शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

राणेंचा राजीनामा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

By admin | Updated: July 22, 2014 00:10 IST

राणे यांच्या घुसमटीने कार्यकर्ते संभ्रमात

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे कॉँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, राजीनाम्याचा हा विषय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. राणे यांच्या राजीनाम्यामुळे कोकण विकासाला खीळ बसणार असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.राणे यांच्या घुसमटीने कार्यकर्ते संभ्रमात उद्योगमंत्री नारायण राणे हे कर्तृत्ववान नेते आहेत. प्रशासन चालवण्याची त्यांच्यात धमक आहे. ते उत्कृष्ट संघटक आहेत. असे असताना पक्षाने त्यांना दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे त्यांची घुसमट झाली. त्यांच्याबरोबरच त्यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची किती घुसमट झाली असेल, याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करावा. शेवटी सत्ता लोकांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी राबवायची असते. मग ती ग्रामपंचायत असो की विधानसभा. सत्ता ही पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या हितासाठी असते. याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करायला हवा. राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देताना जी कारणे सांगितली आहेत ती पटण्यासारखी आहेत. प्रशासन व संघटना ही दोन्ही चाके बरोबर चालावी लागतात. त्याचे यश निवडणुकीत मिळत असते. - रामदास राणे, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राणे तेथे आम्ही... कोकणात उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने काँग्रेसची ताकद वाढत होती. परंतु, त्यांच्या घुसमटीवर पक्षाने गांभीर्याने इलाज केला नाही. त्यांना दिलेला शब्द वेळीच पाळला गेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. कोकणच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांच्यामुळेच कोकणात काँगे्रसचे अस्तित्व निर्माण झाले व युतीची ताकद कमी झाली होती. अशा नेत्याला काँग्रेसने पक्षापासून दूर ठेवणे पक्षहिताचे नाही. त्यामुळे नारायण राणे जेथे असतील त्यांच्याबरोबर आम्ही असू. - संदीप सावंत, अध्यक्ष, चिपळूण तालुका काँग्रेस त्यांचे उपकार विसरणार नाही... उद्योगमंत्री नारायण राणे हे ज्या समाजात जन्माला आले त्या समाजातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या समाजबांधवांसाठी त्यांनी १६ टक्के आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे मराठा समाज त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. त्यांनी आज सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षापासून फारकत घेतलेली नाही. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राणे यांनी काम केले आहे. त्यामुळे पक्षाने त्यांचा राजीनामा सन्मानाने नाकारायला हवा. राणे यांची समजूत काढून त्यांना पुन्हा सक्रिय करायला हवे. - सुरेंद्र माने, जिल्हा उपाध्यक्ष, प्रदूषण नियंत्रण सेल, रत्नागिरीसामान्य माणसाला राणे यांची गरज उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज (सोमवारी) मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. राणे नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु, पक्षश्रेष्ठी त्यांचा राजीनामा स्वीकारणार नाहीत. कोकणसह राज्यातील तळागाळातील जनतेला त्यांची गरज आहे. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष मुकेल, असे वाटत नाही. श्रेष्ठी त्यांची समजूत काढतील, अशी अपेक्षा आहे. - मुधकर दळवी, उपसभापती, रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती राणे धडाडीचे नेतेनारायण राणे हे कोकणचे धडाडीचे नेते आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, ही बाब दु:खदायक आहे. सच्चा कार्यकर्त्यांकडे कोकणात दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या कृतीने राणे यांनी कोकणातील सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज यानिमित्ताने उठविला असून, राज्यातील निवडणूक त्यांच्या नेतृत्त्वाखाली झाल्यास कॉँग्रेसला मोठे यश मिळेल. - राजू भाटलेकर, कॉँग्रेस कार्यकर्ता, रत्नागिरी राणे कॉँग्रेसमध्येच हवेतनारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजिनामा देता कामा नये होता, असे आम्हालाही वाटते. राणेंसारखा मोठ्या ताकदीचा नेता कोकणात कॉँग्रेसमध्ये नसेल तर कोकणवासीयांच्या समस्या धाडसाने सरकारमध्ये मांडणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राणे हे कॉँग्रेसध्येच हवेत व त्यांचा योग्य तो सन्मान पक्षात व्हायला हवा. -प्रसाद उपळेकर, कॉँग्रेस कार्यकर्ता, रत्नागिरी कोकणच्या विकासाला खीळ उद्योगमंत्री नारायण राणे यांची पक्षात घुसमट झाली. वरिष्ठांनी दिलेला शब्द न पाळल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोकण विकासाला खीळ बसणार आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासात राणे यांचे योगदान मोठे आहे. ते जेथे असतील त्यांच्याबरोबर आम्ही सदैव राहू. - परिमल भोसले, चिपळूण शहर अध्यक्ष इंदिरा काँग्रेस