शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

पाण्यासाठी रणरागिणी मैदानात

By admin | Updated: June 30, 2015 00:16 IST

दिवसभरात दोन मोर्चे : महापालिका पाणीपुरवठा विभागात पोलीस बंदोबस्ताची वेळ

सांगली : शहरातील विनायकनगर, महसूल कॉलनी, लतिफ पठाण गल्ली या परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेने टँकरने पाणी पुरविण्याचे दिलेले आश्वासनही न पाळल्याने या परिसरातील महिलांच्या दोन गटांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागावर वेगवेगळे मोर्चे काढले. या मोर्चाला राजकीय रंग असला तरी, पाणीटंचाईमुळे महिलांचा संताप अनावर झाला होता. त्यामुळेच पाणीपुरवठा विभागाला अखेर पोलीस बंदोबस्त मागविण्याची वेळ आली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा कोलमडली आहे. नव्याने अभियंता पदाची सूत्रे हाती घेतलेले वाय. एस. जाधव यांचे पाणीपुरवठा विभागावर नियंत्रणच राहिलेले नाही. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा वारंवार विस्कळीत होत आहे. गेल्या आठवड्यात विनायकनगर, दत्तनगर, महसूल कॉलनीतील महिलांनी घागर मोर्चा काढून जाधव यांना धारेवर धरले होते. तेव्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी त्यांनी दिली होती. पण त्यानंतरही या परिसरात पाण्याचा ठणठणाट कायम आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता सत्ताधारी काँग्रेसच्या एका नगरसेविका पुत्राने पाणीपुरवठा विभागावर महिलांचा मोर्चा काढला. अधिकाऱ्यांच्या घरात पाणी येते, पण गोरगरिबांना पाणी मिळत नाही, असा टाहो फोडत महिलांनी अधिकाऱ्यांची शिवराळ भाषेत धुलाई केली. हा मोर्चा माघारी जातो तोच, या प्रभागातील विरोधी नगरसेवकाच्या समर्थक महिलाही पाणीपुरवठा विभागात येऊन धडकल्या. त्यांनी थेट अभियंता जाधव यांचे कार्यालय गाठले. पाणी आल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, असा इशारा देत तेथे ठिय्या मारला. महिलांचा संताप पाहून अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू मोरे यांनी महिलांची समजूत काढली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साडेतीनपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)कबुलीनामाअभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लतिफ पठाण गल्लीमध्ये तीनशे मीटर जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे. पण हे काम खर्चिक आहे. त्यासाठी बराच वेळ लागणार आहे. विनायकनगरमध्ये जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून तीन दिवसात काम पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. तोपर्यंत नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची सोय केली जाईल. शहरात काही भागात कमी व अपुरा दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची कबुलीही त्यांनी दिली.