उत्पन्नात भर पडत असली तरी चालकांवर मात्र अन्याय होत आहे.

मालवाहतुकीची गाडी घेऊन जाणाऱ्या चालकाला परत येताना पुन्हा माल घेऊनच यावे लागते. मात्र काहीवेळा भाडे उपलब्ध होत नाही, तोपर्यंत चालकांना अन्य जिल्ह्याच्या आगारात थांबावे लागते. त्यादरम्यान खाण्यापिण्याचा खर्च चालकाला स्वत:च भागवावा लागतो. वास्तविक परजिल्ह्यात जाताना ॲडव्हान्स देणे आवश्यक आहे. मात्र तोही दिला जात नाही. सध्या एस.टी. वाहतुकीवर लाॅकडाऊनचा परिणाम झाला आहे. त्यामुळे चालकांना जबरदस्तीने माल वाहतुकीवर ड्युटी लावली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

वर्षभरात दोन कोटी ७३ लाखाची कमाई

गतवर्षी मे महिन्यापासून मालवाहतूक रत्नागिरी विभागात सुरू झाली. आतापर्यंत दोन कोटी ७३ लाख १९ हजार ५०० रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

अन्य माल वाहतूक करणाऱ्या वाहनांपेक्षा एस.टी.चे मालवाहतुकीचे दर कमी आहेत. विश्वासार्हता जपल्याने वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

कंपन्यांकडून एस.टी.कडे थेट संपर्क साधला जात आहे. वाजवी भाडे, सुरक्षितता यामुळे माल वाहतुकीसाठी एस.टी.ला प्राधान्य दिले जात आहे.

परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत तिथेच मुक्काम

परजिल्ह्यात मालवाहतुकीचा ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला परतीसाठी भाडे मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. पाच, सहा दिवस वाट पाहत राहावे लागते. अन्य आगारात राहण्याची सुविधा होत असली तरी जेवण, खाण्याचा खर्च स्वत:लाच करावा लागत आहे.

सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने एस.टी.च्या आगारात निवासाची व्यवस्था होत असली तरी खाण्याचे हाल होतात. जाताना एकवेळचा डबा चालक घेऊन जातात. मात्र हाॅटेल, उपाहारगृहे बंद असल्याने अन्य दिवसात खाण्याचा प्रश्न निर्माण होतो. वाटेतही बंदमुळे चालकांना उपासमार करावी लागते.

ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट

परजिल्ह्यात जाणाऱ्या चालकांना ऐनवेळी महामंडळाकडून खर्चासाठी ॲडव्हान्स रक्कम घेतली जात असली तरी ती पगारातून कट केली जाते.

परतीचे भाडे वेळेवर मिळाले तर ठीक अन्यथा पुढील भाडे मिळेपर्यंत वाट पाहावी लागते. जेवढे दिवस वाढतात, तेवढा खर्चही वाढतो.

ॲडव्हान्सची रक्कम दिली जाते, मात्र पगारातून कट केली जाते. त्याऐवजी चालकांना प्रवासभत्ता देणे आवश्यक आहे.

१८० किलोमीटर प्रवासाचा निकष आहे. त्यापेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास असेल तर दोन चालकांची आवश्यकता आहे.

लांबचा प्रवास असेल तर दोन चालक गरजेचे आहेत. वाटेत चाक पंक्चर झाले किंवा वाहन नादुरुस्त झाले तर अशावेळी सोबत असलेल्या चालकाची मदत होते. त्यामुळे १८० किलोमीटरचा निकष असला तरी पुढच्या प्रवासासाठी डबल चालक देण्याची मागणी होत आहे.

- एक चालक, रत्नागिरी

सध्या एस.टी.वाहतूक फेरीवर परिणाम झाला असला तरी माल वाहतुकीवर चालकांना जबरदस्तीने ड्युटी लावू नये. शिवाय गाडी भरल्याशिवाय येऊ नये ही अट शिथिल करावी. अन्य आगारात थांबावे लागत असल्याने निवासाबरोबर जेवणाचीही सुविधा उपलब्ध करावी.

- एक चालक, रत्नागिरी

लाॅकडाऊन मालवाहतुकीची गाडी घेऊन जाणाऱ्या चालकाना ३०० रुपये प्रवासभत्ता देणे आवश्यक आहे. शिवाय ॲडव्हान्सची रक्कम वेळेवर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दहा टनापेक्षा अधिक माल भरता कामा नये.

- राजू मयेकर, विभागीय अध्यक्ष, एस.टी. कामगार संघटना.